Disciplinary notices will be issued on WhatsApp, E-mail in marathi
Marathi June 03, 2025 06:28 PM


विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार व्यक्तिशः किंवा टपालाने कागदपत्रे पाठवण्याची जुनी पद्धतही कायम राहणार आहे. त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कामकाजाला गती देण्यावर भर दिला जाईल.

Discipline Notice : मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना यापुढे शिस्तभंगाची नोटीस व्हॉट्सऍप तसेच ईमेलवर पाठविली जाणार आहे. या शिस्तभंगाच्या नोटिसीला वेळेत उत्तर देता यावे आणि एकूणच यासंदर्भातील कारवाईला गती देण्यासाठी ईमेल आणि व्हॉट्सऍपवरही नोटीस पाठविली जाणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय सोमवारी जारी केला. दरम्यान, विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार व्यक्तिशः किंवा टपालाने कागदपत्रे पाठवण्याची जुनी पद्धतही कायम राहणार आहे. मात्र, याच्याच जोडीला नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कामकाजाला गती देण्यावर भर दिला जाईल. (Disciplinary notices will be issued on WhatsApp, E-mail)

यापूर्वी शिस्तभंगाशी संबंधित कागदपत्रे, जसे की दोषारोप पत्र किंवा चौकशी अहवाल, व्यक्तिशः किंवा नोंदणीकृत टपालाने पाठवले जायचे. मात्र, अनेकदा ही कागदपत्रे संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचत नसल्याच्या तक्रारी होत होत्या. यामुळे आता सरकारने या नवीन पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर ही कागदपत्रे पाठवली जाणार आहेत. याशिवाय, व्हॉट्सऍपद्वारेही नोटिस पाठवण्याची सोय करण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना जलद माहिती मिळेल आणि त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधीही लवकर मिळेल.

हेही वाचा – 11th Admission : अकरावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; प्रवेशासाठी या तारखेपर्यंत मुदतवाढ

विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार व्यक्तिशः किंवा टपालाने कागदपत्रे पाठवण्याची जुनी पद्धतही कायम राहणार आहे. त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कामकाजाला गती देण्यावर भर दिला जाईल. यासाठी शासकीय ई-मेल आयडी आणि व्हॉट्सअॅपचा वापर करताना संबंधित व्यक्तीने पोचपावती देणे बंधनकारक आहे. ही पावती प्रकरणाच्या कागदपत्रांना जोडली जाईल. हा निर्णय महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त आणि अपील) नियम, 1979 आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 अंतर्गत लागू होईल. सरकारचा हा निर्णय शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्याच्या दिशेने महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे शिस्तभंगाच्या प्रकरणांचा निपटारा जलद होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा – Nitesh Rane : आमच्या सणांच्या वेळी फुकटात सल्ले देणारे… बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर काय म्हणाले मंत्री नितेश राणे



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.