समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या चौथ्या टप्प्याचं उद्घाटन आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. ७०१ किमी लांबीचा महामार्ग पूर्णपणे खुला होणार आहे.
देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा या महामार्गावर आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अभियांत्रिकी आव्हान पेलले. या टप्प्यामध्ये एकूण पाच दुहेरी बोगदे आहेत.
कसारा घाट मार्गाला पर्यायी मार्ग. भारतातील कोणत्याही बोगद्यात प्रथमच वापरण्यात येणारी अग्निशमन यंत्रणा. या बोगद्यामुळे अंदाजे आठ मिनिटांत इगतपुरी ते कसारा हे अंतर पार होईल.
चौथ्या टप्प्यात सर्वाधिक लांबीचा पूल (व्हायाडक्ट) २.२८ कि.मी लांबीचा. या टप्प्यात एका ठिकाणी (व्हायाडक्ट-२) पुलाच्या काही खांबांची उंची ८४ मीटरपर्यंत आहे.
चौथ्या टप्प्यात तीन ठिकाणी इंटरचेंजेस. या टप्प्यात इगतपुरी, खुटघर व आमणे येथे इंटरचेंज येतात. एक रेल्वे ओलांडणी पूल बांधण्यात आलेला आहे.
राज्याच्या पाच महसूल विभागाच्या १० जिल्ह्यांतील २६ तालुक्यांमधील ३९२ गावांमधून जाणारा हा सहापदरी महामार्ग ग्रीन फिल्ड संरेखण केलं आहे.
जुन्या नागपूर-मुंबई मार्गावरून नागपूरहून मुंबईकडे येण्यास १७-१८ तास लागतात. नवीन ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेने हा प्रवास आठ तासांत करणे शक्य झाले आहे.
समृद्धी महामार्ग हा दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि शिर्डी, अजिंठा-वेरूळ लेणी, लोणार सरोवर आणि इतर पर्यटनस्थळांना जोडणारा.