Operation Sindoor : भारताने मारलं जास्त, सांगितलं कमी…पाकिस्तानची डोजियरमधून पहिल्यांदा मोठी कबुली
GH News June 03, 2025 07:07 PM

ऑपरेशन सिंदूर संदर्भात पाकिस्तानचा मोठा कबूलनामा समोर आलाय. भारतीय सैन्याने जो दावा केला होता, त्यापेक्षा या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानच जास्त नुकसान झालय. पाकिस्तानच्या डोजियरमधून ही कबुली समोर आलीय. रिपोर्टमध्ये स्पष्टपणे म्हटलय भारताने जास्त मारलं पण सांगितलं कमी. हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने सांगितलं होतं की, पाकिस्तानात 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करण्यात आलाय. पण डोजियरमध्ये मॅपच्या माध्यमातून सांगण्यात आलय की, भारताने पाकिस्तानात फक्त 9 नाही, जास्त ठिकाणी हल्ला केला.

मॅपमध्ये पेशावर, झांग, सिंधच्या हैदराबाद, पंजाबमध्ये गुजरांवाला, भवालनगर, अटक आणि छोर येथे हल्ला केल्याच दाखवण्यात आलय. मागच्या महिन्यात प्रेस ब्रीफिंगमध्ये सैन्यदलांनी या ठिकाणांची नाव घेतली नव्हती. पाकिस्तानने ऑपरेशन बुनयान उन मार्सोस वर डोजियर बनवलं आहे. भारताने जी ठिकाणं सांगितली, त्यापेक्षा 8 जास्त ठिकाणांची नाव पाकिस्तानने घेतली आहेत. यावरुन एक गोष्ट स्पष्ट होते, भारताने पाकिस्तानात किती खोलवर हल्ले केलेत. 18 मे रोजी पाकिस्तानने अनेक देशांना डोजियर सोपवलं. त्यातून भारताने सांगितल्यापेक्षा मोठा हल्ला केल्याच समोर आलय. पाकिस्तानने स्वत:च आता ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय मिसाइल आणि ड्रोन हल्ल्यात मोठं नुकसान झाल्याच कबूल केलय.

पाकिस्तानी डोजियरनुसार, भारताने आणखी किती ठिकाणी हल्ला केला?

पेशावर

झांग

सिंधमध्ये हैदराबाद

पंजाबमध्ये गुजरांवाला

भवालनगर

अटक

छोर

भारतीय सैन्यदलांनी 7 मे रोजीच्या प्रेस ब्रिफिंगमध्ये किती ठिकाणी हल्ला केल्याची माहिती दिलेली ?

बहावलपूरध्ये जैश-ए-मोहम्मदच मुख्यालय

मुरीदकेमध्ये लश्कर-ए-तैयबा दहशतवादी केंद्र

मुजफ्फराबाद

कोटली

रावलकोट

चकस्वारी

भीमबेर

नीलम घाटी

झेलम

चकवाल

भारताने माहिती देणं का टाळलं असावं?

भारताने ज्या ठिकाणी अतिरिक्त हल्ले केले, त्या बद्दल माहिती देणं प्रेस ब्रीफिंगमध्ये टाळलं, कदाचित हा रणनितीक निर्णय असावा. पाकिस्ताननेच त्यांच्या तोंडाने किती मोठ नुकसान झालय त्याची कबुली द्यावी हा त्यामागे उद्देश असू शकतो. 7 मे च्या पत्रकार परिषदेत भारताने फक्त आम्ही दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केलं, एवढच सांगितलं. पाकिस्तानने प्रत्युत्तर म्हणून भारताच्या पश्चिमी भागात नागरिक क्षेत्र आणि सैन्य ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. ड्रोन आणि मिसाइल्सचा पाऊस पाडला. पण त्यांचा हा प्रयत्न भारताच्या मजबूत हवाई सुरक्षा प्रणालीने हाणून पाडला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.