गेल्या पाच दिवसापासून उघडीप घेतलेल्या पावसाने आज सकाळपासून पुन्हा हजेरी लावली अचानकपणे पावसाच्या सरी पडण्यास सुरुवात झाली आहे. तर उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे. सकाळी साडेदहा वाजल्यापासून पावसाची रिपरिप सांगली जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे. गेल्या पाच दिवसापासून पावसाने उघडीत दिली होती. मात्र सकाळपासून ढगाळ वातावरण आणि पुन्हा एकदा पावसाची आगमन झाल्यामुळे शेतकरी वर्गातून आनंदाचे वातावरण आहे. शेतकरी वर्गाच्या पेरण्या सुरू आहेत. तर काही ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्यामुळे या पावसाची शेतकऱ्यांना उत्सुकता होती.
सुशील हगवणे आणि शशांक हागवणे यांचा ताबा मिळावा म्हणून पुणे पोलीस आज कोर्टात अर्ज करणार....शस्त्र परवाना मिळवण्यासाठी खोटी कागदपत्र सादर केल्याबाबत कोथरूड आणि वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय....
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी शशांक हलवणे आणि सुशील हगवणे यांचा ताबा मिळावा यासाठी पुणे पोलीस आज न्यायालयात अर्ज करणार आहेत.....
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात यापूर्वी सुशील हगवणे आणि शशांक हगवणे यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे....
रुख्मिणी माता पालखीचे युवा स्वाभिमान कडून स्वागत...विदर्भाची पंढरी आणि आई रुख्मिनी मातेची पालखी काल सायंकाळी अमरावतीत दाखल झाली.. रात्री एकविरा मंदिरात पालखीच मुक्काम झाल्यावर आज सकाळी पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. आज सकाळी राजापेठ चौकात आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टी कडून सुनील राणाकडून या पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले.. आई रुक्मिणी मातेचा पायदळ पालखी दिंडीचं 431 व वर्ष आहे.. आई रुक्मिणी मातेची ही पालखी अतिशय जुनी असल्याने जागोजागी या पालखीचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत केल्या जाते...
सरकारने पालख्यांना देण्यात येणार अनुदान आणि विमा नाकारला,वारकऱ्यांमध्ये नाराजीचा सूरयावर्षी सरकारने पालख्यांना देण्यात येणार अनुदान आणि विमा नाकारला.. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला..
पुरोगामी महाराष्ट्राला पालखीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची पारंपारिक परंपरा आहे..
मागील वर्षी प्रत्येक पालख्यांना 20 हजार रुपयाचे अनुदान देण्यात आले.. यासोबतच पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचा विमा देखील काढण्यात आला..
सरकारमध्ये असलेल्या लोकांनी केवळ निवडणुकीच्या तोंडावर वारकऱ्यांना अनुदान दिलं असा आरोप माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला..
हे सरकार केवळ मतासाठी राजकारण करतात.. निवडणूक नाही म्हणून हे सरकार पालख्यांना अनुदान देणार नाही.. असा आरोप देखील यशोमती ठाकूर यांनी केला.
नवी मुंबईत पावसाला सुरुवातनवी मुंबईत पावसाला सुरुवात
खारघर बेलापूर वाशी या भागामध्ये पाऊस
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन सज्ज
चड्डी मोर्चा नाशिक ते मुंबई मंत्रालय मोर्चा ठाणे जिल्ह्यात दाखल .नाशिक जिल्ह्यातील सातपुर M.I.D.C मध्ये असलेल्या ट्रॅक कंपोनंट्स प्रा.लि. या कंपनीत कामगार ऐकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या नेतृत्वाखाली प्रणीत मार्शल कामगार युनियन ची स्थापना केली कंपनीत युनियन केल्यामुळे कंपनी प्रशासनाने एकूण 80 कामगारांना कोणतीही पूर्व सूचना देताना कामावरून काढून टाकले. यामुळे हे सर्व कामगारांनी नाशिक कामगार आयुक्त कार्यालय ते मुंबई मंत्रालय असा पायी चड्डी मोर्चा काढत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकारी सुपेकरांनी जेल मधील आरोपींकडून 300 कोटी मागितले - आमदार सुरेश धसवैष्णवी हगवणे प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकारी सुपेकरांनी जेलमधील आरोपींकडून 300 कोटी रुपयांची मागणी केल्याची तक्रार माझ्यापर्यंत आल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय..
नातेवाईकांच्या सुनेकडून तुम्ही पैसे मागता.. म्हणजे तुम्ही फॉल्टी आहात.. त्यांच्यात नैतिकता नाही... आता दीडशे कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीचे काय करायचे? बाहेर आले तर यांना लोक शेण हाणणार आहे.. काही लोकांनी टमाटे हाणले मात्र त्याने काही होणार नाही.. हे बाहेर आल्यावर यांना कवट मारले पाहिजे असे धस म्हणाले
अवकाळी पावसाने कोबी पिकाचे नुकसानराज्यासह नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने सतत पंधरा दिवस हजेरी लावली होता.सततच्या पावसाने मात्र शेती पिकाचे मोठ नुकसान होऊन शेतक-यांना त्या मोठा फटका बसला,मनमाड च्या श्रीधर सांगळे या शेतक-याने एक एकरात कोबीची लागवड केली त्यासाठी साठ हजार खर्च केला मात्र अवकाळी पावसाने कोबी शेतातच सडून गेली त्यामुळे त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरलय.
धार्मिक विधींसाठी धनंजय मुंडे नाशिकच्या रामकुंडावर* काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी इगतपुरीत केली होती विपश्चना..
* आज देखील धनंजय मुंडे धार्मिक कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये दाखल
* संध्याकाळी एका लग्न सोहळ्याला देखील लावणार हजेरी..
वैष्णवी हगवणे प्रकरणातील सहआरोपी निलेश चव्हाणच्या अडचणी वाढणारवारजे पोलीस मागणार निलेश चव्हाण याचा ताबा
पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये निलेश चव्हाण याच्या विरोधात आर्मस ऍक्ट नुसार गुन्हा आहे दाखल
कसपटे कुटुंबीयांना बंदुकीने धमकवल्याच्या विरोधात पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये निलेश चव्हाण याच्या विरोधात गुन्हा करण्यात आला होता दाखल
बावधन पोलीस स्टेशन मध्ये असलेल्या गुन्ह्यात MCR मिळताच वारजे पोलीस घेणार निलेश चव्हाण याचा ताबा
वारजे पोलीस निलेश चव्हाणला करणार अटक
Navi Mumbai: नवी मुंबईच्या घणसोली डेपो मध्ये परिवहन सेवेच्या बसला आगनवी मुंबई परिवहन सेवेच्या पाच ते सहा बस आगीत जळून खाक
इलेक्ट्रिक बसला आग लागल्याने तिच्या बाजूला असलेली बस जळाली
जय भारत मोटर्स कडून परिवहन सेवेने बस विकत घेतल्या होत्या
बस खरेदीपासून वादाच्या भोवऱ्यात होत्या
सुदैवाने बस मार्गावर धावताना आग लागली नाही
धाराशीवमध्ये पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यूधाराशिव मधील उमरगा तालुक्यातील गणेशनगर येथील घटना
अमित बाळू राठोड आणि सुरज अर्जुन पवार अशी मृत मुलांची नावे
तांड्या शेजारी असलेल्या खड्ड्यात पोहायला गेले पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू
उमरगा पोलिसाचा आकस्मात मृत्यूची नोंद
भंडाऱ्यात पोलिसांच्या वाहनाचा टायर फुटून अपघात...वाहन चालक किरकोळ जखमीAnchor : भंडारा इथून साकोलीकडे जाणाऱ्या पोलिसाच्या वाहनाचा टायर फुटला. त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रित सुटले आणि पोलीस वाहन डीव्हाईडरवर आदळून पलटली. या अपघातात पोलीस वाहन चालक किरकोळ जखमी झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील शिंगोरी फाटा इथं रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. चालकाला उपचाराकरिता भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर वाहन चालक हा लॉक बुक भरण्याकरिता भंडाऱ्यात आला असल्याची माहिती आहे.
Nashik: कांदा निर्यातीवरील रोडटेप सवलत पुन्हा लागू- २ जून पासून कांदा निर्यातीवरील १.९ टक्के रोडटेप सवलत रद्द झाल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्ये देखील पसरली होती नाराजी
- २ जून पासून कांद्यासह २६ नाशवंत कृषिमालावरील निर्यात प्रोत्साहन सवलत अर्थात रोडटेप करण्यात रद्द करण्यात आला होता
- मात्र शेतकरी आणि कांदा निर्यातदारांमध्ये संतापाची लाट उसळल्यानंतर सवलत पुन्हा पूर्ववत
- ३ जून पासून कांद्यावरील रोडटेप पुन्हा पूर्ववत लागू, केंद्राकडून निर्णयावर पुनर्विचार करत सवलत पुन्हा लागू
Maharashtra News Live Updates : बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत घाटले वरती बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलबीडच्या सायबर विभागामधील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रंजीत कासले वेगवेगळ्या व्हिडिओमुळे अडचणीत आले आहेत मोठमोठे दावे करून आरोप प्रत्यारोप करणारे काही पुरावे समोर आणत आहेत मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे रंजीत कसले विरोधामध्ये आता बीडच्या सायबर विभागामध्ये आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे ही तक्रार संभाजी सुर्वे यांनी दिली असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल बेताल वक्तव्य आणि चुकीच्या पद्धतीने माहिती पसरवली आहे अशा पद्धतीने तक्रार दिली असून बीडच्या सायबर विभागात गुन्हा दाखल केला असून आता कसले यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली असून कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
जालना जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 1879 हेक्टर वरील पिकांचे नुकसानजालना जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना प्रचंड तडाखा बसलाय. जिल्ह्यातील 1 हजार 879 हेक्टर वरील पिकांवरचं नुकसान झालं असून मोसंबी डाळिंब या फळ पिकांसह उन्हाळी पिकांचा यामध्ये समावेश होता. जालना जिल्ह्यातल्या 3166 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून 211 मीमी पेक्षाही पाऊस जास्त झाला. विजांचा कडकडाट आणि वादळी वार असल्यामुळे 33 घरांची पडझड झाली आणि 122 जनावरांचा विज पडून मृत्यू झालाय. दरम्यान झालेल्या नुकसानीचे पंचनामे सध्या संथ गतीने सुरू असून नुकसान भरपाई ची मदत मिळणार तरी कधी असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे...
संत एकनाथ महाराज पालखीचे १८ जूनला पंढरपूरला प्रस्थानपैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पादुका यावर्षी चांदीपासून बनविलेल्या रथातून पंढरपूरला जाणार आहेत. आषाढी वारीनिमित्त पैठणवरून संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे १८ जूनला विठुमाऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरला प्रस्थान होणार आहे. नाथांच्या पालखीला चांदीच्या रथाचा साज देण्याची पुण्यात जय्यत तयारी सुरु आहे. सागवानी लाकूड वापरून त्यावर १२० किलो शुद्ध चांदी चढविण्यात येणार आहे. आतापर्यंत लोकवर्गणीतून ८० किलो चांदी जमा झाली आहे. या रथासाठी ११० चौरस घनफूट सागवानी लाकडावर १२० किलो चांदी वापरण्यात येत आहे. त्यासाठी तब्बल २१ लाख रुपये मजुरी देण्यात येणार आहे. आणखी ४० किलो चांदीसाठी भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी पालखीवाले यांनी केले आहे. वारकरी, भाविक, भक्तांचे सहकार्य, लोकवर्गणीतून नाथ महाराजांच्या चांदीच्या रथाचे काम हाती घेण्यात आले आहे. या रथ निर्मितीच्या कार्यासाठी पालखी सोहळ्यातर्फे समिती स्थापन करण्यात आली आहे. रथाचे काम पुणे येथील रथ निर्मिती तज्ज्ञ रमेशभाई मिस्री व राजूभाई मिस्री करीत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या रथाचे काम देखील त्यांनीच केले आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 8 वरछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ वर गेली आहे. यात महापालिका हद्दीतील ७ आणि ग्रामीण भागातील एका रुग्णाचा समावेश आहे. ग्रामीण भागातील हे रुग्ण सध्या शहरात वास्तव्यास आहे. या सर्व रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत शहरात महापालिकेकडून जवळपास ३५० संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव-1 डॉ. निपुण विनायक यांनी सोमवारी एका पत्राद्वारे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, मनपा मुख्य वैद्यकीय अधिकारी यांना कोरोनासंदर्भातील विविध खबरदारीच्या सूचना केल्या आहेत. पेशवाई छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने ही नागरिकांना सतर्क राहून जर कोणाला लक्ष्मी आढळली तर तातडीने तपासून घ्यावे आणि कोरोना काळातील जी नियम होते त्या नियमाचे पालन करावं असे आवाहन केले आहे.
कौडगाव येथील टेक्निकल टेक्सटाईल पार्कला मोठी गती, 16 कोटी 54 लाख रुपये खर्च करुन मुलभूत सुविधा विकसित केल्या जाणारधाराशिव च्या कौडगाव एमआयडीसीत उभारण्यात येणाऱ्या टेक्निकल टेक्सटाईल पार्कच्या उभारणीच्या कामाला गती मिळाली असुन 16 कोटी 54 लाख रुपये खर्च करुन पायभूत रस्ते,पुल,पाणीपुरवठा, पाईपलाईन,वृक्षारोपण व विद्युतीकरण आदी मुलभूत सुविधा निर्माण केल्या जात असुन या कामाचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलाय. कौडगाव एमआयडीसीत 308 एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या टेक्निकल टेक्सटाईल पार्कसाठी एकुण 114 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 12.07 कोटींचा रस्ते विकास व उर्वरित रक्कम इतर खर्चासाठी मंजुर करण्यात आली आहे.मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस 2019 मध्ये महाजनादेश यात्रेदरम्यान कौडगाव टेक्निकल टेक्स्टाईल पार्कची घोषणा केली होती त्यामुळे हा प्रकल्प साकार होण्याच्या दृष्टीने पाउले उचलली जात आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे विमानतळ येथे 'उमेद सावित्री' दालनाचे उद्घाटनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील 'उमेद सावित्री' या पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बचत गटाच्या विक्री दालनाचे उद्घाटन झाले.
मान्यवरांनी दालनाची पाहणी करून महिलांशी संवाद साधला आणि दालनातील वस्तूंची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी बचत गटातील महिलांना शुभेच्छा दिल्या.
पुरंदर विमानतळ विरोधातील शेतकऱ्यांचे सासवड शहरात पोस्टर आंदोलन
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विरोध हा अधिकाधिक तीव्र होताना दिसत आहे. विमानतळ विरोधातील आंदोलकांनी पुरंदर विमानतळ बाधित सात गावातील शेतकऱ्यांनी सासवड शहरातील मुख्य चौकात हातात फलक घेत उभे राहत पोस्टर हटके आंदोलन केले. सासवड शहरातील प्रत्येक चौकात विमानतळ बाधित गावातील शेतकरी, महिला नागरिक हातात विमानतळ विरोधातील मजकूर लिहिलेले फलक घेऊन उभे होते या आंदोलकांच्या पोस्टर आंदोलनाची तालुक्यात मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. ज्या ज्या चौकामध्ये हे आंदोलक हातात फलक घेऊन उभे होते त्या ठिकाणी रस्त्याने येणारे जाणारे वाहन चालक, नागरिक थांबून हे फलक वाचत होते. फलक हातात घेणाऱ्या आंदोलकांशी याबाबतीत विचारपूस करत होते. यामुळे विमानतळ विरोधातील आंदोलकांनी एक अभिनव असं आंदोलन आज सासवड शहरात केले. विमानतळ बाधितांच्या या पोस्टर आंदोलनाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आहे. विमानतळ बाधित जे आंदोलन या पोस्टर आंदोलनामध्ये सहभागी होते त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यात 13 जून पर्यंत कलम 144 लागू असून जमावबंदीचे आदेश आहे त्यामुळे पाच व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊ शकत नाही या आदेशामुळे विमानतळ विरोधात आंदोलन करण्यास मर्यादा येत आहे. प्रशासनाने विमानतळ विरोधातील आंदोलने दडपण्यासाठीच ही जमावबंदी पुणे जिल्ह्यात लागू केली असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे.