Ss ubt leader ambadas danve writes to governor seeks action against sanjay shirsat over offensive remarks in marathi
Marathi June 05, 2025 03:25 AM


सामाजिक न्याय मंत्री म्हणून पद भूषवताना त्यांनी केलेले हे वक्तव्य केवळ व्यक्तिशः आक्षेपार्ह नसून, शासनाच्या सार्वजनिक मर्यादा तसेच जबाबदाऱ्या यांच्याशी विसंगत आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजात द्वेष आणि वितुष्ट पसरण्याची शक्यता असून, लोकशाही मूल्यांचा अवमान झाला आहे. त्यामुळेच त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी दानवे यांची मागणी आहे.

Ambadas Danve : मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी 2 जून 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतील वादावर प्रतिक्रिया देताना सार्वजनिकरीत्या अत्यंत असंसदीय, असंविधानिक आणि सभ्यतेला धरून नसलेले वक्तव्य केले. यासाठी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. दानवे यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना पत्राद्वारे ही मागणी केली आहे. याबाबत त्यांनी स्वतः X वर एक पोस्ट करत माहिती दिली आहे. (ss ubt leader ambadas danve writes to governor seeks action against sanjay shirsat over offensive remarks)

संजय शिरसाट यांचे वक्तव्य काय ?

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी 2 जून 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील ‘विट्स’ हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतील वादावर प्रतिक्रिया देताना जाहीरपणे माध्यमांसमोर म्हटले की, “मी वेडा माणूस आहे, घराला आग लावायला कमी करणार नाही.” अशा स्वरूपाचे वक्तव्य सामाजिक न्याय मंत्री असलेल्या व्यक्तीकडून अपेक्षित नाही. त्यांचे असे वक्तव्य हे या पदाच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारे असल्याचेही दानवे यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – Sushama Andhare : निर्णय मनसे अध्यक्षांनाच घ्यायचाय, पण…; ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत काय म्हणाल्या अंधारे?

राज्यपालांना लिहिलेले पत्रच X वर पोस्ट करत दानवे म्हणाले की, “संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्रिपदाच्या शुचितेचा, सभ्यतेचा तसेच लोकशाही मूल्यांचा उचित सन्मान राखला जाण्याच्या दृष्टीने योग्य ती शिस्तभंगात्मक कारवाई करण्याबाबत आपल्या स्तरावरुन संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी मागणी मी करतो आहे.”

 शिरसाट यांचे हे वक्तव्य म्हणजे लोकशाही व्यवस्थेत मंत्रिमंडळातील सदस्यांकडून अपेक्षित असलेल्या जबाबदारी आणि संयमाचे उल्लंघन करणारे आहे. सामाजिक न्याय मंत्री म्हणून पद भूषवताना त्यांनी केलेले हे वक्तव्य केवळ व्यक्तिशः आक्षेपार्ह नसून, शासनाच्या सार्वजनिक मर्यादा तसेच जबाबदाऱ्या यांच्याशी विसंगत आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजात द्वेष आणि वितुष्ट पसरण्याची शक्यता असून, लोकशाही मूल्यांचा अवमान झाला आहे. त्यामुळेच त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी दानवे यांची मागणी आहे.





Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.