मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणारी भारतातील पहिली बुलेट ट्रेनच्या ट्रायलला सुरुवात झाली आहे.
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा अधिकतम वेग 320km/h असणार आहे. म्हणजे या ट्रेनची एका तासात ३२० किलोमीटर अंतर कापण्याची क्षमता आहे.
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा प्रति तास वेग ३२० किलोमीटर असला तरीही ट्रेन ताशी २८० किमी वेगाने धावते असे म्हटले जात आहे.
भारताची पहिली बुलेट ट्रेन पुढील वर्षी म्हणजेच २०२६मध्ये डिसेंबर महिन्यापर्यंत धावणार असल्याचे सांगितले जात आहे.
७ तासांचा कालावधी लागणारा मुंबई ते अहमदाबाद प्रवास या बुलेट ट्रेन द्वारे २ तास ७ मिनिटांत पूर्ण होणार आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळेची चांगलीच बचत होणार आहे.
ही बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड कॉरिडोरमधील १२ स्थानकांमधून धावणार आहे. ज्यामध्ये ठाणे, विरार, बोईसर, वापी, सुरत आणि वडोदरा यांचा समावेश आहे.
भारताची पहिली बुलेट ट्रेन रेल्वे सुरक्षा आणि लोकांच्या विश्वासाच्या आधारावर खरी ठरणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.