- युती झाली तर ठीक नाही तर गिरीश महाजन यांनी दिला स्वबळाचा नारा
- नाशिकमध्ये आयोजित भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठकीत गिरीश महाजन यांचे मोठं विधान
- गटबाजी थांबवून महापालिका निवडणुकांसाठी कामाला लागा, गिरीश महाजन यांच्या सूचना
- तसच सूत्रसंचालकांकडून गिरीश महाजन यांचे संभाव्य पालकमंत्री म्हणून देखील उल्लेख
अंबादास दानवे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेटआठवडाभर चालणाऱ्या 'क्या हुवा तेरा वादा' या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिले निवेदन
शेतकरी प्रश्न, तसेच शहारातील विविध प्रश्नांसाठी आंदोलन करणार असल्याची घोषणा
संपूर्ण मराठवाड्यात हे आंदोलन होणार असून सरकारने केलेले वादे फेल ठरल्याचा ठपका
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निवेदन स्विकारले निवेदन
Chhatrapati Sambhaji Nagar: संभाजीनगर जिल्ह्यातील 2 हजार 399 शेतकऱ्यांना एकापेक्षा अधिकवेळा अनुदान...राज्यातील अनेक भागात शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत, मात्र दुसरीकडे संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना एकपेक्षा अधिक वेळा अनुदान मिळाल्याचा धक्कादायक प्रकार लेखा परीक्षणानंतर समोर आला आहे. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत 2022 - 23 मध्ये महसूल विभागाच्यावतीने जिल्ह्यातील 2 हजार399 शेतकऱ्यांना एक पेक्षा अधिक वेळा अनुदान देण्यात आले. आता प्रशासनाकडून याची वसुली सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत 464 शेतकऱ्यांनी 39 लाख 27 हजार 831 रुपये शासनाकडे जमा केले आहे .
Solapur: सोलापूर जिल्ह्यातील शिंदे सेनेतील गटबाजी समोर...शिवसेना शिदे गटाला सोलापूर जिल्हात गटबाजीचे ग्रहण...
-शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंताचां फोटो जाहीरातीमधून गायब...
- शिवसेनेचे सोलापूरचे लोकसभा प्रमुख- महेश साठे आणी जिल्हा प्रमुख मनिष काळजे यांनी आज विविध वर्तमानपत्रात दिलेल्या जाहीरातीत शिवाजीराव सावंत यांचा फोटोला स्थान नाही.
सोलापूर जिल्हातील सावंत समर्थकांमधून नाराजी...
शिवाजी सावंत अक्कलकोटच्या जाहीर सभेकडे पाठ फिरवण्याची शक्यता...
-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षातील या गटबाजी कशी थोपवतात याकडे लक्ष...
जागतिक पर्यावरण दिननिमित्त पर्यावरण परिषदचे आयोजनमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण वातावरणीय बदल विभाग यांच्या संयुक्त माध्यमातून परिषदेचे आयोजन
ताज लॅन्डस बांद्रा येथे पर्यावरण परिषदचे आयोजन करण्यात आले आहे
मंत्री पंकजा मुंडे ,पालक मंत्री आशिष शेलार आणि पर्यावरण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आणि इतर मान्यवर उपस्थित
पंकजा मुंडे यांच्या हस्ते महापर्यावरण अँपचा शुभारंभ करण्यात आला
मंत्री नितेश राणे यांची शिवसेना ठाकरे गटावर सडकून टीका- ठाकरे गटाची मोहीम ही शिवसेनेसाठी आहे की आपल्या आदित्यला वाचवण्यासाठी आहे याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं
- उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा बाजार उठलेला आहे.
- त्यामुळे जवळचे शिवसैनिक महायुतीत म्हणजेच भाजप आणि प्रामुख्याने शिवसेना शिंदे गटात जात आहेत
- त्यामुळे ही मोहीम शिवसेनेसाठी नसून त्यांच्या आदू बाळासाठी आहे.
- याबाबत उद्धव ठाकरे स्पष्ट करावं आणि नौटंकी बंद करावी.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तळजाई टेकडी येथे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते वृक्षारोपण...जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्याचे तळजाई टेकडी येथे राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन वनविभागाच्या वतीने करण्यात होते. यावेळी अनेक पदाधिकारी उपस्थित होते...
सुधाकर बडगुजर यांच्या जागी दत्ता गायकवाड यांची नियुक्ती- ठाकरे गटाच्या उपनेते पदी दत्ता गायकवाड यांना संधी
- सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करताच दुसऱ्याच दिवशी सामना दैनिकातून दत्ता गायकवाड यांच्या नावाची घोषणा
सरपंच देशमुख हत्येप्रकरणी जरांगेंनी कानाला हात लावलासंतोष देशमुख हत्या प्रकरणाची देवेंद्र फडणवीस यांनी विल्हेवाट लावली
पुर्ण कार्यक्रम केलाय
आरोपीच्या वतीने वकिलाने बाजु मांडली मोक्यातुन दोषमुक्त करा
हरकत नाही असं सरकारी वकील म्हणत आ
पुण्यात आयटी इंजिनियर तरुणीची आत्महत्यासॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे.... अशी चिठ्ठी लिहून हिंजवडीतील एका 25 वर्षीय आय टी अभियंता तरुणीने 21 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 31 मे च्या पहाटे घडले आहे.
बेंगळुरुमधील चेंगराचेंगरी प्रकरणावर आज दुपारी सुनावणीया अठरा दिवसांमध्ये पावणे पाच मीटर एवढ्या उंचीच्या अजस्त्र लाटा उसळण्याचा अंदाज
समुद्र आणि खाडी किनारी असलेल्या 145 गावांना मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर दिला गेलाय अलर्ट
11 ऑगस्ट आणि 12 ऑगस्ट या दिवशी असणार सर्वात मोठी भरती
समुद्रात ठराविक काळात अजस्त्र लाटांचा होतो मारा
समुद्राचं पाणी मानवी वस्तीमध्ये जाऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष प्रयत्न
मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर सध्या समुद्र खवळलेला
Mumbai-Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात० लोणेरे नजीक टेमपाले गाव हद्दीतील उड्डाण पुलावर झाला अपघात
० कारवर ट्रक कोसळला
० चार जण जखमी
० सुदैवाने जीवीत हानी नाही
० जखमींवर माणगाव उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरु
० अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू
० वाहतूक सुरळीत
अग्नीवीरच्या पाचव्या बॅचची आज श्रीनगरमध्ये परेडमहाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे येथे लता हगवणे व शशांक हगवणे यांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्याचे तपासा बाबत..
महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे ग. र. न. 332/25 भादवी क. 420, 406, 34 सह आर्म्स ऍक्ट कलम 30 या गुन्ह्याचे तपासात इंडसइंड बँक चे लीगल मॅनेजर यांनी गुन्ह्यातील जेसीबी ताब्यात घेण्याबाबत कोणत्याही रिकवरी एजन्सीला सूचना दिल्या नसल्याचे सांगितले आहे.
असे असताना, खालील तीन इसम यांनी जेसीबी मशीन फिर्यादीचे चालकाकडून अनधिकृतपणे ताब्यात घेतले व ते आरोपी शशांक हगवणे याचे ताब्यात दिले असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर तिघांना आज रोजी 02.07 वा. अटक करण्यात आली आहे.
अटक केलेल्या व्यक्तींची नावे खालील प्रमाणे..
1. योगेश राजेंद्र रासकर, व. 25, रा. तळेगाव ढमढेरे
2. गणेश रमेश पोतले, व. 30, रा. मोहितेवाडी
3. वैभव मोहन पिंगळे, व. 27, रा. तळेगाव ढमढेरे
सोलापूर पुणे महामार्गावर अपघात, ३० जण जखमीसोलापूर पुणे महामार्गावर टेंभुर्णी जवळ आढेगाव शिवारात प्रवासी वाहतूक करणारी ट्रॅव्हल्स पलटी झाली
पहाटेच्या सुमारास ट्रॅव्हल्स चालकाला झोप लागल्यांमुळे ट्रॅव्हल्स खड्ड्यात पलटी झाल्याची घटना घडली आहे
यामध्ये पुणे आणि मराठवाड्यातील 30 प्रवासी जखमी झाले असून वीस जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे .
सदर ट्रॅव्हल्स शिरपूर लातूर येथून पुण्याकडे निघाली होती.
कुडाळ एसटी आगाराच्या बसचा अपघातकुडाळ एसटी आगाराच्या बसने दुचाकीला मागून दिलेल्या धडकेत महिला गंभीर जखमी झाली आहे. तर अन्य दोन दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले. हा अपघात रात्री उशिरा कुडाळ-बाव मार्गावर घडला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. सध्या जखमींना ग्रामीण रुग्णालय कुडाळ येथे दाखल करण्यात आले आहे.
हगवणे माय-लेकाने कट रचल्याचं आता पोलीस तपासात समोरप्रशांत येळवंडेकडून जेसीबी जप्त करण्यापासून ते स्वतःकडे ताबा घेण्यापर्यंत हगवणे माय-लेकाने कट रचल्याचं आता पोलीस तपासात समोर आलंय. थकीत कर्ज असलेला जेसीबी आम्ही येळवंडे कडून जप्त केला नाही, असा खुलासा आधी इंडस इंड बँकेने केला. तर आता जप्त केलेला जेसीबी ज्या गोडाऊनमध्ये ठेवला जातो त्या रणजित आणि भूषण खांडेभराड यांनी ही हगवणेंची पोलखोल केलीये.
Maharashtra News Live Updates : अवकाळीच्या मदतीचे वाटप सुरू, पहिल्या टप्प्यात 4. 23 कोटीअवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्णत्वाकडे असून आत्तापर्यंत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यास सातारा जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात 4 कोटी 23 लाखांचे वाटप केले जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर पैसे जमा केले जाणार असून इतर नुकसानीचे महसूल विभागाकडून ज्या त्या तहसील कार्यालयाकडून पैसे दिले जाणार आहेत. सातारा जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये शेतीचे 2 हजार 484 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. याचा 7 हजार 661 शेतकऱ्यांना फटका बसला होता.
सोलापूर रेल्वे स्थानकास सिद्धरामेश्वर यांचे नाव द्यावेसोलापूर रेल्वे स्थानकाचे श्री सिद्धरामेश्वर रेल्वे स्थानक असे नामकरण करावे यासह विविध मागण्यांचे निवेदन जागतिक लिंगायत महासभेने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमन्ना यांना दिले. रेल्वे स्टेशन नामकरण बरोबरच सोलापूर - दिल्ली नवी बसव सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करावी, नियोजित टिकेकर वाडी टर्मिनल मंजुरी द्यावी, सोलापूर बंगळूर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, या मागण्या मान्य झाल्यास दळणवळण वाढून नागरिकांना फायदा होणार असल्याचेही या निवेदनात म्हंटलेय.
नागपूर - मुंबई थेट प्रवास आज पासून खुला होणारनागपूर ते मुंबई विनाअडथळा प्रवास आज पासून करता येणार आहे. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 5 जून म्हणजे आज समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा करण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाचा शेवटा टप्पा इगतपुरी ते आमने असा 76 किलोमीटर लांबीचा मार्ग प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे.
नागपूर ते मुंबई जलद प्रवासासाठी एमएसआरडीसी ने 701 किलोमीटर लांबीचा प्रवेशनियंत्रित महामार्गाची उभारणी केली आहे. आतापर्यंत त्यातील 625 किलोमीटर लांबीचा मार्ग खुला झाला आहे. तर समृद्धी महामार्गाचा शेवटा टप्पा आज पासून इगतपुरी ते आमने मार्ग खुला झाल्यानंतर नागपूर हून निघालेल्या वाहनांना थेट मुंबई च्या वेशीवर आठ तासात पोहोचता येणार आहे.
अकरावी प्रवेशासाठी आज अखेरची मुदतअकरावी प्रवेशासाठी 26 मे पासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया राबवली जात आहे. आधी या नोंदणीसाठी 3 जूनपर्यंत मुदत होती. ती नंतर 5 पर्यंत वाढवण्यात आली, गुरुवार दुपारी 2 वाजेपर्यंत नोंदणीची प्रक्रिया सुरू राहील.
Maharashtra News Live Updates : ज्योतिबा प्राधिकरणाचे आज अचानक उद्घाटनजोतिबा डोंगराच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या ज्योतिबा प्राधिकरणाचा प्रारंभ अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दुपारी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. मात्र ज्योतिबा ग्रामस्थ, पुजारी आणि ग्रामपंचायतीला या प्रक्रियेत सामावून घेतले नसल्याने जोतिबा डोंगरावर मोठी नाराजी दिसून येत आहे. दरम्यान या संदर्भात ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी डोंगरावर आज दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. डोंगरावरील विकास कामांचे आराखडे तयार करताना ग्रामस्थांची मते विचारात घेतली नाहीत. त्यांच्याशी साधी चर्चा व संवाद साधलेला नाही। आराखडे तयार झाल्यानंतर त्याचे ग्रामस्थान समोर कोणत्याही प्रकारचे सादरीकरण केलेले नाही. त्यामुळे संभ्रम निर्माण झालेला आहे.
गणपतीपुळे समुद्र समुद्रकिनाऱ्यावर मृतावस्थेत डॉल्फिनगणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर एक मृत डॉल्फिन पडलेला आढळला. किनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी आलेल्या स्थानिक नागरिकांना आणि पर्यटकांना वाळूमध्ये हा मृत डॉल्फिन पडलेला दिसला. त्यानंतर अनेकांनी त्याच्याजवळ धाव घेतली. या डॉल्फिनची लांबी चार फुटापर्यंत आहे. हा डॉल्फिन कोणत्या प्रजातीचा आहे किंवा त्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.या घटनेची माहिती तातडीने स्थानिक प्रशासनाला आणि वन विभागाला कळवण्यात आली आहे. मृत डॉल्फिनला किनाऱ्यावरून सुरक्षितपणे हटवून त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.समुद्रातील प्रदूषण, जहाजांची धडक किंवा नैसर्गिक बदलांमुळे सागरी जीवांना धोका निर्माण होत असल्याचे अनेकदा दिसून येते. या डॉल्फिनच्या मृत्यूमागे नेमके काय कारण आहे, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होऊ शकेल. मात्र, या घटनेने पुन्हा एकदा सागरी पर्यावरणाच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
एसटी बस आणि ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघातगोंदिया येथून प्रवाशांना घेऊन भंडाऱ्याकडं येत असलेल्या गोंदिया आगाराच्या एसटी बसची समोरून भरधाव आलेल्या ट्रॅक्टरला जबर धडक बसली. या भीषण अपघातानंतर ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला कोसळल्यानं या अपघातात ट्रॅक्टर चालकमालक असलेले लेकचंद उर्फ रोमन कापगते (५०) यांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला. हा भीषण अपघात राष्ट्रीय महामार्गावरील साकोलीच्या विर्शी फाट्यावर घडला.
सर्पमित्रांने दिले घोरपड आणि तिच्या 31 पिलांना जीवदाननिसर्ग साखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या घोरपड व तिच्या 31 पिल्लांना जीवदान देण्यात दापोलीतील सर्पमित्र सुरेश खानविलकर ओम साळवी यांना यश आले आहे.दापोली गिम्हवणे येथे 20 ऑक्टोबर 2024 रोजी मानवी वस्तीत घोरपड असल्याचा कॉल सर्पमित्र सुरेश खानविलकर यांना आला होता ,घोरपडीला रेस्क्यू करत पकडण्यात यश आले मात्र या ठिकाणी घोरपडीची अंडी असल्याचे दिसून आले, घोरपडीला नैसर्गिक अधिवासात सोडून देत, तिची 32 अंडी कृत्रिम हॅचरीत ठेवण्यात आली त्यातून तब्बल चार महिन्यानंतर 31 पिल्लं त्या अंड्यातून बाहेर पडली,तीच्या तब्बल 31 पिल्लाची सुखरूप सुटका करण्यात सर्पमित्र सुरेश खानविलकर, ओम साळवे यांना यश आले आहे
परभणीत मे महिन्यात धो धो पाऊसपरभणी जिल्ह्यात मे महिन्यातच जोरदार पाऊस पडल्यामुळे शेती मधील मशागतीची काम थांबली होती आता जूनमध्ये पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी रखडलेली कामे हातात घेतली आहेत जिल्ह्यातील शेत शिवारात शेतकरी व्यस्त झाला असुन शेतकरी आपल्या शेतामध्ये मशागती व शेतीची कामे करताना दिसत आहे.खरिप हंगाम तोंडावर असल्याने मशागतीची कामे उरकून पाऊस झाल्यावर लगेच पेरणीची लगबग ही असणार आहे परभणीतील शेतीत बळीराजा व्यस्त आहे याच शेती कामाचा आढावा आमचे प्रतिनिधी विशाल शिंदे यांनी घेतला आहे
अंबरनाथमध्ये गॅसच्या गाडीतून सिलेंडर चोरले!अंबरनाथ पूर्वेच्या शिवगंगा नगरमध्ये दुपार chya सुमारास सिलेंडर पोहोचवण्यासाठी गॅसची गाडी आली होती. एका इमारतीबाहेर ही गाडी थांबवून गॅस कर्मचारी सिलेंडर पोहोचवण्यासाठी इमारतीत गेला. हीच संधी साधून दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी या गॅसच्या गाडीतून २ सिलेंडर चोरून नेले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून पोलीस या सिलेंडर चोरांचा शोध घेत आहेत.
जालन्यातील परतुर पोलिसांनी चोरीच्या 14 दुचाकी केल्या जप्तजालन्यातील परतूर पोलिसांनी दोन दुचाकी चोरांना जेरबंद केल आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या 14 दुचाकी देखील जप्त करण्यात आल्या आहेत. या आरोपींनी जालना, बुलढाणा आणि परभणी या जिल्ह्यातील दुचाकी चोरी केल्याचं देखील तपासात समोर आल आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून जवळपास 13 गुन्हे उघडकीस आले असून दुचाकीचोरीचे अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अमोल चव्हाण आणि अभिषेक धनवडे अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी परतूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास परतुर पोलीस करत आहे.
अमरावतीत आयपीएलच्या फायनल मॅच वर ऑनलाईन सट्टा...पोलिसांनी सहा आरोपींना केली अटकअमरावती शहर पोलिसांच्या क्राइम ब्रांच पथकाने आयपीएलच्या फायनल मॅच वर ऑनलाइन पद्धतीने सट्टा लावणाऱ्या सहा बुकींना अटक केली आहे.. त्यांच्याकडून 3 लाख 89 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गाडगे नगर व राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली... पंजाब आणि बेंगलोर मध्ये आयपीएलचा अंतिम सामना खेळवला जात होता यादरम्यान प्रत्येक बॉलवर व कोण किती रन्स काढणार व कोण जिंकणार यावर सट्टा लावला जात होता, मात्र अमरावती शहर पोलिसांनी यात सहा आरोपीना अटक करून त्यांचे विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.
अमरावती मनपाकडून 85 टक्के नालेसफाईचे काम पूर्णअमरावती महानगरपालिकेद्वारे मान्सून पूर्वतयारीच्या अनुषंगाने अमरावती शहरातील 18 मोठे नाले आणि लहान 22 नाल्यांच्या सफाईचे कामे सध्या सुरू आहेत, सद्यस्थितीत 85 टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाले असून 15 टक्के काम अजून शिल्लक आहे,येत्या पंधरा दिवसात संपूर्ण शंभर टक्के नालेसफाई होईल असा दावा महानगरपालिकेने केला आहे... तर नालेसफाई केल्यानंतर नाल्यामध्ये नागरिकांनी कचरा अथवा कुठली वस्तू टाकू नये असं आवाहन महानगरपालिकेने केल आहे
छत्रपती संभाजी राजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आजपासून ४५ विभागांमध्ये प्रवेश प्रक्रियाछत्रपती संभाजीनगर च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ४५ विभागांमध्ये पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. ५ ते ३० जूनच्या दरम्यान विद्यार्थ्यांना ई-समर्थ पोर्टलद्वारे प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे. यंदाही प्रवेशासाठी 'सीईटी' होणार नसून, पदवीच्या गुणवत्तेवरच सर्व अभ्यासक्रमाचे प्रवेश होणार आहेत. विद्यापीठाच्या वेबसाईटवर पदवीधर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नोंदणी करावी लागेल. खुल्या प्रवर्गासाठी २००, तर राखीव प्रवर्गासाठी १०० रुपये नोंदणी शुल्क आहे. ५ ते ३० जून नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंर नोंदणीची माहिती १ जुलै रोजी विभागांकडे सुपुर्द करण्यात येईलत्यानंतर, विद्यार्थ्यांना ५ जुलैपर्यंत संबंधित विभागांत कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. १४ जुलै रोजी कागदपत्रांची छाननी पूर्ण होईल. १७ जुलै रोजी सर्व सामान्य गुणवत्ता यादी जाहीर होईल. आक्षेपासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली असून, सुधारित गुणवत्ता यादी २१ जुलै रोजी जाहीर होईल. त्यानंतर, २२ जुलै रोजी निवड यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना २३ ते २५ जुलैच्या दरम्यान प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत.
जालना जिल्ह्यातील 98 पाणी नमुने आढळले दूषित; जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत केली तपासणी...जालना जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत 98 पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत. मे महिन्यात आरोग्य विभागाकडून 873 पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यातील 98 नमुने हे दूषित आढळून आले आले. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात सर्वाधिक पाण्याचे दूषित नमुने आढळून आले आहे. जिल्ह्यातील अंबड तालुक्यात 27, तर बदनापूर तालुक्यात 24 पाण्याचे नमूने दुषित आढळून आल्यानं जिल्हा परिषदे आरोग्य विभागाकडून संबंधित ग्रामपंचायतींना पाणी स्वच्छतेबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
तुळजापुर ड्रग्स तस्करीबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार,पोलिस तपासात ञुटी :खासदार ओमराजे निंबाळकरतुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांनी आरोपीना वाचवण्यासाठी अनेक त्रुटी केल्या असून मुंबई व सोलापूर येथील मुख्य आरोपींची नावे समोर येऊनही त्यांना अभय देण्यात आले आहे.पोलीस आरोपींना जामीन मिळावा यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत असून आरोपींवर मकोको अंतर्गत कारवाई करावी यासाठी मुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी दिलीय.तपासात चुका असुन आरोपीना अभय दिले आहे.त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सर्व कागदपत्रे दाखवणार आहे.तुळजापूरात ड्रग्ज तस्करी होत असल्याची माहिती डिसेंबर २०२३ मध्येच माहीती होती तर प्रत्यक्षात प्रथम गुन्हा दाखल होण्यास १ वर्षे १ महिण्याचा कालावधी का लागला असा असा प्रश्न उपस्थित करत १ वर्षाच्या कालावधीत केवळ निवडणुका डोळयासमोर ठेवून किंवा राजकीय स्वार्थापोटी आ.राणा पाटील त्यांनी पोलिसांना काही सांगितले नसल्याचा आरोप देखील खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलाय.
हातात तलवार घेऊन रिस बनवून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी केली अटकहातात तलवार घेऊन रिल्स बनून सोशल मीडियावर व्हायरल करणे एका तरुणाला चांगलंच महागात पडलं. नांदेडच्या किनवट तालुक्यातील शिवनी येथील आलिम सलीम खा पठाण असं रिल्स बनवणाऱ्या तरुणाचं नाव आहे. हातात तलवार घेऊन या तरुणाने अनेक रिल्स बनवल्या.आणि ह्या रिल्स सोशल मीडियावर व्हायरल केल्या.लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा प्रकार केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून तलवार देखील जप्त केली आहे. या तरुणावर बेकायदेशीर रित्या हत्यार बाळगून लोकांमध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी इस्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सुनीता जामगडे हिच्या मोबाईलमध्ये आढळले दोन संशयित पाकिस्तानी ॲप- ‘एनआयए’च्या पथकाने मागीतले सुनीता जामगडे प्रकरणाचे संपूर्ण तपशील
- सुनीताच्या मोबाईलमध्ये ते अँप पाकिस्तानी एजन्सीजने डाऊनलोड केले का? याची सखोल फॅारेन्सीक चौकशी सुरु, अहवालाची प्रतीक्षा
- १४ मे रोजी सुनीता जामगडे पाकिस्तानात गेली होती.
- एलओसी पार केल्यानंतर सुनीताला एका पाकिस्तानी नागरिकाने लिफ्ट दिल्याची माहिती..
- प्रोडक्शन वॅारंट निघाल्यानंतर कारगील पोलीस तिला घेऊन जाणार आणि चौकशी करणार
- काल न्यायालयाने तांत्रिक कारणाने कारगिल पोलिसांना प्रोडक्शन वॉरंट नाकारला होता...आज कारगिल पोलिसांना प्रोडक्शन वॉरंट मिळणार का याकडे लक्ष लागले आहे
लाचखोर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरांचे निलंबनछत्रपती संभाजी नगरचा लाचखोर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरांचे निलंबन करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी खिरोळकरच्या निलंबनाचे आदेश जारी करतानाच त्यांना निलंबन काळात मुख्यालय जालना जिल्हाधिकारी कार्यालय राहणार असून जालना जिल्हाधिकारी यांच्या पूर्व संमतीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे आदेशात म्हटले आहे. येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. या अहवालानुसार निवासीउपजिल्हाधिकारी विनोद गोंडूराव खिरोळकर आणि महसूल सहाय्यक दिलीप मधुकरराव त्रिभुवन यांना २७ मे रोजी रात्री ११.४७ वाजता अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले असता १ जूनपर्यंतपोलीस कोठडी देण्यात आली होती. त्या दोघांच्या विरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra News Live Updates : छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्ग लगत तलवारींचा साठा जप्तअवैधरित्या तलवारींचा साठा घेऊन समृद्धी महामार्गलगत असलेल्या शेवगा शिवारात एक संशयित थांबण्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत आरोपी उदयसिंग उर्फ विकी बहुरे याला अटक केली त्याच्या ताब्यातून दहा तलवारी जप्त करण्यात आले आहे. या तलवारी तो कुठे नेऊन जात होता, कशासाठी नेऊन जात होता .याचा तपास पोलीस करत आहे.