Shubman Gill: कसोटीमधील कॅप्टन्सी सोपी नाही... गिलला रिकी पाँटिंगने दिला मोलाचा सल्ला; विकपाँइंटवरही म्हणाला...
esakal June 06, 2025 06:45 AM

नुकतेच आयपीएल २०२५ स्पर्धा पूर्ण झाली आहे. आता भारतीय क्रिकेटप्रेमींनी इंग्लंड दौऱ्याची उत्सुकता आहे. भारतीय कसोटी क्रिकेट संघाला या महिन्यात इंग्लडला जायते असून तिथे ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे.

२० जूनपासून इंग्लंडमध्ये होणाऱ्या या कसोटी मालिकेत कर्णधार शुभमन गिलने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी असा सल्ला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू रिकी पाँटींगने दिला आहे.

शुभमन गिलच्या कसोटी नेतृत्वाबाबतही त्याने भाष्य केले आहे. आयपीएल २०२५ मध्ये पाँटींगच्या मार्गदर्शनाखाली पंजाब किंग्स २०२५ च्या अंतिम सामन्यापर्यंत पोहचले होते. त्याच्या मते, टी२० आणि कसोटी क्रिकेटमध्ये फरक असून कसोटीसाठी शुभमन गिलच्या खेळात आणखी सुधारणा करण्याची गरज आहे.

रिकी पाँटिंग म्हणाला, 'तो मर्यादीत षटकात चांगला खेळतो, पण त्याला कसोटीमध्ये फलंदाजीत आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. आणि ते जेव्हा तुम्ही नवीन कर्णधार असता, तेव्हा ते कधीच सोपे नसते.'

गिलने कारकिर्दीची सुरवात सलामीवीर म्हणून केली असली, तरी तो आता विराट कोहलीच्या चौथ्या क्रमांकावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गिलने चौथ्या क्रमांकावर खेळणे योग्य आहे. असे मत पाँटींगने व्यक्त केले.

तो म्हणाला, 'जर भारतीय संघ यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन यांना सलामीला पाठवणार असेल, तर त्यांना तिसऱ्या क्रमांकावर अनुभवी फलंदाजाची गरज आहे. तिथे कदाचित केएल राहुल किंवा करुण नायर तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतात. ज्यामुळे शुभमन गिलला चौथ्या क्रमांकावर खेळण्याची मुभा मिळू शकते. जेव्हा गोष्टीं स्थिर होतील, तेव्हा गिल पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो.'

पाँटिंगने असंही म्हटलंय की अतिरिक्त जबाबदारीचा फारसा फरक गिलवर पडेल असं वाटत नाही. तो त्यासाठी सज्ज असल्याचे दिसत आहे. तो पुढील १० वर्षे तरी भारतीय क्रिकेट वर्तुळात असेल.

गिलच्या कमतरता स्पष्ट करताना पाँटींग म्हणाला, 'गिलने मानसिकरीत्या तयार असणे आवश्यक आहे. त्यांच्या टेक्निकमध्ये काही समस्या नाहीत. पण कधीकधी एखाद्या खेळीदरम्यान त्याचा आळस दिसतो. कसोटीमध्ये सहा-सात तास आणि प्रत्येक चेंडूसाठी १००% समर्पित राहावे लागते. हेच गिलसमोरचं मोठं आव्हान आहे.'

'काही दिग्गज कसोटी फलंदाजांकडे रक्षणात्मक फलंदाजी उत्कृष्ट नसली तरी, ते फारसं चिंतेचं नाही. कारण त्यांचं जर त्यांचं त्यांच्या शॉट्सवर नियंत्रण असतं. कसोटीमध्ये रक्षण महत्त्वाचं आहे, पण त्यापेक्षाही मानसिकता अधिक महत्त्वाची आहे,' असे पाँटींग विरेंद्र सेहवागची तुलना करताना म्हणाला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.