पंतप्रधान मोदी जी-७ शिखर परिषदेला उपस्थित राहणार, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी फोन करून त्यांना आमंत्रित केले आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर निशाणामुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान एकांगी आहे. फक्त ब्राह्मण समाजच साखरेचे काम करत नाही तर राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेत महाराष्ट्रातील सर्व जाती धर्म महाराष्ट्राची संस्कृती जपण्यात अमृततुल्य काम करत आहेत. असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
गुजरात काँग्रेसच्या सरचिटणीसांना अटकऑपरेशन सिंदूरवर वादग्रस्त भाष्य केल्यानंतर गुजरात काँग्रेसचे सरचिटणीस राजेश सोनी अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे
ठाकरे गट अन् मनसेच्या युतीबाबत फडणवीस काय म्हणाले?''मी सध्या यावर कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही. ठाकरे बंधूंच्या युतीवर मी योग्य वेळी बोलेन. कारण या दोघांच्या युतीशी माझा काहीही संबंध नाही. त्यामुळे माझ्या राजकीय अनुभवावरुन मी योग्य वेळी बोलेल.'' असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
खामगावात महायुतीतील संघर्ष टळणार की वाढणार?खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दोन राजकीय कट्टर विरोधक आता एकत्र येणार आहेत. काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश निश्चित झाला आहे. त्या मुळे भाजपमध्ये मोठी अस्वस्था निर्माण झाली आहे. एका म्यानात दोन तलवारी कशा बसणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी स्वतः सानंदा यांनीच पुढाकार घेतला आहे. पक्ष प्रवेश समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आपण भाजप आणि महायुतीच्या सर्व नेत्यांकडे जाऊन निमंत्रण देणार असल्याचे सांगून स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता भाजप नेत्यांची अडचण झाली झाली आहे. या समारंभाला कोण जाणार, कोण नाही याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागली आहे.
उद्धव ठाकरेंच्या विधानावर एकनाथ शिंदेची प्रतिक्रियामहाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युतीबाबत उद्धव ठाकरे यांनी आज सूचक विधान केलं आहे. लवकरच महाराष्ट्राच्या मनात जे होणार आहे ते होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. यावर एकनाथ शिंदे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी केवळ हातच जोडले.