फड्नाविस व्हा, गडचिरोली : राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीत मुक्कामी आहेत. इथे मुक्कामी राहणारे कदाचित ते पहिलेच मुख्यमंत्री असून त्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री असताना ते दुसऱ्यांदा नक्षलग्रस्त गडचिरोलीत मुक्कामी आहेत. यापूर्वी 2019 च्या निवडणुकीदरम्यान ते गडचिरोली येथे मुक्कामी राहिले होते. सध्या मुख्यमंत्र्यांचा मुक्काम गडचिरोली पोलीस दलाच्या रेस्ट हाऊसमध्ये आहे. दरम्यान, शनिवारी (दि.7) कुठलाही कार्यक्रम गडचिरोली येथे आयोजित नसताना ते गडचिरोलीत मुक्कामी आहेत. त्यामुले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मोर्चे बांधणी आणि पक्ष अंतर्गत असलेली गटबाजी दूर करण्यासाठी तर हा मुक्काम नाही ना? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोली दौऱ्यादरम्यान स्थानिक बंधू बघिनींसह संवाद साधला. खरंतर हेच आमचे मालक आहे, आम्ही त्यांचे सेवक आहोत. यावेळी एका चिमुकलीशी बोलणे झाले, तिला शाळेत जाण्यासाठी सायकल देण्याचा शब्दही त्यांनी दिला.
शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीदरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, एनएचआय यांनी लोकाभिमुखता राखून प्रकल्प पूर्ण करावे, प्रकल्पांना गती द्यावी, असे निर्देश दिले. तसेच वडसा ते गडचिरोली रेल्वे प्रकल्पासाठीचे भूसंपादन लवकरात लवकर पूर्ण करावे. माझ्या अजेंड्यावर गडचिरोली जिल्हा अग्रक्रमाने असून शासनाच्या सर्व विभागांनीदेखील गडचिरोली जिल्हा अग्रक्रमावर ठेऊन काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
यावेळी देवेंद्र फडणीस यांनी गडचिरोली पोलीस दलाच्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ उपक्रमामार्फत आयोजित भव्य जनजागरण मेळाव्यादरम्यान कवंडे आऊटपोस्ट व पोलीस स्टेशनची पाहणी केली. तसेच उपस्थित ग्रामस्थ व जवानांसोबत संवाद साधला. सामान्य ग्रामस्थांचा शासन-प्रशासनावरील वाढता विश्वास आणि विकासाप्रती सकारात्मकता हे बदलत्या गडचिरोलीचे द्योतक आहे. आता सुरक्षा, सुव्यवस्था आणि सकारात्मकता ही गडचिरोलीची नवी ओळख बनत आहे, असंही फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, पावसाळ्याच्या कालावधीमध्ये अचानकपणे पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही, यावर लक्ष ठेवावे. यासंदर्भात राज्य व जिल्हा स्तरावर समन्वय साधण्यासाठीची व्यवस्था उभी करण्यात आली आहे. ही व्यवस्था योग्यप्रकारे चालली पाहिजे, याकडे लक्ष द्यावे. पूर परिस्थितीमुळे संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये प्राथमिक गरजांची व्यवस्था प्रत्यक्षात झाल्याची खात्री करुन घ्यावी. तसेच यादरम्यान गर्भवती महिलांच्या व्यवस्थेकडे लक्ष द्यावे. सोबतच, गावांचा संपर्क तुटू नये यासाठी 5 टप्प्यातला कार्यक्रम राबवण्यात येत असून त्यातील किमान 2 टप्पे यावर्षी सुरु करण्यासाठी प्रयत्न करावे व आगामी 3-4 वर्षात उर्वरित टप्पे पूर्ण करावे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
गिरीश महाजन अन् गुलाबराव पाटलांची शिष्टाई फळाला, अखेर एकनाथ शिंदेंचे रखडलेले विमान उडाले
आणखी वाचा