फळे: आपण रात्री खाऊ शकता?
Marathi June 08, 2025 10:25 PM

फळे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात, त्यामुळे दिवसभर काही तासांच्या अंतराने फळे खाल्ली जातात. काहींना रात्री झोपताना किंवा रात्रीचे जेवण झाल्यावर फळे खायची सवय असते. पण, आरोग्याच्यादृष्टीने ही सवय हितकारक नाही. तुम्ही जर रात्री फळे खाल्लीत तर फायद्याऐवजी नुकसानचं होऊ शकते. यामुळे चयापचय दर मंदावतो, वजन वाढू लागते, झोपेवर दिर्घ परिणाम होतो. फळे अनेक पोषक घटकांनी समृद्ध असली तरी फळे खाताना वेळेचं भान असावं, असे तज्ज्ञ सांगतात. आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात, रात्री फळांचे सेवन केल्याने शरीरावर काय परिणाम होतो.

पचन समस्या –

रात्रीच्या वेळी शरीराची चयापचयाचा दर मंदावतो . परिणामी, पचनक्रियाही हळू होते. अशा परिस्थितीत, तुम्ही रात्री फायबरयुक्त फळे जसे की, सफरचंद, नाशपती, केळी खाल्ल्यास अपचन, गॅस आणि पोटफुगीची समस्या सुरू होतात. तुम्हाला दररोज रात्री जेवल्यानंतर जर अशी फळे खाण्याची सवय असल्यास पचनसंस्था कमजोर होते. त्यामुळे रात्री फळे खाणे टाळायला हवीत.

रक्तातील साखरेची पातळी वाढते –

फळांमध्ये नैसर्गिकरित्या साखर असते, जी खरं तर शरीराला दिवसभर नैसर्गिकरित्या ऊर्जावान बनवते. पण, जेव्हा तुम्ही रात्री फळे खाता तेव्हा फळातील साखर वापरण्यास वेळ मिळत नाही. परिणामी, रक्तातील साखर अचानक वाढू लागते. त्यामुळे ज्या रूग्णांना डायबिटीस आहे त्यांनी रात्री फळे खाऊ नयेत.

वजन वाढीचा धोका –

रात्रीच्या वेळी शरीरातील ऊर्जेचा वापर कमी करतो, ज्यामुळे अतिरिक्त कॅलरीज साठवल्या जातात. विशेष करून केळी,आंबा आणि चिकू यासारखी उच्च कॅलरीज असलेली फळे खाल्ल्याने वजन वाढू शकते.

झोपेवर परिणाम –

रात्री फायबर किंवा साखरेचे प्रमाण जास्त असलेली फळे खाल्ल्याने झोपेवर परिणाम होऊ शकतो. कारण गोड फळे रक्तातील साखर वाढवतात, ज्यामुळे मेंदू सक्रिय होतो आणि झोपेत व्यत्यय निर्माण होतो.

 

 

 

 

हेही पाहा –

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.