Ratnagiri Accident : रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्गावर रत्नागिरी जवळ रविवारी एलपीजी गॅस टॅंकर आणि मिनी बसमध्ये जोरदार टक्कर होऊन भीषण अपघात झाला. यानंतर, गॅस गळती झाल्याने भयंकर आग लागली. ही आग एवढी भीषण होती की, यात घर, एक गोशाळा आणि काही गाड्या खाक झाल्या. याची झळ एका आंब्याच्या पेटीला देखील बसली. या अपघातामुळे मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. (ratnagiri lpg tanker and mini bus collision fire due to gas leak)
रविवारी सकाळी मुंबई – गोवा महामार्गावरील निवाली घाटात एक मिनी बस आणि गॅस टॅंकरमध्ये जोरदार टक्कर झाली. यामुळे बसमधील 29 शिक्षक आणि बस चालक जखमी झाले आहेत. यात 16 महिला आणि 14 पुरुषांचा समावेश आहे. या अपघातात उलटलेल्या टॅंकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती होत असल्याने महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली. जखमींना तातडीने रत्नागिरी जिल्हा न्यायालयात नेण्यात आले.
गेल्या जवळपास 4 ते 5 तासांपासून मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. गोव्यावरून येणारी वाहतूक ही पाली आणि उक्षीमार्गे वळवण्यात आली आहे. तर मुंबईवरून गोव्याला जाणारी वाहतूक संगमेश्वरमार्गे वळवण्यात आली आहे. तज्ज्ञांचे एक पथक घटनास्थळी पोहोचली असून टॅंकरमधून गॅस काढण्याचे काम सुरू आहे.
हेही वाचा – Sanjay Raut : …तर पंतप्रधान मोदींवर गुन्हा दाखल होऊ शकतो, काय म्हणाले संजय राऊत
हवेत पसरलेल्या गॅसवर नियंत्रण आणणे कठीण असल्याने आसपासच्या घरांमध्ये आणि एका गोशाळेत आग लागली. यामुळे सुरक्षितता म्हणून आसपासची घरे रिकामी करण्यात आली आहेत.