Kishori Pednekar On Nitesh Rane मुंबई : कोकणात राणे बंधुंमध्ये संघर्ष पेटलाय का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवसेनेचे कुडाळचे आमदार निलेश राणे आणि त्यांचे सख्खे भाऊ असलेले मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे यांचं शाब्दिक युद्ध रंगलं आहे. नितेश यांनी जपून बोलावं, आपण सभेत बोलल्याने नेमका कोणाचा फायदा करतोय याचं भान असावं अशी समज आमदार निलेश राणे यांनी आपल्या भावाला दिली आहे. धाराशिवमध्ये जाहीर सभेत नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर निलेश राणेंनी एक्स पोस्टच्या माध्यमातून ही समज दिली. मात्र, त्यावरून नितेश राणे यांनीही प्रत्युत्तर देत निलेशजी तुम्ही “टॅक्स फ्री आहात असं म्हटलं”, त्यामुळे दोन भावांमधील वाद आणखी चिघळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राणें बंधुंच्या वादावर निशाणा साधला आहे. (Kishori Pednekar On Nitesh Rane mumbai shivsena ubt meet maharashtra politics news in marathi)
मुंबईत झालेल्या अवकाळी पावसानंतर मुंबईची तुंबई झाली. पहिल्याच पावसात मुंबईकरांचे झालेले हाल लक्षात घेत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला ठाकरे गटाचे पदाधिकारी, विभागप्रमुख आणि नेतेमंडळी उपस्थित होते. मातोश्री येथे ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी किशोरी पेडणेकर यांनी राणे बंधुंवर निशाणा साधला.
“नितेश राणे यांनी अतिशय सांभाळून बोललं पाहिजे, असे मला वाटते. तुमच्या सोबत घेतलेल्या आणि उडी मारून मांडीवर येऊन बसलेल्या पक्षांना तुम्ही फसवत आहात. विरोधक म्हणून आम्ही त्या गोष्टींना फारस विचारत घेत नाही. परंतु, सत्तेतील पक्षाला फसवू नका असे आता आम्हाला सांगायची वेळ आली आहे”, असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी राणे बंधुंना टोला हाणला.
“नितेश ने जपून बोलावे, मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे.
आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही”, अशा शब्दांत एक्सवरून शिवसेना आमदार निलेश राणे यांनी भाजप आमदार नितेश राणेंना समज दिली.
सातत्ताने शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर होत असलेल्या टीकेलाही किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यानुसार, “अदानी दिलेल्या भूखंडावर कोणतेच सत्ताधारी बोलत नाहीत. सर्वांना नरेटीव्ह पसरवायचा आहे, त्यामुळे सगळेजण आदित्य ठाकरेंवर बोलत आहेत. पण आता लोकं हुशार झालेली आहेत. विरोधक आदित्य ठाकरे यांना का टार्गेट करत आहेत, तर आदित्य ठाकरे यांच्यासारखे नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात निर्माण झालेलं आहे. त्या नेतृत्वाला संपवल्यास आपल्याला जे साध्य करायचे आहे ते साध्य होऊ शकतं असे त्यांना वाटत आहे”, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.
याशिवाय “मुळात ज्यांनी चूक केली आहे, त्यांना शिक्षा होऊदे. दूध का दूध और पाणी का पाणी होगा असं उपमुख्यमंत्री म्हणाले होते. पण आम्ही किती वेळा दूध का दूध और पानी का पानी करून झालो. पण आम्हाला उत्तरचं मिळत नाहीत”, असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
हेही वाचा – Devendra Fadnavis : लेखाचं उत्तर लेखानं दिलं; आता राहुल गांधी असं बोलणार नाहीत – फडणवीस