Nitesh should speak carefully… Nilesh Rane gave advice to his brother
Marathi June 09, 2025 05:25 AM


नेहमी आपल्या आक्रमक वक्तव्यामुळे चर्चेच असणारे भाजप नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी आपल्या आक्रमक शैलीतून शिवसेनेला इशारा दिला. धाराशिव येथे भाजपच्या मेळाव्यात बोलताना राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

नेहमी आपल्या आक्रमक वक्तव्यामुळे चर्चेच असणारे भाजप नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी आपल्या आक्रमक शैलीतून शिवसेनेला इशारा दिला. धाराशिव येथे भाजपच्या मेळाव्यात बोलताना राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या कामांवर स्थगिती मिळाल्याच्या कारणावरुन त्यांनी थेट चेतावणी देत महायुतीत भाजपचा प्रभाव अधोरेखित केला आहे. नितेश राणे म्हणाले, “सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय, हे लक्षात ठेवा.” त्यांच्या या वक्तव्यांमुळे महायुतीमधील राजकारण तापन्याची शक्यता आहे. राणे यांनी पुढे असेही म्हटले की, “कोणी कितीही ताकद दाखवली, कोणीही कसेही नाचले तरी देशात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री आहेत.” मात्र या विधानामुळे नितेश राणे यांचे बंधू व शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी एक्सवर पोस्ट करत ‘नितेशने जपून बोलावे’ असा सल्ला दिला आहे.(Nilesh Rane : Nitesh should speak carefully… Nilesh Rane gave advice to his brother)

काय म्हणाले निलेश राणे

नितेश ने जपून बोलावे… मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही.

नितेश राणेंकडून एक्सवर पोस्ट

निलेश राणेंनी समज दिल्यावर मंत्री नितेश राणेंनीही एक्सवरून उत्तर दिलंय. तुम्ही टॅक्स फ्री आहात, असं उत्तर नितेश राणेंनी दिलं

काय म्हणाले होते नितेश राणे ?

धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपाच्या स्थगितीवर बोलताना, राणे यांनी घटक पक्षांना इशारा देत, म्हटले की, “कोणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचले तरी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय, हे लक्षात ठेवा.” त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली धाराशिवच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असेही स्पष्ट केले. शिवसेने नेते आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या कामांना भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या तक्रारीनंतर स्थगिती देण्यात आली आहे. त्या, अनुषंगाने भाजपच्या मेळाव्यात बोलताना नितेश राणेंनी महायुतीचा मुख्य घटक पक्ष असलेल्या शिवसेना नेत्यांना थेट इशाराच दिला आहे. यामुळे आता महायुतीमध्येच राजकारण तापण्याची शक्यता आहे.

हेही वाचा…Shivsena UBT-MNS : राज – उद्धव ठाकरे एकत्र येण्यात अडचण – अडथळा कोणता; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं





Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.