Devendra Fadnavis On Rahul Gandhi Article War In Maharashtra News In Marathi
Marathi June 09, 2025 05:25 AM


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुर्वनियोजित पुणे दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना टोला हाणला. त्यानुसार, “मी लेखाचं उत्तर लेखानं दिलं आहे. सर्व फॅक्ट आणि फिगरसहित उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आतातरी राहुल गांधी अशाप्रकारचे बोलणं सोडतील”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना टोला हाणला.

Devendra Fadnavis On Rahul Gandhi पुणे : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या लेखाला मी लेखानेच उत्तर दिलं आहे, असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. (Devendra Fadnavis On Rahul Gandhi Article War In Maharashtra News In Marathi)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुर्वनियोजित पुणे दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना टोला हाणला. त्यानुसार, “मी लेखाचं उत्तर लेखानं दिलं आहे. सर्व फॅक्ट आणि फिगरसहित उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आतातरी राहुल गांधी अशाप्रकारचे बोलणं सोडतील”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना टोला हाणला.

नेमकं प्रकरण काय?

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात लिहिलेला ‘मॅच-फिक्सिंग महाराष्ट्र’ हा लेख एक्स प्लॅटफॉर्मवर शेअर केला. त्यात त्यांनी गंभीर आरोप केले. 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका या लोकशाही यंत्रणेमध्ये हेराफेरी करण्यासाठी तयार केलेला मॅच फिक्सिंगचा आराखडा होता. आता हेच प्रकार बिहारमध्येही होणार आहे. भाजपला जिथे जिथे हार पत्करावी लागते तिथे अशा प्रकारची गैरकृत्ये केली जातात, अशी टीका राहुल गांधी यांनी शनिवारी केली.

राहुल गांधींच्या याच लेखाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यानुसार, “राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाबाबत काही पुरावे उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोग त्यांना नक्कीच उत्तर देईल. पण मुख्य मुद्दा म्हणजे लोकशाही प्रक्रियेचा आणि लोकांच्या जनादेशाचा सतत होणाऱ्या अपमानामुळे जनतेने राहुल गांधींना नाकारले आहे आणि सूड म्हणून ते जनतेला आणि त्यांच्या जनादेशाला नाकारत आहेत. यामुळे काँग्रेस पक्ष आणखी अडचणीत येईल. त्यांच्याच पक्षाचे आमदार एका दिवसात कोणालाही भेटण्याची वेळ मिळावी असे आव्हान देणारी विधाने का करतात याचे त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. लोकशाही प्रक्रिया आणि संवैधानिक संस्थांबद्दल सतत शंका उपस्थित करून ते देशाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहेत आणि कोणते विष पसरवत आहेत याची त्यांना जाणीव असली पाहिजे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हेही वाचा – Sanjay Raut : …तर पंतप्रधान मोदींवर गुन्हा दाखल होऊ शकतो, काय म्हणाले संजय राऊत



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.