- rat९p२९.jpg-
P२५N६९४९९
मंत्री नीतेश राणे
---------
मिरकरवाडा बंदरासाठी २६ कोटी
मंत्री नीतेश राणे ; मत्स्य व्यवसाय, बंदरे विभागाची बैठक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : कोकणाच्या विकासासाठी रत्नागिरीतील मिरकरवाडा हे बंदर महत्त्वाचे आहे. त्यामधून लोकांच्या आर्थिक उन्नतीला चालना मिळणार आहे. या बंदरासाठी २६ कोटी २३ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या मत्स्य बंदरांची कामे गतीने व पारदर्शकतेने पूर्ण करावीत, असे आदेश मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी दिले.
मंत्रालयात मत्स्य व्यवसाय व बंदरे विभागाची आढावा बैठक मंत्री श्री. राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला विभागाचे आयुक्त किशोर तावडे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठक, उपसचिव श्री. जकाते, सहआयुक्त दिनेश देवरे, प्रादेशिक उपायुक्त प्रकाश भादुले आदी उपस्थित होते.
मंत्री राणे म्हणाले, महाराष्ट्र मत्सोद्योग विकास महामंडळाच्यावतीने सुरू असलेल्या मत्स्य बंदरांचा विकास व आधुनिकीकरणाच्या कामांचा आढावा घेतला. यामध्ये मुंबई शहरातील ससून डॉक, रायगड जिल्ह्यातील कारंजा (उरण), सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आनंदवाडी व रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा या मासेमारी बंदर विकासासाठी होत असलेल्या कामांची माहिती घेतली. कोकणातील सात विविध ठिकाणी होत असलेल्या मासे हाताळणी केंद्रातील कामांचाही आढावा घेतला. येथील बंदरांच्या ठिकाणी मासे लिलाव शेड, बर्फ कारखाना, वर्कशॉप, मासेमारीच्या जाळ्यांची दुरुस्ती व निगा राखण्यासाठी शेड, प्रसाधनगृह यासह विविध काम केली जाणार आहेत. मिरकरवाडा बंदरात ही कामे करण्यासाठी २६ कोटी २३ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.