Ajit Pawar explains absence of Dattatray Bharane, Dilip Walse Patil and Chhagan Bhujbal from NCP anniversary
Marathi June 11, 2025 09:25 AM


मंत्रि‍पदी वर्णी लागल्यानंतरही आज (10 जून) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यात छगन भुजबळ यांनी दांडी मारली. याशिवाय पक्षातील दोन ज्येष्ठ नेतेही अनुपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चा रंगण्याची शक्यता लक्षात घेऊन अजित पवार यांनी नेत्यांच्या अनुपस्थितीवर स्पष्टीकरण दिलं.

पुणे : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेत आलं. मात्र महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आले होते. त्यामुळे नाराज झालेल्या छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत थेट अजित पवारांवर टीका केली होती. मात्र, गेल्याच महिन्यात छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. परंतु मंत्रि‍पदी वर्णी लागल्यानंतरही आज (10 जून) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यात छगन भुजबळ यांनी दांडी मारली. याशिवाय पक्षातील दोन ज्येष्ठ नेतेही अनुपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चा रंगण्याची शक्यता लक्षात घेऊन अजित पवार यांनी नेत्यांच्या अनुपस्थितीवर स्पष्टीकरण दिलं. (Ajit Pawar explains absence of Dattatray Bharane, Dilip Walse Patil and Chhagan Bhujbal from NCP anniversary)

बालेवाडी क्रीडा संकुलात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 26 वा वर्धापन दिन सोहळा पुण्यात होत असला, तरी राज्याच्या इतरही काही भागात आपला वर्धापन दिनाचा कार्यक्रम साजरा होत आहे. या गोष्टीचं मला समाधान आहे. मात्र, आजच्या या कार्यक्रमाला आपले काही कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. छगन भुजबळ यांचा आधीच विदेश दौरा ठरलेला होता. तर दत्‍तात्रय भरणे यांचाही 30 दिवसांपूर्वी विदेश दौरा ठरलेला होता. तसेच दिलीप वळसे पाटील यांची तब्येत बरी नाही. सोमवारी देखील ते एका कार्यक्रमाला आले नव्हते. त्यामुळे आजच्या आपल्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला हे तिन्ही प्रमुख नेते उपस्थित राहू शकले नाहीत, असे अजित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा – Ajit Pawar : आपण साधू संत नाही; बहुमतावरून अजित पवार काय म्हणाले?

लोकसभेतील पराभवानंतर लाडकी बहीण योजना आणली

लाडकी बहीण योजनेच्या निधीवरून होणाऱ्या आरोपावर बोलताना अजित पवार म्हणाले की, काही जणांनी विधानं केले की, मी सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला. पण सर्वांना माहिती आहे की, या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत असताना आदिवासी विभागाला आपण 41 टक्के निधी वाढवून दिलेला आहे. पण ही माहिती सर्वांसमोर येत नाही. तसेच लोकसभेच्या निवडणुकीत आपला 75 टक्के पराभव झाला. आपली फक्त एक जागा निवडून आली. त्यावेळी आपण विचार केला की, आपली काय चूक झाली. त्यानंतर आपण लाडकी बहीण योजना पुढे आणली. मी राज्यात फिरत असताना सर्वांना सांगत असतो की, सर्व सोंग करता येतात पण पैशांचं सोंग करता येत नाही. राज्याच्या उत्पन्नात देखील वाढ झाली पाहिजे. त्यासाठी काही निर्णय आम्हाला घ्यावे लागतात. पण कधीकधी बातम्या येतात की, अजित पवार पैसे सोडत नाही. मग मी काय पैसे खिशात घेऊन बसतो का? असा टोलाही अजित पवार यांनी विरोधकांना लगावला.

हेही वाचा – Supriya sule : संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलाय…; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुळेंचं मोठं वक्तव्य



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.