इतिहासाच्या अनेक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या प्रतापगड किल्ल्यावर दुबई स्थित असणारे प्रसिद्ध त्रिविक्रम ढोल पथकाने किल्ल्याच्या बुरुजावर सहा वादकांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सप्ताहातील शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून ढोल ताशाच्या गजरात अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे.. रक्षक प्रतिष्ठान यांच्यावतीने त्यांना साताऱ्यातील प्रतापगडावर निमंत्रित करण्यात आले होते दुबई स्थित असणाऱ्या या त्रिविक्रम ढोल ताशा पथकाने संपूर्ण आखाती प्रदेशामधील मानाचे पहिले ढोल ताशा पथक होण्याचा लौकिक मिळवला आहे.. बाहेर देशातून प्रतापगडावर येऊन वादन करणारे हे पहिलेच ढोल ताशा पथक ठरले आहे..
उदगीर मध्ये अनधिकृत खताचा साठा जप्त. पोलिसात गुन्हा दाखल... कृषी विभागाची कारवाई...लातूरच्या उदगीर येथे कृषी विभागाच्या पथकाने अनधिकृत खाताचा साठा जप्त करत, कारवाई केली आहे... दरम्यान या कारवाईत तब्बल 6 लाख रुपयांचा अनधिकृत खत जप्त केलाय... उदगीर येथे शेतकऱ्यांना खत विक्री करत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती.,कृषी विभागाच्या पथकाने अचानक छापा टाकत तब्बल 345 बोगस खताची पोते जप्त केला आहे... तर या प्रकरणी उदगीरच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे..
दरम्यान पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या पदरात बोगस खत बी बियाणे पडू नये याकरिता कृषी विभागाचे 11 पथक तैनात करण्यात आले आहेत..
अजित पवारांच्या कार्यपध्दतीविषयी शिवसेनेच्या मंत्र्यांमध्येच मतभिन्नता;निधी वाटपावरून अनके मंत्र्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवर थेट नाराजी व्यक्त केली जात असतानाच शिवसेनेच्या मंत्र्यांमध्येच आता मतभिन्नता असल्याचं समोर आले आहे.
शिवसेनेचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी अजित पवार शिवसेनेच्या मंत्र्यांना विश्वासात घेत नाहीत असा थेट आरोप करत त्यांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली आहे तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मात्र अजित पवार यांच्या सारखा अर्थ मंत्री सर्व राज्यांना लाभावा अशी स्तुती केली आहे. अजित पवार यांच्या विषयी शिवसेनेच्या दोन मंत्र्यांनी परस्पर विधाने केल्याने शिवसेना मंत्र्यांमधील अंतर्गत धुसफूस देखील या निमित्ताने पुढे आली आहे.
जालन्यातील भोकरदन तालुक्यातील अन्वा येथून हरिनामाच्या जयघोषात दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान...पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थव्रत,राज्यभरातून पांडुरगाच्या भेटीसाठी पालख्या आणि दिंड्या आषाढी वारी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे.मराठवाड्यातील छोटे पंढरपूर अशी ओळख असलेल्या जालन्यातील भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र अन्वा येथून मानाच्या दिंडीचे हरिनामाच्या जयघोषात आषाढी वारीसाठी पंढरपुढे प्रस्थान झाले आहे. 22 दिवसात ही दिंडी 450 किलोमीटरचे अंतर पार करून पंढरपूर येथे पोहोचणार आहे.जवळपास 272 वर्षापासून ही दिंडी नित्यनेमाने सुरू असून दरवर्षी शेकडो भाविक या दिंडीत सहभागी होत असतात.
इमारत रिकामी करण्यासाठी अतिक्रमण विभागाची धमकी!'अंबरनाथमध्ये पुनर्विकासासाठी गेलेली इमारत रिकामी करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणताही पत्रव्यवहार न करता रहिवाशांना थेट धमकी दिल्याचा आरोप नवरे नगर परिसरातील रहिवाशांनी केला आहे. या प्रकारामुळे अतिक्रमण विभागाचे अधिकारी शहरातील अतिक्रमणं हटवायची सोडून बिल्डरांचे एजंट म्हणून काम करू लागले आहेत का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
दरवर्षी एक हजार नवीन इलेक्ट्रिक बस खरेदी करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहितीपर्यावरणाच्या दृष्टीने आणि इंधन बचत करण्यासाठी इलेक्ट्रिक बस खरेदी करणे ही एसटी महामंडळासाठी काळाची गरज आहे. त्यासाठी आता दरवर्षी किमान 1000 नवीन इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा विचार आहे. तसा प्रस्ताव देखील तयार करण्यात आला आहे ,अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पंढरपुरात दिली.
एका खाजगी कंपनीला 5150 इलेक्ट्रिक बस तयार करण्याचा ठेका दिला आहे .परंतु त्या पुरवठा कंपनीने आतापर्यंत फक्त 220 इलेक्ट्रिक बसेस परिवहन विभागाला दिल्या आहेत . इलेक्ट्रिक बसची संख्या वाढवण्यासाठी एसटी महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या पंचवार्षिक योजनेमध्ये दरवर्षी किमान 1000 नवीन इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात येतील. एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे तसा प्रस्ताव देखील दिला आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये पंढरपुरात आषाढी यात्रा तयारी आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी इलेक्ट्रिक बस गाड्या विषयी माहिती दिली.
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस...अनेक घरांचे नुकसानअमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये अचानक आलेल्या वादळीवारासह मुसळधार पाऊस झाला यासह नांदरुण या भागामध्ये अचानक ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतांमध्ये पाणी साचलेले होते.तर रामतीर्थ येथे वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसडली व गोरगरीब जनतेच्या घराचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .प्रशासनाने ढगफुटी ठिकाणी पाहणी केली आहे तर ज्या जनतेच्या घरांचे नुकसान झाले आहे त्या जनतेला शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
वारकऱ्यांच्या सुख सुविधांसाठी प्रशासनाची युद्ध पातळीवर तयारी सुरूआषाढी वारीसाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अठरा जूनला देहातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना सुख सुविधा देण्यासाठी नगरपंचायतीने जय्यत तयारी सुरू केली आहे. स्वच्छतेची कामे युद्ध पातळीवर करण्यात येत असून वारकऱ्यांना अडचण होऊ नये यासाठी नगरपंचायत च्या वतीने, अतिक्रमण हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. नगरपंचायत च्या वतीने सीसीटीव्ही सुद्धा लावण्यास सुरुवात केलेली आहे. भाविकांच्या स्वच्छतेसाठी बाराशे मोबाईल टॉयलेट शासनाच्या वतीने आम्हाला मिळालेली आहे. इंद्रायणी घाट, देहूतील सर्व रस्त्यांची साफसफाई सुरू असून इंद्रायणी घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याची डाग डुगी सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे.. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहू मध्ये दाखल होत असताना त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून एस आर पी एफ, एन डी आर एफ, आर सी बी, आणि स्थानिक पोलीस यंत्रणा कार्यरत करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे महिलांची छेडछाड, सोन साखळी चोरीचा प्रकार होऊ नये यासाठी महिला दामिनी पथकाचीही एक तुकडी तयार करण्यात आलेली आहे. पालखी दरम्यान कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी साध्या वेशात पोलीसही तैनात करण्यात आलेली आहे
नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची शक्कलनवी मुंबईच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात महापालिका आणि सिडको अधिकाऱ्यांमुळे अनाधिकृत इमारती मोठ्या प्रमाणात उभा राहत आहेत अशाच प्रकारे बेलापूर मधील शहाबाज गावातील निर्मल भवन
पाच मजली इमारत अनाधिकृत आहे मात्र महानगरपालिकेने नोटीस बजावून सुद्धा तसेच बिल्डरवर गुन्हा दाखल झाला असताना सुद्धा मात्र महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून केवळ नोटीस देण्याचा काम केलं जातं त्यामुळे अधिकाऱ्यांनी नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई न करण्याची शक्य लढवली आहे केवळ पालिकेकडून नोटीस बजावली जाते मात्र कारवाई केली जात नाहीये त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बिल्डिंग उभा राहत आहेत