पुण्यातून 4 बांगलादेशी नागरिकांना अटक; लष्करी इंटेलिजन्स अन् पोलिसांची कारवाई
Marathi June 15, 2025 01:25 AM

पुणे : राज्यात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकांचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभही या बांगलादेशी नागरिक महिलांनी घेतल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. तेव्हा, मुंबई पोलिसांनी या महिलांना अटकही केली होती. आता, पुण्यातही (Pune) 4 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. लष्करी गुप्तचर विभाग आणि कोंढवा पोलिसांनी (police) संयुक्तपणे ही कारवाई केली. दरम्यान, बांगलादेशी नागरिक बनावट आधार कार्ड बनवून मजुरी व बांधकाम क्षेत्रात काम करत असल्याचं यापूर्वी देखील समोर आलं आहे.

बनावट आधार कार्डचा वापर करुन सोलापुरात राहणाऱ्या 12 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. सोलापुरातील एमआयडीसी परिसरातील एका गारमेंट कारखान्यात हे सर्वजन कामगार म्हणून कामाला होते. सोलापूर शहर पोलिसांना या बाबतीत गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी या सर्व बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेत चौकशी केली. यावेळी त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड असल्याचे पोलिसांना आढळून आले होते. आता, पुणे पोलिसांनीही अशीच कामगिरी केली आहे. शहरातील कोंढवा परिसरातील एका मजूर वसाहतीतून या चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पळून जात असलेल्या या बांगलादेशींना लष्कर गुप्तचर विभाग आणि पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.  स्वप्न मोंडल, मिथुन कुमार सांतल, रणधीर मोंडल आणि दिलीप मोंडल अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.

किरीट सोमय्यांनी घातलं होतं लक्ष

दरम्यान, महाराष्ट्रात बांगलादेशी रोहिंग्यांची व्याप्ती वाढत असल्याचे सांगत भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अमरावती पोलीस स्टेशनला भेट दिली होती. याठिकाणी 5 हजार लोकं आहे जे इथले असूच शकत नाही. त्यांनी जे 50-70 वर्ष जुने पुरावे दिले ते आतापर्यंत काय करत होते. ज्यांनी जन्म प्रमाणपत्र मिळवले त्यांच्यावर या प्रकरणी कारवाई होईल. या बांगलादेशी नागरिकांचे जन्म प्रमाणपत्र रद्द होईल, असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले होते. अमरावती आणि अकोल्यातही बनावट कादपत्रांच्या आधारे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे, बांगलादेशी रोहिंंग्यांचा मुद्दा महाराष्ट्रात चांगलाच चर्चेत होता. तर, किरीट सोमय्यांनी याबाबतीत पुढाकार घेतला होता.

हेही वाचा

मी चांगलं काम करेल, का 85 वर्षांचा? साखर कारखाना निवडणुकीतही अजित पवारांकडून वयाचा मुद्दा

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.