महायुती सरकार दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कर्ज माफी देत नसल्याने राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष खदखदत आहे. यातच अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांचा राग अनावर झाला आहे. यामुळे संतापलेला एक शेतकरी जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांच्या घरात पेट्रोलची कॅन घेऊन त्यांचे घर जाळण्यासाठी घुसल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री सरमांचा काँग्रेसवर आरोपकाँग्रेस सरकारमुळे पाकिस्तान अणुशक्ती बनला आहे, असा आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी केला आहे. काँग्रेसच्या ऐतिहासिक चुकीमुळेच भारताने पाकिस्तानला अणुशक्ती बनू दिले. असं सरमांना म्हटलं आहे.
पाच आंतरराष्ट्रीय विद्यापिठांना लेटर ऑफ इंटेंट प्रदानमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रात कॅम्पस स्थापन करण्यासाठी 5 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना 'लेटर ऑफ इंटेंट' (LOIs) प्रदान केले. हा कार्यक्रम 'मुंबई रायझिंग - क्रिएटिंग अॅन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी’ अभियानांतर्गत आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदाबाद-लंडन विमान अपघातसारख्या कठीण प्रसंगी भारताच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल जागतिक समुदायाचे आभार मानले.