इस्त्राईल इराण युद्ध: इराण आणि इस्रायलमध्ये भयंकर युद्ध सुरू झाले आहे . दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले होत असून क्षेपणास्त्रे डागली जात आहेत .ज्यामुळे अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहेत .आता मध्य पूर्वमध्ये सुरू असलेलं हे युद्ध केवळ दोन देशांमध्ये राहिलं नाही तर त्याचा संपूर्ण जगावर व्यापक परिणाम होणार आहे . इस्त्रायलनं इराणवर तिसऱ्या दिवशी हल्ले सुरु ठेवले आहेत. इस्त्रायलनं इराणच्या संरक्षण मंत्रालयावर हल्ला केल्याचा दावा केला. इराणची राजधानी तेरहानमध्ये देखील हल्ले केल्याचा दावा इस्त्यालनं केला आहे. इराणमध्ये एका रहिवासी हल्ले झाले आहेत. या युद्धाचा भारतावर काय परिणाम होईल ? भारतासमोर कोणती आव्हान उभी राहतील ? जाणून घेऊया सोप्या शब्दात . .
भारत आणि पाकिस्तानच्या युद्धानंतर भारतासाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद आहे .दरम्यान इराक आणि इराणचे हवाई क्षेत्र हे बंद करण्यात आले आहे . या पार्श्वभूमीवर युरोप, अमेरिका किंवा कॅनडाला जाणाऱ्या कोणत्याही भारतीय विमानाला मोठा वळसा घालून जावे लागेल . परिणामी इराण इस्रायल युद्धाचा सर्वात मोठा फटका हवाई प्रवासाला बसू शकतो . भारतीय विमानांना लांब अंतर कापवे लागत असल्याने विमान भाडे वाढण्याची शक्यता आहे .
इराण इस्रायल युद्ध सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत . इराण इस्रायल युद्ध सुरू झाल्यानंतर केवळ दोन दिवसांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते की कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे .जर इराण इजराइल युद्ध असेच सुरू राहिले तर कच्च्या तेलाच्या किमती आठ ते नऊ टक्क्यांनी वाढवू शकतात असा तज्ञांचा अंदाज आहे .या परिस्थितीत भारताच्या आयात बिलामध्ये वाढ होऊ शकते . अल्पावधीत भारतावर इतका परिणाम होणार नाही असं सांगितलं जात आहे .
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगातील 20% तेल व्यापार होतो .ही सामुद्रधुनी उत्तरेला इराण आणि दक्षिणेला अरबस्थानशी जोडली गेली आहे .इराण आणि इज्रायलच्या युद्धामुळे जर या मार्गात अडथळे आले तर इराक,सौदी अरेबिया आणि युएईमधून येणारा तेल पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे .असे झाले तर भारताला तेल आयात करणे कठीण जाईल .ज्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतील .
इराण इज्रायल युद्ध लवकर संपलं नाही तर डॉलरची मागणी वाढेल असं तज्ञांचे मत आहे .असे झाले तर भारतीय रुपयावर थेट दबाव वाढेल .हा दबाव वाढल्याने देशाच्या व्यापार तुटीत व चालू खात्यातील तुटीवरही याचा परिणाम होऊ शकतो .रुपयाचे मूल्य कमी झाले तर खरेदी करत असलेल्या वस्तू अधिक महाग होतील .
भारतातील सुमारे एक कोटी लोक कामासाठी आखाती देशांमध्ये जातात .गेल्या वर्षभरात आखाती देशात कामासाठी गेलेल्या कामगारांनी 45 अब्ज डॉलर भारतात पाठवले .हे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर होते .मात्र इराण इस्रायल युद्ध आणखी भडकले तर अशा परिस्थितीत तब्बल एक कोटींहून अधिक कामगारांचे काम धोक्यात येईल .ज्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला फटका बसेल .
आणखी वाचा