मुंबई : सकाळी ६:३० वाजल्यापासून मुंबई शहराला चारही बाजूंनी पावसाने वेढले आहे. रिमझिम सरी नव्हे, तर काही भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही तासांपर्यंत शहरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरूच राहणार आहे. शहरातील निचऱ्याच्या भागांमध्ये आधीच पाणी साचू लागले असून वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.
राज्यात मॉन्सून सक्रिय; आज कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यतापुणे : राज्यात मॉन्सूनचा पाऊस सक्रिय होऊ लागला आहे. आज (ता. १६) कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात पाऊस वाढणार असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात मुसळधारेची शक्यता असल्याने सावधगिरीचा इशारा (रेड अलर्ट), कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज कोल्हापूर दौऱ्यावर येणारकोल्हापूर : केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले सोमवारी (ता. १६) जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. मंत्री आठवले सकाळी १०.३० वाजता कोल्हापूर विमानतळावर येतील. तेथून ते ११ वाजता शासकीय विश्रामगृहामध्ये येतील. येथे ते पत्रकार परिषदेला संबोधित करतील. त्यानंतर ११.३० वाजता ते कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील यांच्या ‘यशवंत बंगला’ येथे जाणार आहेत. तेथून दुपारी १२.३० वाजता कुरुंदवाड येथे गौतम ढाले यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. तेथून ते सांगलीकडे प्रयाण करतील.
Caste-wise Census : जातिनिहाय जनगणनेच्या प्रक्रियेला आजपासून होणार सुरुवातनवी दिल्ली : जातिनिहाय जनगणनेच्या प्रक्रियेला आजपासून (ता. १६) सुरुवात होणार आहे. उद्या जनगणनेची अधिसूचना प्रसिद्ध होईल. गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिल्लीत गृहसचिव, नोंदणी महासंचालक आणि जनगणना आयुक्त यांच्यासह गृह खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जनगणना प्रक्रियेच्या तयारीचा आढावा घेतला.
Sakav Bridge Collapsed : साकव कोसळून चौघांचा मृत्यू; आठ जण वाहून गेल्याचा अंदाजLatest Marathi Live Updates 16 June 2025 : राज्यात मॉन्सूनचा पाऊस सक्रिय होऊ लागला आहे. आज (ता. १६) कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात पाऊस वाढणार आहे. तसेच इंद्रायणी नदीवरील कुंडमळा (ता. मावळ) येथील सुमारे ३५ वर्षे जुना साकव (पूल) रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून सात ते आठ जण वाहून गेले आहेत. तर, उत्तराखंडातील केदारनाथ येथे रविवारी पहाटे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. गौरीकुंड परिसरातील त्रियुगीनारायणजवळ हा अपघात घडला. जातिनिहाय जनगणनेच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आज जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..