मुंबई : गुंतवणूकदारांसाठी शेअर बाजारातील दीर्घकाळातील गुंतवणूक फायदेशीर ठरली आहे. अनेक शेअर्सने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. मागील ५ वर्षांत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) च्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. पाच वर्षांत या शेअर्समध्ये तब्बल ५६९७ टक्के वाढ झाली आहे. या कालावधीत बीएसईच्या शेअर्सची किंमत ४५ रुपयांवरून २६०० रुपयांच्या पुढे गेली आहे.
उच्चांकी पातळी
Bombay Stock Exchange च्या शेअर्सनी गेल्या ५ वर्षात १ लाख रुपयांची गुंतवणूक ५७ लाख रुपयांपेक्षा जास्त केली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने आपल्या भागधारकांना दोनदा बोनस शेअर्स भेट म्हणून दिले आहेत. बीएसई शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ३०३० रुपये आहे. तर ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ७०५ रुपये आहे.
शेअर्सचा परतावा
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या शेअरची किंमत १९ जून २०२० रोजी ४५.८८ रुपये होती. १७ जून २०२५ रोजी हा शेअर्स २६६० रुपयांवर बंद झाला. गुंतवणूकदाराने १९ जून २०२० एक्सचेंजच्या रोजी बीएसईच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते तर १ लाख रुपयांनी खरेदी केलेल्या शेअर्सचे सध्याचे मूल्य ५७.९७ लाख रुपये झाले असते. गेल्या चार वर्षांत बीएसईच्या शेअर्सने २५७३ टक्के आणि दोन वर्षांत १२९४ टक्के नफा दिला आहे.
दोनदा बोनस शेअर्स
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने शेअर्सचे लिस्टिंग झाल्यापासून दोनदा बोनस शेअर्स वाटले आहेत. मार्च २०२२ मध्ये गुंतवणूकदारांना २:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्स दिले. म्हणजेच, बीएसईने प्रत्येक १ शेअरसाठी भागधारकांना २ बोनस शेअर्स वाटले. मे २०२५ मध्ये २:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्स दिले आहेत. बीएसईचा आयपीओ २३ जानेवारी २०१७ रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला गेला आणि २५ जानेवारीपर्यंत खुला राहिला. बीएसईचा आयपीओ एकूण ५१.२२ पट सबस्क्राइब झाला होता.