कामवारीतील जलपर्णीमुळे पुराचा धोका
esakal June 20, 2025 02:45 AM

भिवंडी, ता. १९ (वार्ताहर)ः शहर व ग्रामीण भागात रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कामवारी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे कित्येक दिवसांपासून नदीपात्रात असलेली जलपर्णी पुलाखाली अडकल्याने पुराचा धोका आहे.
भिवंडी शहराच्या सीमेवरून वाहणारी कामवारी नदीपात्रात जलपर्णी पसरल्याने पावसाचे पाणी वाढल्याने अडथळा येत आहे. अशातच सध्या पावसाचा जोर वाढल्याने नदीलगतच्या शेलार ग्रामपंचायत, भिवंडी शहरातील काही भागात पाणी शिरू शकते. अशा परिस्थितीत शासकीय यंत्रणेकडून जलपर्णी काढण्यात दुर्लक्ष होत असल्याने पूरसदृश परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.