आषाढी वारीची नुकतीच सुरवात झाली आहे. या निमित्ताने जगातील पहिल्या प्रेमपत्राबद्दल जाणून घेऊया...या प्रेमपत्रामागे एक पौराणिक कथा आहे.
रक्मिणी ही विठ्ठलाची (श्री कृष्णचे रुप म्हणजे विठ्ठल) भक्त होती. तिला स्वप्नात श्री विठ्ठलाचे स्मरण झाले.
तिने विठ्ठलासोबत लग्न करण्याची इच्छा आपल्या वडीलांसमोर व्यक्त केली, परंतु या लग्नाला रक्मिणीचा भाऊ रुक्मयचा विरोध होता.
या विरोधाला झुगारुन तिने सात श्लोकांचे पत्र एका ब्राम्हणाद्वारे विठ्ठलाला पाठवले.
हे पत्र ब्राम्हणाने श्री विठ्ठलाला वाचून दाखवले. हे पत्र ऐकल्यानंतर विठ्ठलाच्या मनातही आपुलकीचे भाव निर्मान झाले.हे प्रेम पत्र जगातील पहिले प्रेमपत्र आहे.
या पत्राच्या श्लोकामध्ये लिहले होते. मी अंबिका देवीच्या मंदिरात दर्शनास जात आहे. तिथे तू यावे, त्यावेळी विठ्ठल द्वारकेहून येतात.
मात्र यानंतर रुक्मय आणि विठ्ठल यांच्यामध्ये युद्ध होते. ज्यामध्ये विठ्ठल विजयी होतात.त्यावेळी वसंत पंचमी निमित्ताने त्यांचा विवाह झाला.
त्यामुळे आज देखील वसंत पंचमीनिमित्ताने पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठल आणि रक्मिणीचा विवाहसोहळा होतो.