20 जून पासून भारत आणि इंग्लंड (Test Series IND vs ENG) संघात 5 कसोटी सामन्यांची मालिका सुरू झालेली आहे. पहिला सामना लीड्समध्ये खेळला जात आहे. या सामन्यांमध्ये इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. भारताकडून सलामी वीर फलंदाजाची भूमिका निभावण्यासाठी के एल राहुल (KL Rahul &Yashsvi jaiswal) आणि यशस्वी जयस्वाल खेळत आहेत. या जोडीने भारतासाठी इतिहास रचलेला आहे. दोन्ही खेळाडू हेंडिंग्लेमध्ये असा कारणामा करणारे पहिले भारतीय फलंदाज ठरलेले आहेत.
के एल राहुल आणि यशस्वी जयस्वालने शानदार कामगिरी केली आहे. दोघांनी हेडिंग्लेमध्ये भारतासाठी कसोटी फॉरमॅटमध्ये ओपनर फलंदाज म्हणून सर्वात जास्त धावांची भागीदारी केली आहे. या सामन्यामध्ये दोघांनी मिळून 91 धावांची भागीदारी केली. याआधी या मैदानावर कोणत्याही सलामी जोडीने एवढी मोठी भागीदारी रचलेली नाही. के एल राहुल आणि जयस्वाल या जोडीने पहिल्याच सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे.
भारताला चांगली सुरुवात करून दिल्यानंतर केल राहुल बाद झाला. त्याने या सामन्यामध्ये 78 चेंडूत 42 धावा केल्या. तो शानदार लयीमध्ये दिसत होता. त्याने त्याच्या खेळी दरम्यान 8 चौकार सुद्धा झळकावले. भारतीय संघाचा स्कोर लंच ब्रेक पर्यंत 92/ 2 होता. जयस्वाल 74 चेंडू 42 धावा करून नाबाद आहे, तसेच साई सुदर्शन (Sai surdarshan) 4 चेंडू मध्ये एकही धाव न करता परत पवेलियनमध्ये गेला. आता यशस्वी जयस्वाल सोबत कर्णधार गिल (Captain Shubman gill) फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरेल.