बिहारच्या जमुई जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रेम प्रकरण समोर आले आहे. हे प्रकरण नातेसंबंधांच्या गुंतागुंती आणि सामाजिक मूल्यांच्या संघर्षावर प्रकाश टाकते. टाउन पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात घडलेली ही घटना जिथे एका महिलेने आठ वर्षांच्या लग्नानंतर पती आणि मुलीला सोडून तिच्या प्रियकरासोबत लग्न केले. समाजासमोर अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आठ वर्षांपूर्वी विशाल दुबे यांचे आयुषीशी लग्न झाले. त्यांना एक गोंडस मुलगी आहे. लग्नानंतर काही वर्षे सर्व काही सामान्य होते. परंतू दोन वर्षांपूर्वी त्याच गावातील सचिन नावाच्या एका तरुणाने आयुषीच्या आयुष्यात प्रवेश केला. तो विशालचा दूरचा पुतण्या होता. हळूहळू दोघे जवळ येऊ लागले. आता परिस्थिती अशा टप्प्यावर पोहोचली आहे की आयुषीने तिचे वैवाहिक जीवन नाकारले आहे.
पत्नीने प्रियकराच्या घरी नेऊन पतीला दारु पाजली अन् धारदार शस्त्राने छातीवर, मानेवर सपासप केला वार; दोघांत असं काय घडलं?आयुषीने सचिनसोबत राहण्याचा वारंवार आग्रह धरला तेव्हा विशालने महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दोघांनाही बोलावून तडजोड करण्यात आली. सगळं ठीक आहे असं वाटत होतं, पण थोड्याच वेळात परिस्थिती पुन्हा बिकटझाली. सचिन आणि विशालमधील वाद वाढतच गेला. अखेर सहा दिवसांपूर्वी आयुषी घर सोडून सचिनसोबत पळून गेली. विशालने बंदुकीच्या धाकावर पत्नीचे अपहरण केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. ज्यामध्ये सचिनचे नाव मुख्य आरोपी म्हणून ठेवण्यात आले.
पोलिसांच्या दबावानंतर आयुषी आणि सचिन यांनी न्यायालयात आत्मसमर्पण केले. न्यायालयात दिलेल्या जबाबात आयुषीने सचिनसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. तिने तिच्या मुलीला सोबत घेतले नाही. जी आता तिच्या वडिलांसोबत आहे. न्यायालयात जबाब दिल्यानंतर दोघांनीही गावातील शिव मंदिरात लग्न केले. एसएचओ अमरेंद्र कुमार म्हणाले की, या प्रकरणी अर्ज प्राप्त झाला होता. परंतु नंतर दोघांनीही न्यायालयात शरण गेले आणि स्वतःच्या मर्जीने जगण्याचा निर्णय घेतला.