माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगावच्या सरपंचाला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जलसंचन विहिरीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी पैसे घेणे महागात पडले आहे. सरपंच रुक्मानंद खेत्रे याने तक्रारदाराच्या आईच्या नावाने मंजूर झालेली विहीर अंतिम यादीत समाविष्ट करण्यासाठी आणि विहिरीच्या प्रस्ताव मंजूर करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागितली होती. 20 हजारांपैकी पहिला हप्ता म्हणून दहा हजार रुपयांची लाच घेताना सरपंच रुख्मानंद खेत्रे याला एसीबीने रंगेहाथ पकडले आहे.
Sindhu Water : सिंधूच्या रोखलेल्या पाण्यावरून जम्मू-काश्मीर विरुद्ध पंजाबमध्ये संघर्षजम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पंजाबसह इतर राज्यांना सिंधू नदीचे पाणी वाटण्यास नकार दिल्याने राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. आपचे प्रवक्ते नील गर्ग यांनी राष्ट्रीय संसाधनाचे राजकारण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले. नदीच्या पाणी वाटपासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्याचा अधिकार फक्त केंद्र सरकारला आहे. सिंधू नदीच्या पाण्याबाबत एकतर्फी निर्णय घेण्याचा अधिकार ओमर अब्दुल्ला यांना नाही. हे पाणी राष्ट्रीय संपत्ती आहे आणि पंजाबचा त्यावर समान अधिकार आहे.
Air India News : डीजीसीएची एअर इंडियाविरुद्ध मोठी कारवाईविमान वाहतूक सुरक्षा नियामक डीजीसीएने एअर इंडियाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. गंभीर त्रुटी आढळल्याने क्रू शेड्युलिंग आणि रोस्टरिंगशी संबंधित तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात एका विभागीय उपाध्यक्षाचाही समावेश आहे. डीजीसीएने 20 जून रोजी याबाबत आदेश जारी केला आहे. यात या अधिकाऱ्यांनी क्रूची अनधिकृत आणि अनियमित तैनाती आणि क्रू विश्रांती नियमांचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे.
Shivsena News : संजय राऊत यांनाही गुवाहाटीला यायचे होते, शहाजी बापूंचा दावा..उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या वेळी संजय राऊत यांनाही सोबत गुवाहटीला यायचे होते. मात्र सोबतच्या आमदारांनी संजय राऊतांना कडाडून विरोध केला. त्यामुळे राऊत यांना सोबत घेतलं नाही आणि हीच त्यांची पोट मोठी दुखी आहे. असा दावा शिवसेनेचे शहाजी बापू पाटील यांनी केला आहे.
MLA Mahendra Dalvi : अघोरी विद्येवरून आता आमदार महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंवर निशाणा..शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी मोठा दावा केला आहे. सुनील तटकरे यांच्या सर्व अघोरी विद्या बाहेर काढणार, त्याचे डिटेल्स माझ्याकडे आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. मंत्री भरत गोगावले यांच्या व्हायरल अघोरी विद्येच्या व्हिडिओवर बोलताना आमदार महेंद्र दळवी यांनी येणाऱ्या काही दिवसात आपण सुध्दा सुनील तटकरे यांच्या अनेक अघोरी विद्या लवकरच बाहेर काढू आणि त्याबाबत माझ्याकडे पुराव्यासह सगळं आहे, असे म्हणत त्यांनी सुनील तटकरे यांना एकप्रकारे इशाराच दिला आहे.
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 1 लाखांचे कर्ज, ते ही शून्य टक्के व्याजदराने !लाडक्या बहिणींना मुंबई बँक मदतीचा हात देणार असून लाडक्या बहिणींना आता शून्य टक्के व्याज दराने कर्जपुरवठा केला जाणार आहे. लाडक्या बहिणींचे पैसे उद्योग-व्यवसायांच्या माध्यमातून बाजारात आले पाहिजे, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. त्यामुळे, आता लाडक्या बहिणींना 9 टक्के व्याजदराने देण्यात येणारा कर्जपुरवठा चक्क शून्य टक्के व्याजदराने मिळणार आहे, असे मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
Pakistan Blast : बलुचिस्तानमध्ये पुन्हा पाक सैन्यावर हल्ला, तीन स्फोटात ८ सैनिक ठार..पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा आसिम मुनीर यांच्या सैन्याला लक्ष्य केले गेले आहे. शनिवारी कालात जिल्ह्यातील मंगोचार डॅम परिसरात सलग तीन स्फोटांनी खळबळ उडाली. या हल्ल्यांमध्ये किमान 8 पाकिस्तानी सैनिक मारले गेले किंवा जखमी झाल्याची माहिती आहे. अहवालानुसार, स्फोट तेव्हा झाले जेव्हा सुरक्षा दलांचा एक ताफा या परिसरातून जात होता. सलग झालेल्या या तीन स्फोटांचा आवाज दूरवर ऐकू गेला आणि संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
Beed Crime : बीडमध्ये पैशासाठी तरुणाचे अपहरण!बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात अवघ्या 10 हजार रुपयांच्या उसनवारीवरून तब्बल 80 हजार रुपयांची वसुली करत एका तरुणाचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी थेट तरुणाच्या आईला फोन करून धमकी दिली – "मुलगा जिवंत पाहिजे असेल तर 50 हजार पाठवा, नाहीतर तो कधी दिसणार नाही. अपहरण झालेल्या तरुणाचे नाव कृष्णा मैंद असे आहे.
राहुल गांधी यांनी एकतर्फी निवडणूक आयुक्तांची निवड, बनावट मतदार, बनावट मतदान, टार्गेट बुथ रिगिंग आणि CCTV/पुरावे लपवण्याचे सांगत फिक्सिंगचा आरोप केला. महाराष्ट्रात मतदानानंतर अचानक 7.83 टक्के मतदान टक्केवारी वाढणे ही इतिहासातील अभूतपूर्व घटना असल्याचे म्हटले होते. आता निवडणूक आयोगाच्या निवडणुकीचे फोटो आणि व्हिडिओ 1 वर्षात नाही तर 45 दिवसांत डिलीट करणार असल्याचा निर्णयावर पुन्हा घेरत हल्लाबोल केला आहे. हे मॅच फिक्सिंग असल्याचे स्पष्ट दिसत असून फिक्स केलेली निवडणूक लोकशाही विष असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.