सांगलीमध्ये एका पडक्या घरात एक मानवी सांगाडा आढळून आला आहे.गाव भाग मधील पाटील गल्ली, या ठिकाणी असणाऱ्या पडक्या चौगुले वाड्यात हा मानवी सांगाडा सापडला आहे.
या घटनेची माहिती मिळताचं शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. मात्र सदरचा मृतदेह हा कोणाचा आहे ? याची ओळख अद्याप कळू शकली नाही,
तर सदर घटना ही आत्महत्या की घातपात याबद्दल देखील प्रश्न निर्माण झाला आहे.
शहर पोलिसांच्याकडून मृतदेहाची ओळख पटवण्याच्या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे.
मात्र गावभाग या ठिकाणी आढळून आलेल्या मानवी सांगाड्याच्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
मार्लेश्वर दर्शनासाठी आता ड्रेस कोडकोकणातल्या प्रसिद्ध अशा देवस्थानी भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केलाय.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा मार्लेश्वर ठिकाणी दर्शन घेताना आता विशिष्ट पेहराव करावा लागणार आहे.
पेहराव हिंदू परंपरेला साजेसा, सुसंस्कृत असावा; मार्लेश्वर देवस्थानाचे भाविकांना आवाहन केलय.भाविकांनी अंगभर वस्त्र परिधान करून मार्लेश्वरचे दर्शन घ्यावे असं देवस्थान समितीनं म्हटलय.
पावसाळ्यामध्ये दर्शनासाठी मंदिर सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंतच खुलं राहणार आहे.
वार्षिक धार्मिक विधी आणि श्रावणी सोमवार निमित्त योग्य निर्णय घेऊन मंदिर अधिक वेळ खुलं राहणार आहे.
राज्यभरातून मार्लेश्वरला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.
Maharashtra Live News: राष्ट्रवादीशी युती बाबत शिवसेनेत दोन मत प्रवाहआगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती करण्याबाबत रायगडच्या शिवसेनेत दोन प्रवाह पहायला मिळतात.
तिन्ही पक्षाचे नेते जे ठरवतील त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ अशी भूमिका मंत्री भरत गोगावले यांनी मांडली आहे.
मात्र आमदार महेंद्र दळवी यांनी गोगावले यांच्या भूमिकेला छेद दिला आहे. गोगावले यांची भूमिका पक्षाची भूमिका असू शकते.
परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या नेत्यांच्या विरोधात वक्तव्य थांबवावीत अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आम्हाला वेगळी व्यूहरचना करावी लागेल असा इशारा महेंद्र दळवी यांनी दिला आहे.
मिलिपिड किडीचे कपाशी पिकावर संकट, वाणी वेचून शेताबाहेर फेकण्यासाठी लावले मजूरवाशिमच्या कारंजा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने आठ दिवसांपूर्वी कपाशी पेरणी केली होती. पाण्याची सोय करून दोन वेळा पाणी दिलं, आणि पीक उगवू लागलं. पण आता मिलिपिड अर्थात वाणी किडीचा कपाशीवर जबरदस्त प्रादुर्भाव दिसून येतं असून ही कीड कपाशीची कोवळी झाडं कुर्तडून नष्ट करतेय त्यामुळं शेतकऱ्यांवर नवं संकट आलंय.
बेंबळा येथील शेतकरी संदीप काळेकर यांना थेट मजूर लावून वाणी वेचत शेताबाहेर फेकण्याचं कामं सुरु केलंय. ही कीड नियंत्रणात आणण्यासाठी कृषी विभागानं शेतकऱ्यांना वेळेत मार्गदर्शन करावं,अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
Amravati: अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धा.यशोमती ठाकूर मित्र मंडळ व शौर्य अकॅडमी मोझरी द्वारे आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे करण्यात आलं होतं, यावेळी अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यावेळी उपस्थित होत्या, या मॅरेथॉन स्पर्धेत लहानग्यापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनी सहभाग घेतला, उत्स्फूर्त असा प्रतिसाद या स्पर्धेला लाभला, विजयी स्पर्धकाला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आल
महाडच्या बिरवाडी येथील स्मशानभूमीची दुरावस्थारायगड जिल्ह्यातील श्रीमंत समजली जाणारी ग्रामपंचायत आणि मंत्री भरत गोगावले यांच्या गाव लगत असलेल्या बिरवाडी गावच्या स्मशाण भुमीची पार दुरावस्था झाली आहे. त्यामुळे बिरवाडी ग्रामस्थांना अंत्यविधी, उत्तर कार्य पावसात भिजत करण्याची वेळ आली आहे. या ठिकाणी स्वच्छता देखील नसल्याने ग्रामस्थांमधुन तीव्र संताप व्यक्त होत आहे. 2021 च्या महापुरात या स्मशाण भुमीची पडझड झाली होती. मात्र अद्यप त्याची दुरुस्ती झाली नाही. बिरवाडी ग्रामपंचायतवर शिवसेनेची एक हाती सत्ता असून सुद्धा सत्ताधाऱ्यांना या ग्रामपंचायतीच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अपयश का येतो असा सवाल बिरवाडी मधील ग्रामस्थ विचारत आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर स्मशानभूमीची कामे मार्गी लावावीत अशी मागणी करत आहेत
Maharashtra Live News : उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर पुण्यात लागले शिवसेनेचे बॅनरते भाषणात व्यस्त आम्ही कामात व्यस्त
शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी लावली फ्लेक्स
उद्धव ठाकरे च्या हातात एक सिलेंडर दिलेला आहे आणि त्यावरती कमांड किल्मी असलेत उद्धव ठाकरेंवरती टीका
Godavari River: सलग चौथ्या दिवशी गोदावरी नदीला पूरनाशिकच्या गोदावरी नदीत सलग चौथ्या दिवशी देखील पूर परिस्थिती आहे धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे
त्यामुळे गोदावरी नदी काठी नागरिकांना सतर्केशा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलं आहे
काल गंगापूर धरणातून 38 किवसेस इतका पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये करण्यात आला आहे त्यामुळे गोदावरी नदीची पाण्याची पातळी वाढली आहे
Yavatmal: यवतमाळात वाढणार दोन नगरसेवक, 29 प्रभागात असणार 57 नगरसेवकयवतमाळ नगरपालिकेचा प्रारूप नगररचना आराखडा तयार झालाय 2011 च्या जनगणनेनुसार यवतमाळ शहराची लोकसंख्या दोन लाख 48 हजार 939 आहे शहरात एक प्रभाग वाढला असून सदस्य संख्या 58 होणार आहे महिलांना 50 टक्के आरक्षण असल्याने 29 जागा महिलांकरिता राखीव असणार आहे आगामी निवडणुकांसाठी प्रशासन कामाला लागले आहे.
Maharashtra Politics: भाजपचे बंडखोर दिलीप भोईर शिवसेनेत दाखलअलिबाग विधानसभा मतदार संघातील भाजपचे बंडखोर उमेदवार दिलीप भोईर यांनी शनिवारी संध्याकाळी अलिबाग येथे एका जाहिर कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी भोईर यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.
भोईर यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधात निवडणूक लढवत 33 हजार मतं मिळवली होती.
त्यांच्या प्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढली असून त्याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला फायदा होईल असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला.
बापानेच केला आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाला पोलिसांनी केली अटकस्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बापानेच बलात्कार केल्याची घटना लोणावळा शहराच्या लगत असलेल्या कुसगाव येथे घडले आहे.
या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात असून नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा करा अशी संतप्त मागणी सर्व स्तरातून होत आहे,
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दरम्यान 20 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास काँक्रीट इंडिया कंपनी जवळ भैरवनाथ नगर कुसगाव येथे आरोपी यांच्या राहत्या घरात हा केळस्वान प्रकार घडला आहे.
घरात मुलगी एकटीच आहे याचा फायदा घेत नराधम बापानेच केला आपल्या सख्या मुलीवर बलात्कार.. याप्रकरणी बापास अटक केली असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहे...
वाशिमच्या बाजार समितीत चिया पिकाला मिळाला 14 हजार 600 रुपयांचा उच्चांकी दरएकीकडे वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळत असलेल्या दरांमुळे बाजार समितीत सोयाबीनची आवक घटली असताना वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत चीया पिकाला 14 हजार 600 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे,
मागील काही दिवसांपूर्वीच वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत चिया पिकाची खरेदी सुरू झाली होती. मिळालेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चिया पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली होती.
मात्र उत्पादित केलेला माल विक्रीसाठी बाहेर जिल्ह्यात जावे लागत असताना वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीने दर शनिवार चिया पिकाची खरेदी सुरू केली.
त्यानंतर दर शनिवारी या पिकाची खरेदी केली सुरू झाली असताना वाशिमच्या बाजार समितीत चियाला मिळालेल्या 14,600 रुपयांच्या दरांमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पणश्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी यवतमाळ येथील भाविकांनी सुमारे 17 लाख 68 हजार किमतीचा सोन्याचा तुळशीहार अर्पण केला आहे.
देवाला अर्पण केलेला सोन्याचा तुळशीहार 232 ग्रॅम वजनाचा असून, त्याची अंदाजे किंमत 17 लाख 68 हजार रुपये इतकी होत आहे.
मंदिर समितीच्या वतीने भाविकांचा सत्कार करण्यात आला.
बदलापुरात सिग्नल यंत्रणेचं काम अंतिम टप्प्यातबदलापूर शहरात लवकरच सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.
नुकताच नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड आणि पोलीस अधिकाऱ्यांनी शहरातील सिग्नल यंत्रणेचा आढावा घेतला.
येत्या आठवड्याभरात शहराच्या सर्वच मुख्य चौकातील सिग्नल यंत्रणा सुरू होईल असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केलाय.
बदलापूर शहराची लोकसंख्या साडेचार लाखांच्या घरात पोहोचली. लोकसंख्येच्या प्रमाणात शहरातील वाहनांची संख्या देखील वाढलीय.
त्यामुळे कात्रप हायवे, बेलवली रोड, उड्डाणपूल चौक, बाजारपेठ परिसरात दररोज वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळतं.
त्यावर उपाय म्हणून बदलापूर नगरपालिकेने सर्व मुख्य रस्त्यांवर सिग्नल बसवले आहेत. येत्या आठवड्याभरात हे सर्व सिग्नल कार्यान्वित होऊन बदलापुरातील वाहतूक कोंडी नियंत्रणात येईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय.