Maharashtra Live News Update : पुसहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख चंद्रराव तावरे मतदानासाठी दाखल
Saam TV June 22, 2025 08:45 PM
कृष्णा नदीची पाणी पातळी 16 फुटावर..

सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत चढ उतार होत आहे. सांगलीच्या कृष्णाची पातळी ही 16 फुटावर आहे. जिल्ह्यात अधून मधून पडणारा पाऊस आणि कोयना आणि चांदोली पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे वारणा आणि कृष्णाच्या पातळीमध्ये कमी जास्त वाढ होत आहे. या पावसामुळे अनेक शेतामध्ये पाणी साचले आहे. शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर कृष्णा नदीच्या पाणी पातळी ही 16 फुटावर आहे.

राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आल्यामुळे माजी आमदार वैभव नाईक यांची नाराजी

मालवण मधील राजकोट किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. आणि यावर माजी आमदार वैभव नाईक यांनी नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. मागच्या वेळेला जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तसा पुन्हा पुतळ्याच्या आजूबाजूचा भाग कोसळेल या

भीती मुळेच किल्ला बंद ठेवण्यात आला आहे का असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. शंभर कोटी रूपये खर्च करून शंभर वर्ष टीकेल असे पुतळ्याचे काम केल्याचे सरकार सांगत असताना अशा प्रकारे बंदी आणली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अजूनही लक्ष घालून जे अधीकारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहीजे अशी मागणी सुद्धा वैभव नाईक यांनी केली आहे.

Supriya Sule: हुंडा मुक्त महाराष्ट्र कसा होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे- सुप्रिया सुळे

आपण काय पाहिजे हे पाहिले पाहिजे

काय करायचे विकास मेट्रो अन् रस्ते

लाडकी बहिण पैसे मिळाले चांगला आहे पण सामाजिक परिवर्तन झाले का महत्त्वाचा प्रश्न आहे, मी टीका करत नाही सरकारवर,पण महिलांच्या आयुष्यात काय बदल झाला मोठा यामुळे?

२१०० रुपये कधी देणार त्यांना वाटेल तेव्हा, जसे शेतकरी कर्जमाफीला म्हणतात वेळ येईल तेव्हा देऊ याला साडेचार वर्ष जातील त्यांची वेळ यायला

पुणे जिल्ह्यातील कल्याण गावात बिबट्याचे दर्शन

सिंहगड पायथ्यालगत व परिसरातील गावांत वावर वाढल्याने नागरिकांत घबराट

सिंहगडाच्या दक्षिणेला असलेल्या कल्याण गावात शनिवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास बिबट्या चे दर्शन

श्री करंजाई मातेच्या मंदिराच्या अंगणात बिबट्याचे दर्शन

या भागासह सिंहगडाच्या परिसरातील गावांत सध्या सातत्याने बिबट्याचा वावर दिसून येत आहे

संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसरमध्ये पोहचली

पुणे शहरातून मार्गस्थ झाल्यानंतर तुकोबांची पालखी हडपसर मध्ये

हडपसर मधील नागरिकांकडूनपाखीचे स्वागत आणि दर्शन

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज मुक्काम लोणी काळभोरमध्ये

Rajkot Fort: राजकोट किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद

सिंधुदुर्गतील मालवण राजकोट किल्ला आज पासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला नुकतीच चौथर्याच्या बाजूची जमीन खचली होती.

चौथऱ्याच्या परिसरातील दुरुस्ती काम करण्यासाठी हा किल्ला बंद ठेवण्यात आला आहे.

पुतळ्याच्या चबुतराच्या सभोवताली पदपथाच्या (Paving) आवश्यक दुरुस्तीसाठी व इतर अनुषंगिक कामे पुर्ण होईपर्यंत रविवार २२ जून पासून राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.

आज सकाळपासून ढगाळ वातावरण शहरासह जिल्ह्यात पावसाची रिपरिप

जळगाव आज सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने आता पावसाला सुरुवात झाली शहरासह जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू झाली असून जून महिन्याचा 22 तारीख येऊनही आजपर्यंत पाऊस झालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाची वाट बघून पेरणीला सुरुवात केली आहे मात्र अजूनही पाहिजे त्याप्रमाणे पाऊस झालेला नाही आज जो पाऊस होता तो एकदम हलक्या स्वरूपाचा असल्यामुळे थोडा का होईना शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे पण जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची आवश्यकता आहे त्यामुळे शेतकरी पेरणी करू शकेल

Baramati: सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख चंद्रराव तावरे मतदानासाठी दाखल

बारामती -

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदानासाठी सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख चंद्रराव तावरे मतदानासाठी मतदान केंद्रावर दाखल .

८५ वर्षीय चंद्रराव तावरे चेअरमन पदाचे दावेदार

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात तावरेंचा पॅनल

सांगवी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मतदान केंद्रा बजावणार मतदानाचा हक्क.

Pune News: पुण्यात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आयोजीत "यशस्विनी सन्मान सोहळा"

पुणे -

पुण्यात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आयोजीत "यशस्विनी सन्मान सोहळा"

शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात यशस्विनी सन्मान सोहळ्याचं आयोजन

राज्यभरातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा होणार सन्मान

खासदार सुप्रिया सुळे,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांची देखील कार्यक्रमाला उपस्थिती

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात होणार महिलांचा सन्मान

लाईव्ह फ्रेम देतोय ११ वाजता कार्यक्रम सुरू होईल

Nashik News: नाशिकच्या म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात तरुणाची हत्या

नाशिक -

- म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात तरुणाची हत्या

- चामरलेण्याकडे जाणाऱ्या मार्गावर घटना

- अंदाजे वीस ते पंचवीस वयोगटातील तरुण

- पोलिस घटनास्थळी दाखल.

- मृतदेह ओळख पटविण्याचे काम सुरू

Bhandara News: वादळी वाऱ्यानं राईस मिलचे टीनपत्रे उडाल्यानं धान पोती भिजली

वादळी वाऱ्यानं राईस मिलचे टीनपत्रे उडाल्यानं धान पोती भिजली

काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसानं भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील करांडला येथील राईस मिलवरील टिनपत्रे उडालीत.

यामुळं राईस मिलमध्ये मिलिंगसाठी आणलेले शेकडो धान पोती आणि मिलिंग झालेले तांदूळ भिजल्यानं यात शेतकरी आणि राईसमील मालकाचं मोठं नुकसान झालं आहे.

Pune News: पुणे जिल्ह्यातील कल्याण गावात बिबट्याचे दर्शन

पुणे -

पुणे जिल्ह्यातील कल्याण गावात बिबट्याचे दर्शन

सिंहगड पायथ्यालगत व परिसरातील गावांत वावर वाढल्याने नागरिकांत घबराट

सिंहगडाच्या दक्षिणेला असलेल्या कल्याण गावात शनिवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास बिबट्या चे दर्शन

श्री करंजाई मातेच्या मंदिराच्या अंगणात बिबट्याचे दर्शन

या भागासह सिंहगडाच्या परिसरातील गावांत सध्या सातत्याने बिबट्याचा वावर दिसून येत आहे

Higoli News: हिंगोलीत पोलिसांकडून बोगस खत प्रकरणातील मुख्य आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट

हिंगोलीत पोलिसांकडून बोगस खत प्रकरणातील मुख्य आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट

प्रकृतीच्या नावाखाली पोलिसांकडून चक्क पोलीस निरीक्षकांच्या कार्यालयात आरोपीला आलिशान खुर्चीवर बसवले

Pune News: संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसरमध्ये पोहचली

पुणे -

संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसरमध्ये पोहचली

पुणे शहरातून मार्गस्थ झाल्यानंतर तुकोबांची पालखी हडपसर मध्ये

हडपसर मधील नागरिकांकडूनपाखीचे स्वागत आणि दर्शन

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज मुक्काम लोणी काळभोर मध्ये

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पंढरपुरात स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ

आषाढी यात्रेच्या निमित्ताने आज पंढरपुरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद यांच्या उपस्थितीत आज सकाळी स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. स्वच्छता मोहिमेत सुमारे साडेचार स्वयंसेवी आणि शासकीय कर्मचारी सहभागी झाले आहेत. चंद्रभागा वाळवंट, भक्ती सागर, वाखरी पालखी तळ,दर्शनबारी, प्रदक्षिणा मार्ग, विठ्ठल मंदिर परिसर यासह पंढरपूर शहरातील 42 ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.

व्यवसाय परवान्यासाठी शहरातील व्यापाऱ्यांना मनपा कडून नोटीसा

लातूर महापालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या शहरातील व्यापाऱ्यांना महापालिकेकडून व्यवसाय परवान्यासाठी , ठरवून दिलेले शुल्क भरणा करण्यासाठी नोटीस देण्यात आल्या आहेत.. तर या नोटिसांकडे दुर्लक्ष करणाऱ्या तर व्यापाऱ्यांना दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देखील महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान या नव्या वसुलीवरून व्यापारी आणि मानपांना कर्मचाऱ्यांमध्ये वादंग होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे..

भंडाऱ्याच्या तुमसरात चोरट्यांनी सहा दुकानं फोडली, लाखोंचं नुकसान

भंडाऱ्याच्या तुमसर शहरातील किराणा ओळीतील सहा दुकानं चोरट्यांनी मध्यरात्री फोडली.

ही घटना आज सकाळी उघडकीस आल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली.

या दुकानफोडीत काही व्यापाऱ्यांची रोख रक्कम आणि किराणा साहित्य असा सुमारे १० लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.

तुमसर पोलीस आणि स्वान पथक आता अधिक तपास करीत आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर माऊलींच्या पालखीत सहभागी

रूपाली चाकणकरांनी पुणे ते दिवेघाट केली पायी वारी

यावेळी महिला आयोगाच्या माध्यमातून वारकऱ्यांना केलेल्या सुविधांचा रूपाली चाकणकरांनी घेतला आढावा

Mandangad: मंडणगड एसटी आगारात ५ नव्या एसटी बसेसचा ताफा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ५ नव्या बस मंडणगड आगारात दाखल झाल्यात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते या.नव्या बसचे लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमामुळे मंडणगड व परिसरातील नागरिकांसाठी प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेळेवर होणार असून, ग्रामीण भागातील दळणवळणाला चालना मिळणार आहे.या नव्या बसेसच्या समावेशामुळे स्थानिक प्रवाशांसाठी अधिक सक्षम, जलद आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध होणार आहे.

किल्ले रामशेज संवर्धन मोहिमेच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या खासदारांचा रात्रीचा मुक्काम शाळेत

नाशिक राज्यभर गड किल्ले मोहिमेच्या निमित्ताने गड संवर्धनासाठी निलेश लंके प्रतिष्ठान आणि मावळा संघटनेच्या माध्यमातून राज्यातील विविध गड किल्ल्याची स्वच्छता मोहीम निलेश लंके यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात येते. नाशिकच्या किल्ले रामशेज या ठिकाणी आज स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे. खासदार निलेश लंके भास्कर भगरे राजाभाऊ वाजे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे या मोहिमेत सहभागी होणार आहेत. मोहिमेच्या निमित्ताने रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी एका शाळेत खासदार निलेश लंके आणि भास्कर भगरे रात्रीचा मुक्काम शाळेत केला.

Navi Mumbai: केमिकल कंपनीवर तातडीने करावी करावी आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी

नवी मुंबई शहरामध्ये कोणत्याही प्रकारचे आपत्ती येऊ नये या दृष्टीने बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई शहरामध्ये पाहणी केली

अनेक ठिकाणी कचरा पडलेला असतो तसं मँग्रोज याची छाटणी झाली की नाही या सर्व गोष्टी तपासण्याचे आदेश मंदा मात्रे यांनी पालिकेचे अधिकाऱ्यांना दिले

तसेच बोनकोडेइथे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे याच पाईपलाईन मधून पाणी खाडीमध्ये सोडलं तर त्यामुळे मच्छीमारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय त्यामुळे या कंपनीवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी  केली आहे

Pune News: पुण्यातून पालखी मार्गस्थ सोहळ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे मार्गस्थ..

वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा,असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठेतील श्री पालखी सोहळ्याचे विठोबा मंदिर येथून मार्गस्थ झाली, तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पालखी नाना पेठेतील श्री निवंडुगा विठोबा मंदिर येथून सकाळी मार्गस्थ झाली.

हा पालखी सोहळा नाना पेठ व भवानी पेठेतून सोलापूर रोड मार्गे पुढे मार्गस्थ होणार आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हडपसर येथील गाडीतळ येथून दिवेघाट मार्गे सासवड मुक्कामी पोहोचणार आहे.

तर संत तुकाराम महाराज यांची पालखी सोलापूर रस्त्याने लोणी काळभोर येथे मुक्कामी असणार आहे.

दोन्ही पालखी सोहळ्यांना वाहतुकीची अडचण येऊ नये, यादृष्टीने आज पहाटेपासून पालखी मार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

पालखी पुढे मार्गस्थ झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत केली जाणार आहे

Ashadhi Wari Palkhi: पुण्यातून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालख्या मार्गस्थ

दोन दिवसांचा पुणेकरांचा पाहुणचार घेतल्यावर पालख्या पुढच्या प्रवासाला मार्गस्थ

माऊलींच्या पालखीसोबत दिव्याघाट पार करेपर्यंत पुणेकर गर्दी

ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात वारकरी पालखीमध्ये तल्लीन

संत तुकाराम महाराज पालखीचा लोणी काळभोर येथे मुक्काम तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा सासवडला मुक्काम

संत तुकाराम महाराजांची पालखी आज दुपारी हडपसर मध्ये विसावा घेणार तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिव्या घाटाचा अवघड टप्पा पार करणार

आज सकाळी या दोन्ही पालख्या पुण्यातून मार्गस्थ..

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज दिवे घाट मार्गे सासवड मध्ये मुक्कामी असणार

दुपारी ३ वाजता माऊलींची पालखी दिवे घाट सर करणार

२ दिवसांच्या पुणे शहरातील मुक्कामानंतर दोन्ही पालख्या आज सकाळी झाल्या मार्गस्थ

सांगलीच्या गावभागमध्ये पडक्या घरात आढळून आला मानवी सांगाडा

सांगलीमध्ये एका पडक्या घरात एक मानवी सांगाडा आढळून आला आहे.गाव भाग मधील पाटील गल्ली, या ठिकाणी असणाऱ्या पडक्या चौगुले वाड्यात हा मानवी सांगाडा सापडला आहे.

या घटनेची माहिती मिळताचं शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. मात्र सदरचा मृतदेह हा कोणाचा आहे ? याची ओळख अद्याप कळू शकली नाही,

तर सदर घटना ही आत्महत्या की घातपात याबद्दल देखील प्रश्न निर्माण झाला आहे.

शहर पोलिसांच्याकडून मृतदेहाची ओळख पटवण्याच्या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे.

मात्र गावभाग या ठिकाणी आढळून आलेल्या मानवी सांगाड्याच्या प्रकारामुळे  खळबळ उडाली आहे.

मार्लेश्वर दर्शनासाठी आता ड्रेस कोड

कोकणातल्या प्रसिद्ध अशा देवस्थानी भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केलाय.

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा मार्लेश्वर ठिकाणी दर्शन घेताना आता विशिष्ट पेहराव करावा लागणार आहे.

पेहराव हिंदू परंपरेला साजेसा, सुसंस्कृत असावा; मार्लेश्वर देवस्थानाचे भाविकांना आवाहन केलय.भाविकांनी अंगभर वस्त्र परिधान करून मार्लेश्वरचे दर्शन घ्यावे असं देवस्थान समितीनं म्हटलय.

पावसाळ्यामध्ये दर्शनासाठी मंदिर सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंतच खुलं राहणार आहे.

वार्षिक धार्मिक विधी आणि श्रावणी सोमवार निमित्त योग्य निर्णय घेऊन मंदिर अधिक वेळ खुलं राहणार आहे.

राज्यभरातून मार्लेश्वरला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

Maharashtra Live News: राष्ट्रवादीशी युती बाबत शिवसेनेत दोन मत प्रवाह

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती करण्याबाबत रायगडच्या शिवसेनेत दोन प्रवाह पहायला मिळतात.

तिन्ही पक्षाचे नेते जे ठरवतील त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ अशी भूमिका मंत्री भरत गोगावले यांनी मांडली आहे.

मात्र आमदार महेंद्र दळवी यांनी गोगावले यांच्या भूमिकेला छेद दिला आहे. गोगावले यांची भूमिका पक्षाची भूमिका असू शकते.

परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या नेत्यांच्या विरोधात वक्तव्य थांबवावीत अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आम्हाला वेगळी व्यूहरचना करावी लागेल असा इशारा महेंद्र दळवी यांनी दिला आहे.

मिलिपिड किडीचे कपाशी पिकावर संकट, वाणी वेचून शेताबाहेर फेकण्यासाठी लावले मजूर

वाशिमच्या कारंजा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने आठ दिवसांपूर्वी कपाशी पेरणी केली होती. पाण्याची सोय करून दोन वेळा पाणी दिलं, आणि पीक उगवू लागलं. पण आता मिलिपिड अर्थात वाणी किडीचा कपाशीवर जबरदस्त प्रादुर्भाव दिसून येतं असून ही कीड कपाशीची कोवळी झाडं कुर्तडून नष्ट करतेय त्यामुळं शेतकऱ्यांवर नवं संकट आलंय.

बेंबळा येथील शेतकरी संदीप काळेकर यांना थेट मजूर लावून वाणी वेचत शेताबाहेर फेकण्याचं कामं सुरु केलंय. ही कीड नियंत्रणात आणण्यासाठी कृषी विभागानं शेतकऱ्यांना वेळेत मार्गदर्शन करावं,अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Amravati: अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धा.

यशोमती ठाकूर मित्र मंडळ व शौर्य अकॅडमी मोझरी द्वारे आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे करण्यात आलं होतं, यावेळी अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यावेळी उपस्थित होत्या, या मॅरेथॉन स्पर्धेत लहानग्यापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनी सहभाग घेतला, उत्स्फूर्त असा प्रतिसाद या स्पर्धेला लाभला, विजयी स्पर्धकाला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आल

महाडच्या बिरवाडी येथील स्मशानभूमीची दुरावस्था

रायगड जिल्ह्यातील श्रीमंत समजली जाणारी ग्रामपंचायत आणि मंत्री भरत गोगावले यांच्या गाव लगत असलेल्या बिरवाडी गावच्या स्मशाण भुमीची पार दुरावस्था झाली आहे. त्यामुळे बिरवाडी ग्रामस्थांना अंत्यविधी, उत्तर कार्य पावसात भिजत करण्याची वेळ आली आहे. या ठिकाणी स्वच्छता देखील नसल्याने ग्रामस्थांमधुन तीव्र संताप व्यक्त होत आहे. 2021 च्या महापुरात या स्मशाण भुमीची पडझड झाली होती. मात्र अद्यप त्याची दुरुस्ती झाली नाही. बिरवाडी ग्रामपंचायतवर शिवसेनेची एक हाती सत्ता असून सुद्धा सत्ताधाऱ्यांना या ग्रामपंचायतीच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अपयश का येतो असा सवाल बिरवाडी मधील ग्रामस्थ विचारत आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर स्मशानभूमीची कामे मार्गी लावावीत अशी मागणी करत आहेत

Maharashtra Live News : उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर पुण्यात लागले शिवसेनेचे बॅनर

ते भाषणात व्यस्त आम्ही कामात व्यस्त

शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी लावली फ्लेक्स

उद्धव ठाकरे च्या हातात एक सिलेंडर दिलेला आहे आणि त्यावरती कमांड किल्मी असलेत उद्धव ठाकरेंवरती टीका

Godavari River: सलग चौथ्या दिवशी गोदावरी नदीला पूर

नाशिकच्या गोदावरी नदीत सलग चौथ्या दिवशी देखील पूर परिस्थिती आहे धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे

त्यामुळे गोदावरी नदी काठी नागरिकांना सतर्केशा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलं आहे

काल गंगापूर धरणातून 38 किवसेस इतका पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये करण्यात आला आहे त्यामुळे गोदावरी नदीची पाण्याची पातळी वाढली आहे

Yavatmal: यवतमाळात वाढणार दोन नगरसेवक, 29 प्रभागात असणार 57 नगरसेवक

यवतमाळ नगरपालिकेचा प्रारूप नगररचना आराखडा तयार झालाय 2011 च्या जनगणनेनुसार यवतमाळ शहराची लोकसंख्या दोन लाख 48 हजार 939 आहे शहरात एक प्रभाग वाढला असून सदस्य संख्या 58 होणार आहे महिलांना 50 टक्के आरक्षण असल्याने 29 जागा महिलांकरिता राखीव असणार आहे आगामी निवडणुकांसाठी प्रशासन कामाला लागले आहे.

Maharashtra Politics: भाजपचे बंडखोर दिलीप भोईर शिवसेनेत दाखल

अलिबाग विधानसभा मतदार संघातील भाजपचे बंडखोर उमेदवार दिलीप भोईर यांनी शनिवारी संध्याकाळी अलिबाग येथे एका जाहिर कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी भोईर यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.

भोईर यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधात निवडणूक लढवत 33 हजार मतं मिळवली होती.

त्यांच्या प्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढली असून त्याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला फायदा होईल असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला.

बापानेच केला आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाला पोलिसांनी केली अटक

स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बापानेच बलात्कार केल्याची घटना लोणावळा शहराच्या लगत असलेल्या कुसगाव येथे घडले आहे.

या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात असून नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा करा अशी संतप्त मागणी सर्व स्तरातून होत आहे,

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दरम्यान 20 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास काँक्रीट इंडिया कंपनी जवळ भैरवनाथ नगर कुसगाव येथे आरोपी यांच्या राहत्या घरात हा केळस्वान प्रकार घडला आहे.

घरात मुलगी एकटीच आहे याचा फायदा घेत नराधम बापानेच केला आपल्या सख्या मुलीवर बलात्कार.. याप्रकरणी बापास अटक केली असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहे...

वाशिमच्या बाजार समितीत चिया पिकाला मिळाला 14 हजार 600 रुपयांचा उच्चांकी दर

एकीकडे वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळत असलेल्या दरांमुळे बाजार समितीत सोयाबीनची आवक घटली असताना वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत चीया पिकाला 14 हजार 600 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे,

मागील काही दिवसांपूर्वीच वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत चिया पिकाची खरेदी सुरू झाली होती. मिळालेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चिया पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली होती.

मात्र उत्पादित केलेला माल विक्रीसाठी बाहेर जिल्ह्यात जावे लागत असताना वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीने दर शनिवार चिया पिकाची खरेदी सुरू केली.

त्यानंतर दर शनिवारी या पिकाची खरेदी केली सुरू झाली असताना वाशिमच्या बाजार समितीत चियाला मिळालेल्या 14,600 रुपयांच्या दरांमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी यवतमाळ येथील भाविकांनी सुमारे 17 लाख 68 हजार किमतीचा सोन्याचा तुळशीहार अर्पण केला आहे.

देवाला अर्पण केलेला सोन्याचा तुळशीहार 232 ग्रॅम वजनाचा असून, त्याची अंदाजे किंमत 17 लाख 68 हजार रुपये इतकी होत आहे.

मंदिर समितीच्या वतीने भाविकांचा सत्कार करण्यात आला.

बदलापुरात सिग्नल यंत्रणेचं काम अंतिम टप्प्यात

बदलापूर शहरात लवकरच सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.

नुकताच नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड आणि पोलीस अधिकाऱ्यांनी शहरातील सिग्नल यंत्रणेचा आढावा घेतला.

येत्या आठवड्याभरात शहराच्या सर्वच मुख्य चौकातील सिग्नल यंत्रणा सुरू होईल असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केलाय.

बदलापूर शहराची लोकसंख्या साडेचार लाखांच्या घरात पोहोचली. लोकसंख्येच्या प्रमाणात शहरातील वाहनांची संख्या देखील वाढलीय.

त्यामुळे कात्रप हायवे, बेलवली रोड, उड्डाणपूल चौक, बाजारपेठ परिसरात दररोज वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळतं.

त्यावर उपाय म्हणून बदलापूर नगरपालिकेने सर्व मुख्य रस्त्यांवर सिग्नल बसवले आहेत. येत्या आठवड्याभरात हे सर्व सिग्नल कार्यान्वित होऊन बदलापुरातील वाहतूक कोंडी नियंत्रणात येईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.