राणेंच्या बालेकिल्ल्यातून सुरुवात, शिवसेनेला पुन्हा गतवैभव मिळवून देणार, भास्कर जाधवांचा एल्गार
Marathi June 23, 2025 01:25 AM

भास्कर जाधव: मी कुठल्याही दादा, भाईला भीक घालत नाही. ते फक्त लांबूनच भाषण करतात, असे वक्तव्य करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी दंड थोपटलेत. शिवसेनेचे गत वैभव पुन्हा कस येत नाही ते बघतोच. सुरुवात सिंधुदुर्गमधूनच करणार असल्याचा एल्गार भास्कर जाधव यांनी केला. चिपूळूनमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या शाखा प्रमुखांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली.

राज्यात सरकार कोणाचेही असो मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच जिंकेल असा विश्वास भास्कर जाधव यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्गपासून सुरुवात करणार असल्याचे जाधव म्हणाले. शिवसेनेचे पुन्हा गतवैभव येत नाही ते बघतो असेही ते म्हणाले. तुम्ही सर्वजण सोबत राहा असेही जाधव म्हणाले. उद्याची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक येत आहे. तालुकाप्रमुखांनी मिटींग घ्यायला सुरुवात करा असे जाधव म्हणाले. आपल्या निवडणुकी जिंकायचे आहे असेही भास्कर जाधव म्हणाले.

माझ्या विरोधात प्रचंड पैशांचा वापर झाला, पोलिसांच्या गाडीतून पैसे आले

बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उभी करण्यात शाखाप्रमुखांच सर्वात मोठं योगदान आहे. आज शाखाप्रमुख कार्यरत दिसत नाहीत अशी खंत देखील भास्कर जाधवांनी व्यक्त केली. शाखा प्रमुख सतर्क असते तर राज्यात चित्र वेगळं असतं असेही भास्कर जाधव म्हणाले. माझ्या विरोधात प्रचंड पैशांचा वापर झाला. पोलिसांच्या गाडीतून पैसे आल्याचा आरोप देखील भास्कर जाधव यांनी केला. EVM मशीन बाबत सरकारने केलेल्या कायद्याच्या विरोधातही भास्कर जाधवांनी भाष्य केलं. सरकारने काळं काम केलं हे स्पष्ट आहे. आपण हरलेलो नाही असेही ते म्हणाले.

24 तासात युद्ध का थांबवलं? भास्कर जाधवांचा पंतप्रधान मोदींना सवाल

यावेळी बोलताना भास्कर जाधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर रक्तात सिंदुर वाहत असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा भास्कर जाधवांनी समाचार घेतला. पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी पंतप्रधान मोदी यांनी घालवल्याचेही भास्कर जाधव म्हणाले. 26 महिलांचे कपाळ उजाड करणारे ते आतंकवादी कुठे आहेत? असा खडा सवाल भास्कर जाधव यांनी केला. 24 तासात युद्ध का थांबवलं? असा सवालही भास्कर जाधव यांनी केला. चार महिन्यात महाराष्ट्रात 4 लाख 60 हजार मतदान वाढलं कोठून? असा सवाल भास्कर जाधव यांनी केला. त्यानंतर सरकारनं कायदा केलाय की, 45 दिवसानंतर ईव्हीएम ठेवायच्या नाहीत. त्या नाहीशा करायच्या. सरकारनं काळ काम केलं आहे. आपण हरलो नाही असे भास्कर जाधव म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

आता थांबायचा विचार करावा; भास्कर जाधवांकडून निवृत्तीचे संकेत, संजय राऊतांवरही स्पष्टच बोलले

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.