Maharashtra Live News Update : माळीणजवळील पसारवाडी डोंगरावर दरड कोसळली
Saam TV June 23, 2025 03:45 PM
Pune: पुणे-सिंगापूर विमानसेवा १५ जुलैपर्यंत स्थगित

एअर इंडियाच्या मानांची तपासण होणार

अहमदाबाद विमान अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खबरदारी

पुर्ण-सिंगापूर एअर इंडियाच्या ताफ्यातील बोईंग, इतर विमानांची तपासणी

माळीणजवळील पसारवाडी डोंगरावर दरड कोसळली

माळीण दुर्घटनेच्या आठवणी ताज्या करणारी घटना आज सकाळी घडली माळीणजवळील पसारवाडी येथे डोंगरकड्यावर मोठ्या प्रमाणात दरड कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी पसारवाडी गावाचा संपर्क तुटला आहे,

Pune: शिक्रापुर येथे प्रवासी आणि पीएमपीएल बस चालक यांच्या रस्त्यावर राडा

पीएमपिएल चालकाची प्रवाशाला मारहाण

प्रवाशी तरुण आणि चालकामध्ये प्रवासादरम्यान झाला होता वाद

या वादातुन शिक्रापुर येथे भरचौकात दोघांमध्ये चांगलीच मारहाण आणि राडा झालाय

नाशिक जिल्ह्यातील चार धरणांमधून केला जातोय पाण्याचा विसर्ग

- दारणा धरण - 4079 Cusec

- गंगापूर धरण - 3944 Cusec

- कडवा - 795 Cusec

- नांदूरमधमेश्वर - 9465 Cusec.

९ वर्षानंतर होतेय भंडारा जिल्हा बँकेची निवडणूक...२७ जुलैला मतदान तर, २८ जुलैला मतमोजणी

भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर घोषित झाला. भंडाऱ्याच्या सहकार क्षेत्रातील मोठी निवडणूक म्हणून बँकेच्या निवडणुकीकडं बघितल्या जातं. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. २१ संचालक निवडून देण्यासाठी १०५६ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असून या निवडणुकीसाठी आजपासून २७ जूनपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. २७ जुलैला मतदान होणार असून २८ जुलैला मतमोजणी होणार आहे. सहकार क्षेत्राच्या या निवडणुकीकडं आता भंडारा जिल्ह्याततील सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांची धावपळ बघायला मिळणार आहेत.

खासदार इम्तियाज जलील यांच्या अटकेसाठी मोर्चा

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या अटकेसाठी आंबेडकरी समाजाचा जनआक्रोश मोर्चा निघणार आहे. सकाळी ११ वाजता क्रांती चौकातून हा मोर्चा निघेल. जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोप करताना ११ जून रोजी पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला होता. त्यावरून जलील यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अटक करावी, या मागणीसाठी आंबेडकरी अनुयायांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे. जलील यांच्या वक्तव्याने आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आंबेडकरी समाजाने आणखी किती दिवस अपमान सहन करायचा म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचारविरोधी कृती समितीकडून हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

दिल्ली विमानतळावर सुरू असलेल्या धावपट्टीच्या कामामुळे नाशिक दिल्ली विमानसेवेला फटका

- दिल्ली विमानतळावर सुरू असलेल्या धावपट्टीच्या कामामुळे नाशिक दिल्ली विमानसेवेला फटका

- आठवड्यातून तीनच दिवस सुरू राहणार नाशिक दिल्ली विमानसेवा

- रोज सुरू असलेली विमानसेवा आठवड्यातून तीनच दिवस सुरू राहणार असल्याने प्रवाशांना बसणार फटका

- 15 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे दिल्ली विमानतळावरील धावपट्टीचे काम

मनीषा मुसळे माने हिच्या जमिनीवर आज होणार सुनावणी

- सोलापुरातील प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉ.शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेली मनीषा मुसळे माने हिच्या जमिनीवर आज होणार सुनावणी

- डॉक्टर वळसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी मनीषा मुसळे माने 20 एप्रिल पासून आहे अटकेत

- मनीषा माने यांचे वकील प्रशांत नवगिरे यांच्या माध्यमातून अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्या न्यायालयात जामिनासाठी करण्यात येईल अर्ज

- जिल्हा सरकारी वकील प्रदीप राजपूत हे आजारी असल्यामुळे अर्जावरील सुनावणी ढकलली होती पुढे

- आज आरोपी मनीषा माने यांच्या जामीनावर होणार निर्णय

पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसे आक्रमक

पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाले आहे. या शक्ती विरोधात आज मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सह्यांची मोहीम राबवून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. चेंबूर नाकाच्या बाहेर विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांच्या नेतृत्वात एक सही हिंदी सक्ती विरोधात आंदोलन सुरू करण्यात आला आहे महाराष्ट्रातील संपवण्याचा डाव आहे महाराष्ट्र गृही सरकारचा जाहीर निषेध अशा प्रकारचे बॅनर लावून एक सही हिंदी सक्ती विरोधात करण्यात येत आहे. या वेळी राज ठाकरे यांनी दिलेलं पत्रक वाटप करून हिंदी सक्ती विरोधात लोकांनी सह्या केल्या. राज्य सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उग्र आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला.

विदर्भासह अमरावती जिल्ह्यात आज पासून वाजली शाळेची पहिली घंटा

शिक्षण संस्थांच्या विविध योजनांसह आरटीई योजनेअंतर्गत 2400 कोटी शासनाकडे थकीत असताना आम्हाला या वर्षी फक्त 240 कोटी रुपये दिलेले आहे. त्या शिवाय मालमत्ता करातून शैक्षणिक संस्थांना सूट देणे, अनुदानित शाळांना निवासी वीज दराने वीज पुरवठा करणे, सौर ऊर्जेची सुविधा विनामूल्य द्यावी, अशा अनेक मागण्या सरकारकडे प्रलंबित आहेत.

Maharashtra Live News Update : नागपूरात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी ऐकून मुख्यमंत्री संतप्त

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी कडून महावितरच्या अधिकाऱ्याना सुनावलं...

- मागील काही काळापासून नागपूर शहरातील विविध भागात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.

- वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या मनात सरकारविरोधात नाराजीचा सूर

- काल हैदराबाद हाऊस इथं झालेल्या बैठकीत नागपूरतील लोकप्रतिनिधींनी महावितरणच्या तक्रारीचा पाढा वाचल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महापारेषांच्या अधिकाऱ्यांची केली कान उघडणी केली..

- या कानउघडणी नंतर तरी महावितरणचा कारभार सुरळीत होणार का? हा मात्र मोठा प्रश्न आहे.

संत निवृत्तीनाथ पालखी अहिल्यानगर शहरात दाखल

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ आषाढी पालखी मजल दरमजल करत त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे.आज या पालखीने अहिल्यानगर शहरात प्रवेश केला असून ही दिंडी नगर शहरात दोन दिवस मुक्कामी असते. नगर शहराच्या प्रवेशद्वारावर या दिंडीचे ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या अतिशबाजीत भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले. शेकडो वारकऱ्यांची भाविकांनी सेवा केली चहा नाष्टा आणि फळ देऊन नगर शहरात या दिंडीचे स्वागत करण्यात आले.

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. विठू नामाच्या गजरात गावकऱ्यांसह नगर मधील भक्तांनी विठ्ठल विठ्ठल या गाण्यावर ठेका धरला होता. नगर शहरातील मार्केट यार्ड भागात या दिंडीचा आज मुक्काम असणार आहे. या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणात केवळ 1.33 टक्केच जलसाठा शिल्लक

वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणात केवळ 1.33 टक्केच जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे वाशिम शहरासाठी पाणीटंचाईच संकट अधिक गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे,जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने हे पाणी टंचाईचे संकट अधिक गढद झाल आहे. येणाऱ्या दिवसात दमदार स्वरूपात मान्सून बरसला नाही तर वाशिम शहराला कसा पाणीपुरवठा करायचा कसा,असा यक्ष प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकण्याची शक्यता आहे.

अट्टल चोरट्याला उल्हासनगर क्राईम ब्रँचकडून बेड्या!

तुषार उर्फ प्रेम व्यंकटेश ढगे असं या २३ वर्षीय चोरट्याचं नाव असून तो वांगणीला राहणारा आहे. त्याने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरी केली होती. तसंच बदलापूर पूर्व, हिललाईन आणि अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्या होत्या. त्यामुळे क्राइम ब्रँच त्याच्या मागावर होती. हा चोरटा शनिवारी खरवई परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच क्राइम ब्रँचचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे, शेखर भावेकर, सुरेश जाधव आणि रेवननाथ शेकडे यांच्या पथकाने सापळा रचून तुषार ढगेला ताब्यात घेतलं. त्याच्या चौकशीत त्याने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक सोनसाखळी चोरी, तसंच बदलापूर पूर्व, हिललाईन आणि अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बाईक चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून १५ ग्रॅम वजनाचं सोन्याचं मंगळसूत्र आणि ३ दुचाकी असा एकूण १ लाख ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तुषार याच्यावर यापूर्वीही जबरी चोरी, घरफोडी, मोटरसायकल चोरी, सोनसाखळी चोरी असे १५ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

यवतमाळमध्ये दहा वर्षात पालिकेच्या पाच मराठी शाळा झाल्या बंद

मराठी शाळेकडे येण्याचा पालकांचा कल कमी होत आहे. याचा परिणाम विद्यार्थी संख्येवर दिसून येत आहे. यामुळेच गेल्या दहा वर्षात यवतमाळ नगर परिषदेच्या तब्बल पाच मराठी शाळा बंद झाल्या असून विद्यार्थी संख्या कमी झाल्याने शिक्षकांची संख्याही घटली आहे. शहरात पालिकेच्या 2015 - 16 या वर्षात 31 शाळा होत्या पूर्वी या शाळेत शिक्षण घेऊन अनेक जण अधिकारी झाले काही राजकारणात मोठ्या पदावर पोहोचले परंतु आता याच पालिकेच्या शाळांना घरघर लागली आहे.

उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानीं यांनी रस्त्यावरील खड्ड्यांची मोटरसायकलवरून केली पाहणी

उल्हासनगर आणि कल्याण शहरांना जोडणाऱ्या शहाड उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर भाजप आमदार कुमार आयलानी यांनी वाहतूक कोंडीतून मोटार सायकल वरून जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.गुलशन नगर येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन केल्यानंतर आमदार आयलानी यांनी मोटरसायकलवरून स्वतः उड्डाणपुलावर जाऊन रस्त्याची पाहणी केली. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मनीष राजे पठाणे यांनी पुलावरील वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत आमदारांना माहिती दिली.खड्ड्यांमुळे कल्याणकडे जाणारी वाहतूक मंदावते आहे आणि त्यामुळे सेंचुरी रेऑन कंपनीजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते, हे आमदारांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ मोबाईलवरून संपर्क साधून खड्डे तात्काळ भरून काढण्याच्या सूचना दिल्या.नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन केलेली ही तत्पर कारवाई नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण करणारी ठरली आहे.

अवकाळी पावसामुळे रायगडमधील शेतकऱ्याच्या कष्टात वाढ

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने रायगडमधील भातशेतीच्या पारंपारीक कामांचा खोळंबा झाला. लावणी आधी शेतात केली जाणारी साफसफाई, तरवे भाजणी, मशागत, धुळ पेरणी, नांगरणी आदी कोणतीच काम पावसामुळे होऊ शकली नाहीत. सलग सात आठ दिवस पडणाऱ्या पावसाने शेतात चिखल झाला आणि या चिखलामुळे शेतात मोठ्या प्रमाणात गवत उगवले. आता लावणी योग्य शेत तयार करण्यासाठी शेतकऱ्याला हे गवत काढण्यासाठी मोठी मेहनत करावी लागत आहे.

अंबरनाथमध्ये पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा!

अंबरनाथ पश्चिमेच्या कोहोजगाव मिरची वाडी परिसरातील पटेल प्रेस्टिज इमारतीच्या तळमजल्यावरील एका गाळ्यामध्ये जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती अंबरनाथ पश्चिम पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या डीबी पथकाने शनिवारी रात्री १ वाजता या जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी तिथे जुगार खेळताना ११ पुरुष आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे २ महिलांकडून हा जुगाराचा अड्डा चालवला जात होता, तसंच तिथे पकडलेल्या ११ पुरुषांपैकी ८ पुरुष हे कल्याण आणि डोंबिवली परिसरातून या जुगाराच्या अड्ड्यावर जुगार खेळण्यासाठी आलेले असल्याचं यावेळी स्पष्ट झालं. या छापा कारवाईत पोलिसांनी ३१ हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला असून सर्व आरोपींच्या विरोधात अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहिती डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नागेश्वर मुंडे यांनी दिली आहे.

दापोलीतील शिरखल-दगडवणे पूल वाहतुकीसाठी धोकादायक

दापोली तालुक्यातील शिरखल-दगडवणे पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला असून संभाव्य दुर्घटनेचा धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या गंभीर अवस्थेमुळे प्रशासनाने अवजड वाहनांची वाहतूक पूलावरुन बंद करण्यात आलीय. पूल कोणत्याही क्षणी कोसळू शकतो अशी भीती निर्माण झाली हा पूल 10 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता, मात्र खराब बांधकामामुळे तो वेळेआधीच नादुरुस्त झालाय .या पुलाच्या दुरवस्थेमुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन संबंधित विभागाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जातेय.

कामोठ्यात हिट ॲण्ड रनचा थरार; मद्यधुंद चालकाचा हैदोस, महिला जखमी.....

कामोठे सेक्टर ६ए येथील सरोवर हॉटेलसमोर मद्यधुंद चालकाने एमएच 02 बीजी 6723 क्रमांकाच्या स्विफ्ट कारने एका महिलेला धडक दिली. अपघातानंतरही चालकाने वाहन न थांबवता पुढे जाऊन पार्किंगमधील अनेक वाहनांना धडक दिली. या घटनेत महिला जखमी झाली असून तिच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून चोप दिला व पोलिसांच्या हवाली केले.

Cctv समोर आला आहे

नागपूरमध्ये ४८० ईडब्ल्यूएस सदनिकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्ते वितरण

प्रधानमंत्री आवास योजना घटक क्र. ३ अंतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे मौजा वांजरा येथे उभारण्यात आलेल्या 'स्वप्ननिकेतन' प्रकल्पातील ४८० ईडब्ल्यूएस सदनिकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्ते वितरण.

- प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना घरांच्या किल्ल्या सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनपाच्या या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करीत शहरातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत किमान एक हजार घरे उभारली जातील.

- झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनाही लवकरच मालकी हक्क मिळेल, अशी ग्वाही दिली.

- नागपूरला 'हरित शहर' म्हणून होत असलेल्या विकासाचा उल्लेख करत पर्यावरणपूरक ई-बस व सार्वजनिक वाहतुकीच्या प्रोत्साहनावर भर दिला.

- मनपाने उभारलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रांना आकर्षक व दर्जेदार स्वरूप देण्याच्या सूचनाही दिल्या.

- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घरांची रजिस्ट्री प्रक्रिया फक्त एक हजार रुपयांत पूर्ण होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील वर्षभरात केंद्राच्या सहकार्याने ३० लाख नवीन घरे राज्यात उभारण्याचे लक्ष्य आहे.

जालना जिल्ह्यात नियोजनाप्रमाणे खताचा पुरवठा करावा; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासनाला आदेश

जालना जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खते आणि बियाणांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून सर्व खत उत्पादक कंपन्यांना कृषी आयुक्तालयामार्फत मंजूर नियोजनाप्रमाणे जिल्ह्यात खताचा पुरवठा करावा जेणेकरून शेतकऱ्यांसाठी खताची नियमित उपलब्धता राखली जाईल असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी दिले असून पुढील नियोजनाबाबतही सूचना केल्या. सध्या स्थितीला जालना जिल्ह्यामध्ये 21 हजार 196 मे टन युरिया,5 हजार 218 मे टन सिंगल सुपर फॉस्फेट, आणि 43 हजार 314 npk संयुक इतक्याच रासायनिक खताचा साठा शिल्लक असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. शिवाय जून 2025 अखेर जालना जिल्ह्यात एकूण 97 हजार 285 मे टन खताचे आवर्तन मंजूर असून त्यापैकी 71 हजार 25 मे टन खत साठा उपलब्ध झाला.दरम्यान शेतकऱ्यांनी खते आणि बियाणे खरेदी करताना अधिकृत कृषी सेवा केंद्र किंवा विक्रेत्याकडूनच खरेदी करावे असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले.

Maharashtra Live News Update : तुळजापुर ड्रग्स तस्करी प्रकरणात मोठी कारवाई, माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वरला अटक

बहुचर्चित तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपी संतोष कदम परमेश्वर याला तब्बल दोन महिन्यांनंतर अखेर अटक करण्यात आली आहे. कदम-परमेश्वरला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथून त्याला अटक केली असून,या अटकेने पोलिस तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे.तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात एकूण ३८ आरोपी आहेत.यापैकी २२ आरोपींना अटक करण्यात आली असून, १ जण अटकपूर्व जामिनावर आहे.तर अजूनही १५ आरोपी फरार आहेत.गुन्हा दाखल झाल्यापासून संतोष कदम- परमेश्वर पोलिसांच्या रडारवर होता. अखेर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अकलूजमधून त्याला अटक केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.