वाशी, ता. २३ (बातमीदार) : दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे धरणाची पातळी ७५.९८ मीटर झाली आहे. सध्या ४६.७८ टक्के धरण भरलेले आहे. त्यामुळे नवी मुंबईत १९ ऑक्टोबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे तुर्तास नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. मोरबे धरणात गत वर्षी २२ जूनला पाण्याची पातळी ६९.१५ मीटर होती; तर २६.७८ टक्के साठा शिल्लक होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मोरबे धरणाची पाण्याची पातळी ७५.९८ मीटर इतकी आहे. मोरबे धरण आता ४६.७८ टक्के भरलेले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी ८८ मीटर इतका साठा आवश्यक असतो.
---------------
मोरबे धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. सध्या धरणाची पातळी ७५.९८ मीटर एवढी आहे. १९ ऑक्टोबर २०२५पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा धरणात शिल्लक आहे. त्यामुळे तूर्तास पाण्याची चिंता मिटली आहे.
- अरविंद शिंदे, अतिरिक्त शहर अभियंता, महापालिका