पुणे : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडून सातत्याने नवसंकल्पना आणि नवतंत्रज्ञान अवगत करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच, नवतंत्रज्ञान वापराचा सल्लाही ते देत असतात. देशातील दळणवळण अधिक गतीमान व्हावं आणि प्रवासी, नागरिकांना कमी खर्चात वाहने, इंधन उपलब्ध होण्यासाठीचाही त्यांचा प्रयत्न असतो. आता, पुणे (पुणे) येथील आंतरराष्ट्रीय टनेल वर्कशॉप परिषदेत बोलताना त्यांनी टनेल बनविण्याच्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली. तर, आता शेतीसाठी लागणारे ट्रॅक्टरदेखील आपण इलेक्ट्रिक, इथेनॉल, सीएनजी (सीएनजी) वर चालणारे बनवत आहोत. माझ्या शेतात मी CNG ट्रॅक्टर वापरत आहे, शेतीमध्ये आपल्याला अशा गोष्टींचा वापर करावा लागणार आहे, असेही गडकरी येथील कार्यक्रमात बोलताना म्हटले.
देशात टनेल बनवणं हे भविष्याच्या बाबतीत खूप फायद्याचं ठरेल, येणाऱ्या काळात देशात 3 लाख करोड रुपयांची टनेल आपण बनवणार आहेत. आपल्या देशात बोगद्याची मशिन आपल्याला बनवावी लागेल. कारण, सध्या टनेल (बोगदा) बनवण्याची मशीन फक्त चीनमध्ये बनते, सध्या चीनकडून आपण हे घेऊ शकत नाही, त्याची कारणं तुम्हाला माहिती आहेत, असे म्हणत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी देशात अधिकाधिक बोगदे बनविण्याची गरज असल्याचे म्हटले. तसेच, यात आपल्याला सुरक्षा देखील पाहावी लागेल, असेही त्यांनी म्हटले.
टनेल बोगदे बनवताना आपली सुरक्षा महत्वाची आहे, अनेक घटना देशात दुर्दैवी घडल्या त्यात आपल्याला आता AI आणावा लागेल तर आपण पुढ जाऊ शकतो. नवीन मशिन दुसऱ्या देशातून विकत घेणं थोडं महागाचं ठरत आहे. आपल्याला याचे उत्पादन आपल्याच देशात करावे लागेल, मशीन आपल्याला इथंच बनवाव्या लागतील, असेही नितीन गडकरी यांनी म्हटलं. आता सगळीकडे हायड्रोजन, इथॉनल या इंधनाचा वापर आपल्याला करावा लागेल. यात मी खूप काम करत आहे, आपल्याला मिळून यात काहीतरी करायला हवं. आता ट्रॅक्टर देखील आपण इलेक्ट्रिक, इथेनॉल, CNG वर चालणारे आपण बनवत आहोत. माझ्या शेतात मी CNG ट्रॅक्टर वापरत आहे, शेतीमध्ये आपल्याला अशा गोष्टींचा वापर करावा लागणार आहे, असे गडकरी यांनी म्हटले.
कॉन्ट्रॅक्टरला
आता टनेलिंग मशीनसाठी देखील अशा पर्यायी इंधनाचा वापर करावा लागेल, आता दुचाकी गाडी देखील CNG वर आली आहे. यात पैशाची खूप बचत होते, याचा विचार आपल्याला करावा लागेल. देशात काही टोल कंपन्या नखरे करत आहेत, आता मी ठरवलं आहे की, या कॉन्ट्रॅक्टरला जेलमध्ये टाकणार आणि ठोकणार, असा इशाराच मंत्री महोदयांनी दिला. तसेच, कामात कामचुकारपण करू नका, असा सल्लाही दिला.
टोल नाके आता बंद झाले आहेत नवी टेक्नॉलॉजी आणली आहे. पुणे जिल्ह्यात मी 50 हजार कोटी रुपयांचे पूल बनवत आहे, सगळी नवी टेक्नॉलॉजी यात आणली आहे. नवं तंत्रज्ञान वापरून आपल्याला देशाला सक्षम बनवाव लागेल, असेही गडकरींनी सांगितले.
आणखी वाचा