टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी विजयासाठी 371 धावांचं आव्हान दिलं आहे. भारताकडे दुसऱ्या डावात 6 धावांची आघाडी होती. तर ऋषभ पंत आणि केएल राहुल या जोडीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने ऑलआऊट 364 धावा केल्या. अशाप्रकारे भारताने इंग्लंडसमोर हे आव्हान ठेवलं आहे. आता भारतीय फलंदाजांनंतर गोलंदाजांवर सर्व जबाबदारी असणार आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाज चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत किती विकेट्स घेतात? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.