Maharashtra live Politics : आणीबाणीवर टीका करताना सीएम फडणवीसांनी सांगितल्या काही कटू आठवणी
Sarkarnama June 25, 2025 08:45 PM
Devendra Fadnavis : जुने दिवस विसरायचे नसतात, ते लढण्याचे बळ देतात

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती. इंदिरा गांधी यांच्या या निर्णयाला आज 50 वर्ष पूर्ण झाले. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वर्तमानपत्रामध्ये आणीबाणीच्या मुद्द्यावर लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी आणीबाणीवर टीका करत काही जुन्या कटू आठवणी सांगितल्या आहेत. संविधान आणि सांविधानिक व्यवस्था आणि लोकशाही पायदळी तुडवणाऱ्या काँग्रेस पक्षाने लिहिलेल्या या अध्यायाला 50 वर्षं झाली, एवढेच म्हणावे लागेल. जुने दिवस कधी विसरायचे नसतात, ते सतत आपल्याला लढण्याचे बळ देत असतात, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.

Rajabhau waje : लोकप्रतिनिधी म्हणून बोलण्याची संधी द्या

नाशिक येथील कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या दृष्टीने आतापर्यंत दोन ते तीनवेळा मंत्री गिरीश महाजन यांनी बैठक घेतली. मात्र, एकाही बैठकीला बोलवले नाही. लोकप्रतिनिधी म्हणून बोलण्याची संधी द्या, अशा शब्दांत नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Maharashtra Politics : कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटलं आहे. मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्याच्या बैठकीत अजित पवार यांनी या सूचना केल्या. सोमय्यांच्या मशिदीत जाण्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असंही त्यांनी म्हंटलं. सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीत अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे.किरीट सोमय्यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात मोहीम उघडलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये असं स्पष्ट शब्दात अजित पवारांनी सांगितलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.