बहुतेक घरांमध्ये उशी ही झोपेचा अविभाज्य भाग असते. आपण दररोज त्यावर डोके ठेवून झोपतो, पण या उशीमुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं, हे तुम्हाला माहिती आहे का? आपण बहुतेक वेळा उशीच्या फक्त कव्हरचीच सफाई करतो, पण खऱ्या धोक्याचं मूळ उशीच्या आत लपलेलं असतं.
उशीला वर्षानुवर्षं वापरल्याने तिच्या आत घाम, थुंकी, केस, मृत त्वचा आणि ओलावा साठत जातो. हे सर्व घटक बुरशी, जीवाणू आणि धूळ यांचं प्रजनन वाढवतात. अशा उशीचा दररोज वापर केल्याने चेहऱ्याला अॅलर्जी, डोकेदुखी, वारंवार सर्दी-खोकला होणे आणि त्वचाविकार होण्याचा धोका वाढतो. विशेषतः ज्यांना सायनस, दम्याचे त्रास आहेत, त्यांच्यासाठी अशा उश्या अधिक धोकादायक ठरू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, दररोज वापरली जाणारी उशी किमान १८ महिने ते २ वर्षांमध्ये बदलली पाहिजे. पण त्याआधीही काही संकेत दिसल्यास ती लगेच बदलणं योग्य ठरतं:
1. उशीचं मूळ स्वरूप (शेप) बिघडलेलं वाटत असेल.
2. उशीवर झोपल्यावर सतत डोके किंवा मानेत वेदना होत असतील.
3. उशीला फोल्ड केल्यावर ती पूर्ववत होत नसेल.
4. उशीतील रुई एकाच ठिकाणी गोळा झाल्यास किंवा त्यात गाठी तयार झाल्या असतील.
5. सकाळी उठल्यावर मानेत किंवा पाठीत जडपणा वाटत असेल.
फक्त कव्हर बदलणं पुरेसं नाही
अनेकांना वाटतं की, उशीचं कव्हर वेळोवेळी बदललं की स्वच्छता झाली. पण वास्तव वेगळं आहे. उशीच्या आतील भागात साचलेली घाण कव्हरने झाकलेली असते, पण ती अदृश्य असली तरी शरीरावर परिणाम करत असते. सतत संपर्कामुळे चेहऱ्यावर पुरळ, खाज, किंवा डोळ्यांच्या भोवती सूज येऊ शकते. त्यामुळे उशीची स्वच्छता आणि वेळेवर बदली करणे हे तितकंच महत्त्वाचं आहे.
उपाय आणि काळजी
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)