'मुलांनो मी आईला सोडून आंटीशी लग्न करु का?' रेशम टिपणीसच्या पूर्वाश्रमीच्या नवऱ्याने मुलांना केलेला प्रश्न, मुले म्हणाली 'बाबा तुमच्या...'
esakal June 26, 2025 05:45 AM

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील अभिनेत्री लता सभरवाल हिने संजीव सेठ यांच्याशी घटस्फोट घेतला आहे. लग्नाच्या 15 वर्षानंतर दोघे वेगळे झाले आहे. लता सभरवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याविषयी माहिती दिली. लता सभरवाल यांच्या लग्नाआधी संजीव सेठ यांनी रेशम टिपणीस हिच्याशी विवाह केला होता. मात्र लग्न मोडताना संजीव सेठ यांनी रेशमा आणि तिच्या मुलांशी परमिशन घेतली होती.

लता सभरवाल आणि संजीव सेठ यांच्या घटस्फोटामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. यासंदर्भात लता सभरवाल यांनी पोस्ट करत म्हटलं की, 'दीर्घ शांततेनंतर, मी सर्वांना सांगू इच्छिते की, मी आणि संजीव सेठ वेगळे झालो आहोत. मला त्यांनी एक प्रेमळ मुलगा दिल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.'

दरम्यान संजीव सेठ आणि लता सभरवाल यांच्याशी लग्न करण्यापूर्वी रेशम टिपणीस हिच्याशी लग्न केलं होतं. रेशमसोबत घटस्फोट घेतल्यानंतर संजीव सेठ यांनी लतासोबत लग्न केलं. रेशमा आणि संजीव यांच्यात 12 वर्षांचं अंतर होते. मुलांमुळे दोघं वेगळं होणं टाळत होते. परंतु दोघांमध्ये हळू हळू ताण वाढू लागला आणि संजीव आणि त्यांची सहकलाकार लता सभरवाल यांच्यात जवळीक वाढू लागली.

एका मुलाखतीत संजीव यांनी सांगितलं की, 'मी लतासोबत लग्न करण्यासाठी रेशम आणि मुलांची परवानगी घेतली होती. रेशमने माझ्या सुखात तिचं सुख मानत लग्नाला परवानगी दिली.'

इतकच नाहीतर रेशम टिपणीस संजीव सेठ यांच्या लग्नासाठी उत्सुक होत्या. त्यांनी स्वत: संजीवच्या दुसऱ्या लग्नाची तयारी केली. 2010मध्ये लता आणि संजीव पती पत्नी म्हणून एकत्र आले. दोघांचं थाटामाटात लग्न पार पडलं.

Viral Video : 'आमच्यावेळी का नव्हत्या अश्या मॅडम' एक नंबर तुझी कंबर गाण्यावर शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसोबत भन्नाट डान्स, नेटकरी झाले खूश
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.