यवतमाळ : राज्य शिक्षण विभागाने इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमात १०९८ हा टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकाचा समावेश केला आहे. या निर्णयामुळे मुलांमध्ये लहान वयातच स्वतःच्या हक्काविषयी जागरूकता, संकटात मदत घेण्याचा आत्मविश्वास आणि सुरक्षेची भावना रुजविण्याचा प्रयत्न होणार आहे.
या क्रमांकाचा उल्लेख पूर्वी इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकात होता. मात्र, आता तो इयत्ता पहिलीपासूनच शिकवण्यात येणार आहे. जेणेकरून लहान वयातच मुलांना सामाजिक सुरक्षा यंत्रणांबद्दलची माहिती मिळेल. ‘१०९८’ हा बालहक्क संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या ‘चाईल्डलाइन इंडिया फाउंडेशन’ या संस्थेचा मोफत टोल फ्री क्रमांक आहे.
हा क्रमांक २४७ (संपूर्ण दिवस व रात्र) कार्यरत असतो. भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या आधिपत्याखाली कार्य करतो. हा क्रमांक १८ वर्षांखालील सर्व बालक आणि बालकांसाठी उपलब्ध आहे. बालविवाह, बालमजुरी, शारीरिक, मानसिक अत्याचार, उपेक्षा, विस्थापन, गहाळ होणे किंवा इतर संकटग्रस्त स्थितीत असलेल्या कोणत्याही मुलासाठी या क्रमांकावर त्वरित मदत मिळू शकते.
Amravati News : ट्रक अपहरण करून २७ टन तांदूळ लंपास; पोलिसांनी लुटलेला संपूर्ण माल केला जप्त!या क्रमांकाचा अभ्यासक्रमात समावेश करून शालेय वयातच मुलांना अत्याचार सहन करणे नाही, तर मदतीसाठी आवाज उठवणे हे शिकवण्याचा अत्यंत सकारात्मक प्रयत्न केला जात आहे. शिक्षक व पालकांनीही या क्रमांकाचे महत्त्व मुलांना समजावून देणे आवश्यक आहे.
सुरक्षिततेसाठी शिक्षणातून पुढाकारहा क्रमांक अभ्यासक्रमात आणण्याचा उद्देश म्हणजे मुलांमध्ये कायद्याचा आधार, आत्मभान आणि सामाजिक सुरक्षा यांचा परिचय करून देणे आहे. शिक्षण हे केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि संरक्षणासाठी वापरण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे.