Latest Marathi News Live Updates : महाड तालुक्यात काळ नदी पात्रात अढळून आज्ञात व्यक्तीचा मृतदेह
esakal June 27, 2025 05:45 PM
Mahad Live: महाड तालुक्यात काळ नदी पात्रात अढळून आज्ञात व्यक्तीचा मृतदेह

 बिरवाडी नजीक लघू पाटबंधारे विभागाच्या बांधाऱ्या नजीकची घटना

महाड MIDC पोलिस घटनास्थळी दाखल

अंदाजे 40 ते 50 वर्षाची व्यक्ती असल्याचा अंदाज

मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी MIDC पोलिसांचे प्रयत्न

सदर मृतदेह हा अतीवृष्टी दरम्यान वाहून गेलेला व्यक्तीचा असावा की घातपाताच प्रकरण या बाबत पोलिस तपास सुरु

Mumbai Live : मुंबई-गोवा महामार्गावर कंटनेर आणि दुचाकीचा अपघात

चिपळूण नजिकच्या सावर्डे येथे झाला हा अपघात..

कंटेनरच्या धडकेने मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू...

घटनास्थळी पोलीस दाखल..

Washim Live: वाशिममध्ये पुराच्या पाण्यात पुलाचा भाग वाहून गेला तालुक्याशी संपर्क तुटला...

वाशिम जिल्ह्यात दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आल्यामुळे शेतीचा प्रचंड नुकसान झालं आहे , यात उतावळी नदीला पूर आल्यामुळे या पुराच्या पाण्यात कुकसा ते रिसोड या मार्गावरील पूलाचा भाग वाहून गेल्याने तालुक्याचा संपर्क तुटला आहे.

अंबादास दानवे यांची स्पष्ट भूमिका: ठाकरे बंधू एकत्र येणार, हेच जनतेचं अपेक्षित चित्र!

संभाजीनगरमध्ये बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. "मोर्चा एकत्र येणार, हे सत्य आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र यावेत, ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे," असं ते म्हणाले. सध्याच्या राजकारणात काही लोक मोदींसाठी चमचागिरी करत आहेत, अशी टिका करत त्यांनी स्पष्ट केलं की, एकत्र येण्यासाठी कुठलीही हरकत नाही, कारण विचार आणि मन दोघांचं एकच आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवीन चर्चा सुरू झाली आहे.

गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नाशिक – गंगापूर धरणातून आज सकाळी १० वाजल्यापासून २,७२० क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या काही तासांत टप्प्याटप्प्याने विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. परिणामी, गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मराठीसाठी ठाकरे एकत्र येण्याची गरज – प्रकाश महाजन यांची भावना

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे स्वप्न पाहायला हरकत नाही, असं मत प्रकाश महाजन यांनी व्यक्त केलं आहे. मराठी भाषेचा अभिमान आणि महाराष्ट्र धर्माचे संरक्षण हे ठाकरे कुटुंबाचे मूळ बिंब असल्याचे ते म्हणाले. राज ठाकरे यांनी मराठी जनतेसाठी दिलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास, ही मराठी अस्मितेसाठी स्वागतार्ह बाब ठरेल. हिंदी सक्तीविरोधात मराठीसाठी कोणी तरी उभं राहणं गरजेचं होतं आणि आज त्याची सुरुवात झाल्याचे ते म्हणाले. मराठी माणसासाठी राजकारणाच्या पलिकडे विचार करून एकत्र यावं, हेच बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. पुढील दहा वर्षांत मुंबईत होणाऱ्या प्रगतीच्या लाटेत मराठी माणूस मागे पडू नये, यासाठी हे एकत्र येणं आवश्यक आहे. ठाकरे ब्रँड महाराष्ट्रात सदैव प्रभावी राहणार असून, राज ठाकरे राजकारणात असताना तो कोणीही संपवू शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Vidarbha Live: विदर्भातील आदिवासी आश्रमशाळांना सुरुवात; कवडसमध्ये पारंपरिक नृत्यातून ‘प्रवेशोत्सव’

कवडस येथील आश्रमशाळेत शिक्षण वर्षाची सुरुवात, मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत उत्साहात प्रवेशोत्सव साजरा.
विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्याद्वारे स्वागत केलं; शिक्षणाची आवड वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील.

MNS Shivsena yuti Live: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यावर रोहित पवार काय म्हणाले ?

उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर रोहित पवारांचा सकारात्मक प्रतिसाद.
"मराठीसाठी दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर हा आनंदाचा क्षण," अशी X वरील पोस्ट.

Puri Jugannath Yatra Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगन्नाथ यात्रेनिमित्त दिल्या शुभेच्छा

शुक्रवारी पुरीमध्ये रथयात्रा उत्सव साजरा केला जाणार आहे आणि हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "सर्व देशवासीयांना यात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

Mumbai Live : हिंदीविरोधात ठाकरे बंधूचा एकच एकत्र मोर्चा निघणार

हिंदीविरोधात ठाकरे बंधूचा एकत्र आणि एकच मोर्चा 5 जुलैला मोर्चा निघणार असल्याचे संजय राऊत आणि मनसेचे संदीप देशपांडे यांनी सांगितले आहे.

Sharad Pawar : पहिली ते चौथी हिंदी सक्ती योग्य नाही पण... शरद पवारांचा हिंदीबाबत पुनरुच्चार

राज्यातील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी भाषा सक्तीची करणे योग्य नाही, मातृभाषा महत्वाची आहे. मुलांना पाचवीपासून हिंदी शिकविण्यास हरकत नाही, हिंदीला दुर्लक्षित करुन चालणार नाही असे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

Jagannath Yatra Live : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगन्नाथ यात्रेनिमित्त दिल्या शुभेच्छा

पुरीमध्ये आज रथयात्रा उत्सव साजरा केला जात आहे आणि हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. कडक सुरक्षेत लाखो भाविक वार्षिक उत्सव पाहणार असल्याने नागरी आणि पोलिस प्रशासन हाय अलर्टवर आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगन्नाथ यात्रेनिमित्त भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Pune Live : स्वारगेट बलात्कार प्रकरण, आरोपीच्या जामीन अर्जावर आज निर्णय

स्वारगेट बलात्कार प्रकरणी दोन्ही बाजूच म्हणणं ऐकून आरोपी दत्तात्रय गाडे याच्या जामीन अर्जावर आज पुणे कोर्टात सुनावणी होणार आहे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.