Maharashtra Live News Update: शिवसेना उद्धव ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का
Saam TV June 27, 2025 07:45 PM
Mahad: महाड तालुक्यात काळ नदी पात्रात अढळून आज्ञात व्यक्तीचा मृतदेह

० बिरवाडी नजीक लघू पाटबंधारे विभागाच्या बांधाऱ्या नजीकची घटना

० महाड MIDC पोलिस घटनास्थळी दाखल

० अंदाजे 40 ते 50 वर्षाची व्यक्ती असल्याचा अंदाज

० मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी MIDC पोलिसांचे प्रयत्न

० सदर मृतदेह हा अतीवृष्टी दरम्यान वाहून गेलेला व्यक्तीचा असावा की घातपाताच प्रकरण या बाबत पोलिस तपास सुरु

Mumbai: मुंबई-गोवा महामार्गावर कंटनेर आणि दुचाकीचा अपघात

चिपळूण नजिकच्या सावर्डे येथे झाला हा अपघात..

कंटेनरच्या धडकेने मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू...

घटनास्थळी पोलीस दाखल..

Shivsena: शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा नाशिक मध्ये मोठा धक्का

-

- महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह 8 माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर..

- तसेच उत्तर महाराष्ट्रातील 2 माजी आमदार देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती

- आगामी महापालिका निवडणुकीच्या पूर्वी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का

- सुधाकर बडगुजर यांच्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे देखील शिवसेनेत जाण्याच्या शक्यतेने उद्धव ठाकरे गटाला लागलेली गळती सुरूच

वाशिममध्ये पुराच्या पाण्यात पुलाचा भाग वाहून गेला तालुक्याशी संपर्क तुटला...

वाशिम जिल्ह्यात दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आल्यामुळे शेतीचा प्रचंड नुकसान झालं आहे , यात उतावळी नदीला पूर आल्यामुळे या पुराच्या पाण्यात कुकसा ते रिसोड या मार्गावरील पूलाचा भाग वाहून गेल्याने तालुक्याचा संपर्क तुटला आहे.

तुकोबा रायांच्या पालखीत सर्पमित्रांकडून जनजागृती

वारीच्या वाटेवरती महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील लाखो वारकरी विठ्ठल भेटीची आस मनामध्ये ठेवत मार्गस्थ झालेले आहेत वारीमध्ये वारकरी हे जवळपास 80 टक्के शेतकरीच असतात अशा शेतकऱ्यांना शेतामध्ये काम करत असताना सापांबद्दल माहिती असावी या उद्देशाने सर्प मित्रांकडून वारी मधल्या वारकऱ्यांना जनजागृती केली जाते आहे. काटेवाडीच्या प्रवेशद्वारावर ग्रीन वर्ल्ड फाऊंडेशन कडून ही जनजागृतीची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

रत्नागिरीत अज्ञातांनी तीन दुचाकी जाळल्या

रत्नागिरी शहरातील पेठकिल्ला परिसरात अज्ञातानं तीन दुचाकी जाळल्यात. मध्यरात्रीच्या वेळी सदरच्या दुचाकी जाळण्यात आल्यात. याबाबत रत्नागिरी पोलिस शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्थात दुचाकी जाळण्याचं कारण मात्र अद्याप स्पष्ट नाही. जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी घटनास्थळाची पाहणी केलीय. यानंतर त्यांनी संबंधितांवर कडक कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

Nashik: गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

- गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

- सकाळी १० वाजल्यापासून धरणातून २,७२० क्यूसेक वेगानं पाणी सोडायला सुरुवात

- धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग आणखी वाढवला जाणार

Mumbai: मुंबई पोलिसांच्या नार्कोटिक्स विभागाकडून जनजागृती रॅली

आंतरराष्ट्रीय नशा मुक्ती दिनाचे औचित्य साधून नार्कोटिक्स विभागाकडून मालाड मालवणी येथील पालिका शाळेत जनजागृती अभियान राबवले

अमली पदार्थ आणि नशापान न करण्याची शालेय विद्यार्थ्यांना दिली शपथ

या जनजागृती मोहिमेला मोठ्या प्रमाणावर शालेय विद्यार्थी, नार्कोटिक्स विभागाचे अधिकारी उपस्थित

Bhiwandi: भिवंडी शिवसेना मेळावा संपन्न...

येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा मेळा भिवंडीतील गंगाराम पाडा येथील संघ्रीला हाॅटेल येथे संपन्न झाला. या मेळाव्यात उद्योग मंत्री

उदय सामंत व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. यावेळी उदय सामंत म्हणाले की, भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात आमचा शिवसेना पक्ष कसा वाढला पाहिजे याकरिता आम्ही येथे शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी आलो आहोत. तसेच या मेळाव्याला शिवसैनिकांचा अल्प प्रतिसाद दिसून आला.

आदिशक्ती मुक्ताबाई पालखी दिंडी 21 व्या दिवशी धाराशिव जिल्ह्यात दाखल

वाशी तालुक्यातील पारगाव येथील राञीच्या मुक्कामानंतर पालखी दिंडीचे भुमकडे प्रस्थान, वाकवड येथे आज पालखीचा मुक्काम

महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेतील एक महत्वाची मानाची पालखी म्हणून ओळख असलेली आदीशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळा 21 व्या दिवशी हरीनामाचा गजर करत धाराशिव जिल्ह्यात दाखल झाली राञी वाशी तालुक्यातील पारगाव येथे गावकऱ्यांनी मोठ्या जल्लोषात स्वगत केले तर पारगाव येथील पालखीच्या मुक्कामानंतर आज ही पहाटे ही पालखी दिंडी भुमकडे मार्गस्थ झाली आहे,तालुक्यातील वाकवड येथे या पालखीचा आज मुक्काम असणार आहे.सुमारे 1500 वारकऱ्यांच्या जयघोषात मजल दर मजल करत ही पालखी दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहे.

नाशिकच्या जांभूळपाडा येथे स्मशान भूमी नसल्याने उघड्यावर करावे लागतात अंत्यसंस्कार

नाशिकच्या आदिवासी बहुल सुरगाणा तालुक्यातील रोंघाने ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जांभूळपाडा येथे स्मशानभूमी व रस्ता नसल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.पावसाळ्यात अक्षरक्ष : प्लास्टिक पेपरचा आधार घेऊन अंत्यसंस्कार करावा लागत असल्याने मृतदेहाची मृत्यूनंतरही अवहेलना सोसाव्या लागत आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे वारंवार मागणी करूही दाखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.तातडीने जांभूळपाडा गावाला स्मशानभूमी व रस्ता तयार करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

Nagothane: नागोठणे येथील आंबा नदीवरील पुल वाहतुकीसाठी बंद

रायगडच्या नागोठणे येथील आंबा नदीवरील पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. पुल अरुंद व कमकुवत झाल्यामुळे अपघाताचा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हा निर्णय घेतला आहे. पुलावरून वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे यामुळे नागरिकांसाठी चा जवळचा रस्ता बंद होणार आहे.

Aashadhi Wari: आषाढीवारीसाठी 13 लाख बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती

यंदाच्या आषाढी वारीसाठी किमान 12 ते 13 लाख भाविक येथील असा अंदाज आहे. मंदिर समितीने येणार्या भाविकांना विठुरायाचा लाडू प्रसाद उपलब्ध करुन दिला आहे.त्यानुसार मंदिर समितीने 13 लाख 50 हजार बुंदी लाडू व 60 हजार राजगिरा लाडू प्रसादाची निर्मिती केली आहे.

जन्मदात्या आईनेच चिमुकलीला कचऱ्यात फेकलं, नागपूरातील घटना

* जन्मदाता निर्दयी आईने जन्मलेल्या नवजात चिमुकलीला काही तासातच कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे..

* उच्चभ्रू वस्ती असलेल्या धंतोली सारख्या परिसरात धक्कादायक प्रकार समोर आल्याने अनेकाना धक्का बसला आहे..

* घरकाम करण्यासाठी जाणाऱ्या एका मोलकरणीला गजानन नगर परिसरात चिमुकलीचा रडण्याचा आवाज ऐकायला आला..

* महिलेने चिमुकलीला पाहताच हृदयाशी कवटाळलं आणि याची माहिती धंतोली पोलिसांना दिली..

* घटनेची माहिती मिळताच धंतोली पोलिसांनी नवजात चिमुकलीला मेडिकल रुग्णालयात दाखल केले..

Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी पावसाचा हाहाकार, नदी-नाल्यांना पूर

नंदुरबार-

नंदुरबार जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी पावसाचा हाहाकार.

अक्कलकुवा तालुक्यातील तालांबा गावाला पावसाने झोडपलं

पाच दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालांबा नदीला पूर

तालंबा नदीवर असलेल्या पुलावरून पाणी जात असल्याने रस्ता झाला बंद

नद्यांना पूर आल्याने अनेक लहान गावांचा संपर्क तुटला

सततच्या पावसामुळे सातपुड्याच्या नद्या झाल्या ओव्हरफ्लो

पेरणी केलेल शेत गेले पाण्याखाली शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

Nashik: गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नाशिक -

- गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार

- सकाळी दहा वाजता 2720 क्युसेकने सोडणार पाणी

- दोन दिवसापासून गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला होता कमी

- कालपर्यंत 1760 क्युसेकने सुरू होता विसर्ग

- मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाल्याने पाण्याचा विसर्ग वाढवणार

- गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार असल्याने नाशिक मध्ये पुन्हा गोदावरीची पाणी पातळी वाढणार

- गोदा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Pune: पुणे शहरात गेले दोन महिन्यात 511 मिलिमीटर पावसाची नोंद

पुणे -

पुणे शहरात गेले दोन महिन्यात 511 मिलिमीटर पावसाची नोंद

यंदाचा मान्सून पुणे शहरावर मेहरबान

मागील दोन महिन्यात 511 मिलिमीटर पावसाची नोंद शहराची वार्षिक सरासरी 700 ते 750 इतके आहे.

मात्र दोनच महिन्यात शहरात वर्षाच्या 70 ते 80 टक्के सरासरी इतका पाऊस झाला आहे

यंदा मान्सूनने अनेक विक्रम मोडले.

याआधी शहरात मान्सून कधीच मे महिन्यात आला नव्हता.

यंदा तो शहरात 26 मे रोजी दाखल झाला.याआधी 5 जूनपर्यंत मान्सून आल्याचे तपशील उपलब्ध आहेत.

Baramati: संत तुकाराम महाराज यांची पालखी आज बारामतीमधून मार्गस्थ होणार

पुणे -

संत तुकाराम महाराज यांची पालखी आज बारामतीमधून मार्गस्थ होणार

तुकोबा राया यांच्या पालखीचा आज मेंढ्यांचे रिंगण सोहळा

परीठ समाजाकडून आज पालखीला धोतराच्या पायघड्या घालण्यात येणार

संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज तरडगाव मुक्कामी

चांदोबा चे लिंब येथे पार पडणार माऊलींच्या पालखीचे पहिले उभे रिंगण

Pune: आषाढी एकादशी निमित्त 83 आषाढी विशेष रेल्वे गाड्या धावणार

पुणे -

आषाढी एकादशी निमित्त 83 आषाढी विशेष रेल्वे गाड्या धावणार

मध्य रेल्वेकडून आषाढी एकादशीचे औचित्य साधून दरवर्षी अतिरिक्त गाड्या सोडल्या जातात

अनेक भाविक रेल्वेने पंढरपूरला जातात

तर काही भाविक पालखी सोहळा ज्या ठिकाणी पोहोचला आहे तिथून वारी दाखल होतात

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून पुणे ते मिरज, मिरज ते नागपूर आणि मिरज ते लातूर या तीन एकेरी अतिरिक्त आषाढी रेल्वे सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Amravati: विदर्भाचं काश्मीर असलेल्या चिखलदऱ्यात ३ तासांत ६० मिलिमीटर पाऊस

अमरावती -

विदर्भाचं काश्मीर असलेल्या चिखलदऱ्यात ३ तासांत ६० मिलिमीटर पाऊस

धुके आणि संततधार पावसाने चिखलदराचे निसर्गसौंदर्य बहरले.

चिखलदऱ्यात झालेला पाऊस यंदाच्या पावसाळ्यातला पहिला जोरदार पाऊस..

पाऊस आणि दाट धुक्यामुळे आता चिखलदऱ्यात पर्यटक संख्या वाढणार..

Pune: पुण्यातील पावसामुळे रस्त्यावर पाणी तुंबू नये यासाठी नवा आराखडा तयार करा

पुणे -

पुण्यातील पावसामुळे रस्त्यावर पाणी तुंबू नये यासाठी नवा आराखडा तयार करा

पुणे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा आदेश

शहराच्या जुन्या हद्दीसाठी नवा एकात्मिक पावसाळी पाणी व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे आदेश

"शहरात थोडा पाऊस झाल्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साचत त्यासाठी प्रस्ताव द्या"

शहरात पाण्याचा निचरा होत नाही मुख्य रस्ते दोन हजार किलोमीटरचे आहेत पण पावसाळी गटारी तीनशे किलोमीटर असल्याने समस्या

शहरातील मेट्रो रस्त्याचे काम उड्डाणपुलाचे काम यामुळे या गटारीतून सुद्धा पाण्याचा निचरा होत नसल्याने नवीन आराखडा तयार करण्याचे आदेश

Pune News: खडकवासला धरण साखळीत 13.16 टीएमसी पाणीसाठा

पुणे -

खडकवासला धरण साखळीत 13.16 टीएमसी पाणीसाठा

खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये एकूण 13.16 टीएमसी म्हणजे 45.13 टक्के पाणीसाठा जमा..

गतवर्षी याच दिवशी साठा फक्त 3.57 टीएमसी म्हणजे 12.24 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता.

म्हणजेच यंदा धरणांमध्ये तिप्पट अधिक पाणीसाठा उपलब्ध.

चारही धरण परिसरात सुरुवातीच्या टप्प्यात समाधानकारक पाऊस पडत आहे.सध्या पाणी साठा चांगला वाढला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.