सुनील शुक्ला हे "उत्तर भारतीय विकास सेना" या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, जी मुंबई आणि महाराष्ट्रातील उत्तर भारतीय हक्कांसाठी कार्य करते.
सुनील शुक्ला हे वादग्रस्त वक्तव्य करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांना चॅलेंज देत असतात.
मुंबईत उत्तर भारतीय मराठी नागरिक यांची लोकसंख्या समान असून उत्तर भारतीयांनी राजकीय शक्ती व्हावे, असे म्हणत उत्तर भारतीय विकास सेनेच्या माध्यमातून राजकारण करत आहेत.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत उत्तर भारतीय उमेदवार उभे करून महापौरपद जिंकण्याचा त्यांचा उद्देश आहे.
त्यांचे म्हणणे आहे की मराठी मतदार वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागले गेले आहेत, तर उत्तर भारतीय एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन घडू शकते.
सुनील शुक्ला यांनी जाहीरपणे म्हटले आहे की मुंबईत उत्तर भारतीय महापौर होऊ शकतो.
त्यांनी दावा केला की मुंबईची एकूण लोकसंख्या २.१ कोटी असून त्यात १ कोटी उत्तर भारतीय आहेत. जर त्यातील फक्त ३% मतदारांनी मतदान केलं तरीही सत्ता मिळवता येईल.