राज ठाकरे व उद्दव ठाकरे हे 5 जुलै रोजी मुंबईत हिंदीविरोधी आंदोलनात एकत्र येणार आहेत. वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी हे आंदोलन बेकायदेशी असून आमचा त्यास विरोध असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यावरुन मनसे नेते अविनाश जाधव यांनी सदावर्ते यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
सदावर्ते हा भारतीय जनता पक्षाने पाळलेला माणूस आहे. आमची भाजपला विनंती आहे की, त्याच्या तोंडावर पट्टी बसवावी, सदावर्ते ज्या पद्धतीने मराठी माणसांविरुद्ध काम करतो, याला घरातून बाहेर पडू देणार नाहीत. याला मराठी माणूस जाम चोपेल असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले, या अगोदर सिद्धिविनायक मंदिराच्या विषयातही त्याने उडी मारली. एवढीच हिंमत असेल तर जा ना तिकडे साऊथमध्ये. तू स्वत:ला एवढा ज्ञानी समजतो ना मग तिकडं जाऊन विरोध करुन दाखव असं अविनाश जाधव यांनी सदावर्ते यांना आव्हान दिलं आहे.
Gunaratna Sadavarte on Raj Thackeray : ठाकरेंचा मोर्चा गल्लीतील निवडणुकीसाठी : सदावर्तेराज्यात हिंदी भाषा सक्तीवरुन वादंग निर्माण झाला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे 5 जुलै रोजी हिंदीविरोधी आंदोलनात एकत्र येणार आहेत. त्यावरुन वकील गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे खोटे नरेटीव्ह पसरवत असल्याचं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
त्यांनी राज ठाकरे यांची राज्यातील अवस्था हसण्यासारखी झाली आहे असं म्हटलं. ठाकरेंचा मोर्चा बेकायदेशीर आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार, त्यांना मोर्चा काढता येणार नाही. त्याला आमचा विरोध आहे. हा गल्लीतील निवडणुकीसाठी मोर्चा असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला.