भारतीय क्रिकेट संघ सध्या शुबमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडिया रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या निवृत्तीनंर पहिल्या कसोटी मालिकेत इंग्लंड विरुद्ध 2 हात करत आहे. टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिला सामना हा लीड्समध्ये खेळवण्यात आला. टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज केएल राहुल याने या सामन्यात संयमी शतक केलं. केएलला पहिल्या डावात अर्धशतकही करता आलं नाही. मात्र केएलन दुसर्या डावात शतक करुन सर्व उणीव भरुन काढली. केएलने दुसर्या डावात 137 धावांची खेळी केली. त्यामुळे आता केएलकडून दुसर्या सामन्यातही अशीच कामगिरी अपेक्षित असणार आहे. उभयसंघातील दुसरा सामना हा 2 जुलैपासून बर्मिंगहॅममध्ये खेळवण्यात येणार आहे.
दुसऱ्या कसोटीआधी भारताचा माजी खेळाडू संजय मांजरेकर याने केएलबाबत प्रतिक्रिया दिली आहे. संजय मांजरेकरने ऋषभ पंत याचं उदाहरण देत केएलला स्वत:ची क्षमता जाणून घेऊन सातत्याने मोठी खेळी करावी, असं म्हटलं आहे.
संजय मांजरेकरने स्टार स्पोर्ट्सवरील एका कार्यक्रमात बोलताना ऋषभ पंतच्या बॅटिंगचं कौतुक केलं. “ऋषभ पंत टेस्ट क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटिंगचा आनंद घेतो. जेव्हा एखादा फलंदाज सामन्यातील दोन्ही डावात शतक करतो तेव्हा त्याला मानसिक आणि शारिरीकरित्या कणखर असायला लागतं. पंतने पहिल्या डावात शतक केलं. पंतने 48 तासांनंतर आणखी एक शतकं केलं. ही मोठ्या खेळाडूची चिन्हं आहेत”, असं माजंरकरने म्हटलं.
मांजरेकरने पंतच्या क्षमतेचा उल्लेख करताना केएललाही तशी खेळी करण्याचा सल्ला दिला. “ऋषभ पंत व्यतिरिक्त टीममध्ये आणखी एक अनुभवी फलंदाज आहे. त्याच्याकडे या मालिकेत सातत्याने धावा करण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय नाही.भारतीय क्रिकेटला त्याची फार गरज आहे. त्यामुळे केएलला फक्त 1 शतक किंवा एका सामन्यात चांगली कामगिरी करणारा खेळाडू राहून जमणार नाही”, असंही मांजरेकरने नमूद केलं.