मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी वादग्रस्त त्रिभाषा सूत्राबाबत १६ एप्रिल आणि १७ जून रोजी जारी केलेले सरकारी ठराव (जीआर) रद्द केले आहेत. मात्र याआधी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी मुंबईत संयुक्त मोर्चाची घोषणा केली होती. मात्र याआधीच महायुती सरकारने मोठी घोषणा केली आहे. यावर आता दोन्ही पक्षाकडून प्रतिक्रिया आली आहे. संजय राऊत आणि राज ठाकरे यांनी याबाबत ट्विट केले आहे.
महाराष्ट्र सरकारने शाळांसाठी त्रिभाषा धोरणाबाबतचा सुधारित ठराव रद्द केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील मार्गावर चर्चा करण्यासाठी एक पॅनेल स्थापन करण्याची घोषणा केली आहे. यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत मत व्यक्त केले आहे. तर यावर संजय राऊतांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करत ५ जुलैचा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द झाल्याचे सांगितले आहे. तसेच हे उशीरा सुचलेले शहाणपण आहे, असं म्हणत महायुती सरकारवर टीकाही केली आहे.
Hindi Mandatory Decision: हिंदी भाषेबाबत शासन निर्णय रद्द, ठाकरे बंधुंच्या मोर्च्याआधीच फडणवीसांनी भाकरी फिरवलीयावेळी राज ठाकरे म्हणाले की, इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील २ जीआर रद्द केले. याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टाहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता. हे मात्र अजून गूढच आहे. पण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून तीन भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदाचा हाणून पाडला गेला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचं अभिनंदन.
राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल २०२५ पासून या विषयावर आवाज उठवला होता आणि तेंव्हापासून हा मुद्दातापायला लागला. त्यानंतर एक एक राजकीय पक्ष आवाज उठवायला लागले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षविरहित मोर्चा काढायच्या ठरवल्यावर अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली. हा मोर्चा जर झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी. कदाचित या एकजुटीचा धसका सरकारने घेतला असेल, पण हरकत नाही ही भीती असली पाहिजे.
अजून एक गोष्ट, सरकारने पुन्हा एकदा नवीन समिती नेमली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतोय समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे परंतू हे असले प्रकार परत खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत. ही गोष्ट सरकारने कायमची त्यांच्या मनात कोरून ठेवावी. हा निर्णय कायमचा रद्द झाला आहे असं आम्ही गृहीत धरतोय आणि महाराष्ट्रातील जनतेने पण हेच गृहीत धरलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका. अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिलं जाणार नाही. याची नोंद सरकारने घ्यावी, असं राज ठाकरे म्हणाले.
Devendra Fadnavis: ठाकरे बंधुंच्या एकीचा धसका? चक्क भाजपचे चाणक्य नरमले? फडणवीसांनी हिंदी भाषेबाबत जीआर रद्द का केला?राज ठाकरे पुढे म्हणाले की, आता मराठी माणसाने पण यातून बोध घ्यायला हवा. तुमच्या अस्तित्वाला, तुमच्या भाषेला नख लावायला आपलेच लोकं बसलेत आणि त्यांच्यासाठी ते ज्या भाषेत शिकले, वाढले, जी भाषा त्यांची ओळख आहे त्याच्याशी काही देणंघेणं नाहीये. त्यांना कोणालातरी खुश करायचं आहे बहुदा. यावेळेस मराठी मनांचा एकत्रित राग दिसला तो पुन्हा पुन्हा दिसला पाहिजे. असो, पण भाषेसाठी मराठी माणसं एकवटताना दिसली हा आनंद आहे. हा कडवटपणा अधिक वृद्धिंगत होऊ दे, आणि मराठी भाषा ज्ञानाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा होऊ दे हीच इच्छा. मराठी जनांचं पुन्हा एकदा अभिनंदन.