आज महाप्रलयाचा दिवस! 1000 हून अधिक भूकंप, ज्वालामुखींचा स्फोट… भविष्यवाणी खरी ठरणार?; जपान सरकारची तयारी काय?
Tv9 Marathi July 05, 2025 09:45 PM

जापानच्या मंगा कलाकार रियो तात्सुकी (Ryo Tatsuki) यांच्या भविष्यवाणीमुळे जापानमध्ये लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी १९९९ मध्ये लिहिलेल्या भविष्यवाणीत ५ जुलै, आजच्याच दिवशी जापानला मोठी आपत्ती येईल, असा उल्लेख केला आहे. जापानमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांमुळे लोकांमध्ये दहशत वाढली आहे. जापानच्या बेटांवर सातत्याने येणारे भूकंप आणि नुकताच झालेला मोठा ज्वालामुखीचा विस्फोट यामुळे या भीतीला खतपाणी घातले आहे.

जापानच्या बाबा वेंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रियो तात्सुकी यांनी जापानमध्ये भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक होईल, ज्यामुळे मोठी त्सुनामी येईल, असे सांगितले आहे. क्यूशू बेटावरील किरिशिमा ज्वालामुखी शृंखलेचा भाग असलेल्या माउंट शिनमोएडेके वर २ जुलै रोजी विस्फोट झाला, जो गेल्या काही वर्षांमधील सर्वात घातक विस्फोट होता. विस्फोटानंतर त्याची राख दूरवर आकाशात पसरली, ज्यामुळे मियाजाकी आणि कागोशिमा प्रांतांचा काही भाग राखे खाली गेला आहे.

वाचा: बाबा वेंगाचे नवे भाकीत! ‘या’ चार राशींचे नशीब पलटणार, होणार गडगंज श्रीमंत

जापानने दिला अलर्ट

याच वेळी, जापान सरकारने शनिवारी आपल्या मुख्य बेटांच्या दक्षिण-पश्चिम भागात अधिक शक्तिशाली भूकंपांचा इशारा दिला आहे, परंतु लोकांना आपत्तींच्या भविष्यवाणींवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी, शुक्रवारी क्यूशूच्या सर्वात दक्षिणेकडील मुख्य बेटाच्या टोकाजवळ ५.५ तीव्रतेच्या भूकंपाच्या केंद्राजवळील दूरस्थ बेटांवरील काही रहिवाशांना हलवण्यात आले. गुरुवारी येथे जोरदार भूकंप आला होता, जो इतका शक्तिशाली होता की लोकांसाठी उभे राहणे कठीण झाले होते.

दोन आठवड्यांत १००० पेक्षा जास्त भूकंप

गेल्या दोन आठवड्यांत कागोशिमा प्रांतातील बेटांवर १००० पेक्षा जास्त भूकंपांचे धक्के आले आहेत, ज्यामुळे तात्सुकी यांच्या भविष्यवाणीच्या भीतीला बळ मिळाले आहे. शनिवारी पुन्हा ५.४ तीव्रतेचा भूकंप आल्यानंतर, जापानच्या हवामान विभागाच्या भूकंप आणि सुनामी निगरानी विभागाचे संचालक अयाताका एबिटा यांनी सांगितले की, आमच्या सध्याच्या वैज्ञानिक ज्ञानानुसार भूकंपाचा नेमका वेळ, स्थान किंवा प्रमाण भाकित करणे कठीण आहे.

आपत्ती टाळण्यासाठी नवीन योजना

जापान सरकारने 2014 मध्ये भूकंप-तियारी योजना सादर केली होती, ज्याचा उद्देश मृत्यूदर 80 टक्क्यांनी कमी करणे होता. मात्र, नवीन अहवालांनुसार ही योजना फक्त 20 टक्के प्रभावी ठरू शकते. या योजनेअंतर्गत तटबंदी आणि निर्वासन इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे. उच्चीवर असलेल्या ठिकाणांचे अलर्ट सिस्टम अपडेट करण्यात आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.