टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि सलामीवीर केएल राहुल याने इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये अर्धशतक झळकावलं आहे. केएलने अर्धशतकी खेळी करत उपकर्णधार ऋषभ याच्यासोबत टीम इंडियाचा डाव सावरण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे. टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या डावात 387 धावांवर ऑलआऊट केलं. त्यानंतर इंग्लंडने ठराविक अंतराने टीम इंडियाला 3 झटके दिले. मात्र त्यानंतर केएल आणि पंत जोडीने टीम इंडियाचा डाव सावरला.