मुंबईसह राज्यात आजही (19 ऑगस्ट) पावसाचा जोर कायम आहे. गेल्या 24 तासांत मुंबईसह कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटकाच्या किनारी भागात मुसळधार पावसाची नोंद झाली.
पश्चिम विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे 59 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालं, तसंच अजूनही नदी नाल्यांना पूर आहे.
हवामान विभागानं मुंबईसह उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट दिलेला आहे, त्यामुळे प्रशासनानं इथल्या शाळा कॉलेजेसना सुट्टी जाहीर केली आहे. मुंबईमध्ये विशेषतः उपनगरात रात्री जोरदार पाऊस झाला असून सखल भागांत पाणी साचलं आहे.
18 तारखेला सकाळी आठ ते 19 तारखेला सकाळी आठ या कालावधीत कोकणात अनेक ठिकाणी दोनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाची प्रणाली आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत असून आज ती पश्चिमेकडे सरकते आहे आणि जमिनीवर येण्याची शक्यता आहे.
या प्रणालीच्या प्रभावामुळे दक्षिण भारतात मान्सून सक्रीय झाला आहे. गेल्या चोवीस तासांत आंध्र प्रदेशसह, महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोव्यातही जोरदार पाऊस झाला आहे. पुढचे तीन ते चार दिवस मान्सून इथे सक्रीय राहील.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 20 ऑगस्टपर्यंत मध्य महाराष्ट्र, मुंबईसह कोकण आणि गोव्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पुढच्या सात दिवसांमध्ये अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने दिलेल्या माहितीनुसार 16 ऑगस्ट ते 21 ऑगस्टदरम्यान महाराष्ट्रात अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून ही माहिती देण्यात आली.
कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्टया जिल्ह्यांना रेड अलर्ट
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी 'सचेत' ॲपद्वारे सतर्कतेचे संदेश पाठवले जात आहेत.
आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
नागरिकांच्या मदतीसाठी मंत्रालयीन स्तरावरील राज्यस्तरीय आपत्कालीन कार्यकेंद्र 24×7 सुरू आहे. मंत्रालय नियंत्रण कक्षासाठी फोन नं. 022-22794229 किंवा 022-22023039 तसेच मोबाईल क्र. 9321587143 उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचंही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आलं आहे.
काय काळजी घ्यावी?पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पडणे, झाडं कोसळणे यांसारख्या घटना घडतात. वीज पडणे अत्यंत धोकादायक असू शकते आणि व्यक्ती, संरचना आणि सामान्य पर्यावरणासाठी मोठा धोका निर्माण करते, असं हवामान खात्याकडून नमूद करण्यात आलं आहे.
या पार्श्वभूमीवर काय काळजी घ्यायला हवी याची माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रविण कुमार यांनी दिली.
1. घरात रहा: मोठ्या इमारतीत किंवा पूर्णपणे बंद असलेल्या वाहनात आश्रय घ्या. मोकळ्या जागा, उंच जमीन, उंच झाडे आणि कोणत्याही धातूच्या वस्तू टाळा.
2. इलेक्ट्रॉनिक उपकरणे अनप्लग करा: विद्युत उपकरणे डिस्कनेक्ट करा आणि लँडलाइन टेलिफोन वापरणे टाळा. वीज पडल्याने वीज पडू शकते ज्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान होऊ शकते.
3. पाणी टाळा: वादळाच्या वेळी आंघोळ करू नका, आंघोळ करू नका किंवा नळ वापरू नका, कारण विजेचे प्रवाह प्लंबिंगमधून जाऊ शकतात.
4. खिडक्या आणि दारे दूर रहा: उघड्या खिडक्या किंवा दारे वापरून वीज इमारतींमध्ये प्रवेश करू शकते. सर्व खिडक्या आणि दारे बंद करा आणि त्यांच्याकडे झुकू नका.
5. धातूच्या वस्तू वापरणे टाळा: छत्री, गोल्फ क्लब, सायकली किंवा इतर कोणत्याही धातूच्या वस्तू बाहेर वापरण्यापासून परावृत्त करा. धातू वीज चालवते आणि वीज पडण्याचा धोका वाढवते.
6. माहिती ठेवा: कोणत्याही आपत्कालीन सूचना किंवा हवामान परिस्थितीत बदलांसाठी स्थानिक हवामान अद्यतने, बातम्या बुलेटिन किंवा अधिकृत घोषणा ऐका.
7. जर तुम्ही जवळपास निवारा नसताना बाहेर पडलात तर: झाडे, खांब किंवा कोणत्याही उंच वस्तूंपासून दूर सखल जागा शोधा. खाली वाकून बसा, तुमचे पाय एकत्र ठेवा आणि जमिनीशी तुमचा संपर्क कमीत कमी करा. मोकळी मैदाने, टेकड्या आणि पाण्याचे साठे टाळा.
लक्षात ठेवा, पाऊस सुरू होण्यापूर्वी किंवा थांबल्यानंतरही वीज कोसळू शकते. वादळ पूर्णपणे निघून जाईपर्यंत आणि परिस्थिती सुधारेपर्यंत सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे.
कृपया तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना आणि शेजाऱ्यांना सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हा इशारा शेअर करा. माहिती ठेवा, सतर्क रहा आणि या वीज पडण्याच्या इशाऱ्यादरम्यान तुमच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या.
अधिक मदतीसाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत, पोलिस किंवा अग्निशमन विभागासारख्या तुमच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधा आणि सुरक्षित रहा, असंही आवाहन करण्यात आलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)