३० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०४:४८ वाजता बुध देव सिंह राशीत गोचर करतील, जिथे आधीपासून सूर्य ग्रह आणि केतू ग्रह उपस्थित आहेत. अशा परिस्थितीत ३० सप्टेंबरला सिंह राशीत बुध, सूर्य आणि केतू ग्रहांची युती होईल. १५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११:१० वाजेपर्यंत बुध देव सिंह राशीत राहतील, तर सूर्य देव १७ सप्टेंबरच्या सकाळी १:५४ वाजेपर्यंत सिंह राशीत राहतील. दुसरीकडे, केतू ६ डिसेंबर २०२५ पर्यंत सिंह राशीत राहणार आहे.
अशा परिस्थितीत ही महायुती १५ सप्टेंबर २०२५ रोजी बुधाच्या गोचरानंतर भंग होईल. पण त्याआधी अनेक राशींना ग्रहांचा राजकुमार बुध, ग्रहांचा राजा सूर्य आणि पापी ग्रह केतू यांच्या महायुतीचा लाभ मिळेल.
सिंह राशीत निर्माण होणारी बुध, सूर्य आणि केतू ग्रहांची युती या राशीच्या लोकांसाठी शुभ असेल. कार्यक्षेत्रातील चालू असलेल्या अडचणींचे निराकरण होईल, ज्यामुळे तुम्ही एकाग्रतेने तुमचे काम करू शकाल. तर व्यापाऱ्यांना व्यवसायात आर्थिक लाभ होईल आणि नवे भागीदार जोडले जातील. आरोग्याशी संबंधित समस्या, विशेषतः सांधेदुखी आणि खोकला यामुळे वयोवृद्ध व्यक्तींना त्रास होणार नाही.
बुधाचे सिंह राशीत सूर्य आणि केतू ग्रहांसोबत मीलन धनु राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद घेऊन येईल. कौटुंबिक समारंभादरम्यान अविवाहित लोकांना त्यांचा जोडीदार भेटू शकतो. तर, ज्यांचे लग्न झाले आहे, त्यांना मानसिक शांती मिळेल. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांसोबत समन्वय चांगला राहील. विद्यार्थ्यांच्या मनातील अनिश्चिततेची भीती दूर होईल. सामाजिक संबंधांमधील गैरसमज कमी होतील आणि सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल.
कुंभ राशीच्या लोकांसाठीही बुध, सूर्य आणि केतू ग्रहांची महायुती चांगली असेल. व्यापाऱ्यांना आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागणार नाही. नवे भागीदार व्यवसायाशी जोडले जातील, ज्यामुळे खूप फायदा होईल. याशिवाय, कुटुंबातील अंतर कमी होईल आणि धार्मिक यात्रेचा बेत आखला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांना उत्पन्न वाढवण्याच्या संधी मिळतील. तसेच, मित्रांसोबत फिरण्याचा बेत बनेल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)