केएल राहुल याच्या नेतृत्वात टीम इंडियाने शनिवारी 6 डिसेंबरला तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी विजयी साकारला. यशस्वी जैस्वाल याचं शतक तसेच रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी जोडीच्या अर्धशतकी तडाखाच्या जोरावर भारताने 271 धावांचं आव्हान हे 39.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. भारताने हा सामना 9 विकेट्सने जिंकला. टीम इंडियाने या सामन्यासह मालिका आपल्या नावावर केली. शतकी खेळी करणाऱ्या यशस्वीचा सामनावीर पुरस्कारने गौरव करण्यात आला. तर विराट कोहली मॅन ऑफ द सीरिज ठरला. विराटने या मालिकेत 2 शतक आणि 1 अर्धशतकासह 300 पेक्षा अधिक धावा केल्या. विराटने या मालिकेत अप्रतिम कामगिरी केली. विराटने या मालिकेत एकूण 10 विक्रम मोडीत काढले. विराट नक्की काय काय रेकॉर्ड ब्रेक केले? हे सविस्तर जाणून घेऊयात.